शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सरकारला जाग आणण्यासाठी कार्यकर्त्यांनो सज्ज व्हा!

By admin | Updated: February 3, 2016 03:40 IST

महाराष्ट्रात १९७२ पासून सुरू असलेल्या रोजगार हमी योजना केंद्र सरकारने देशात राबवायला सुरवात केली त्याचा दशकपूर्ती समारंभ साजरा करीत

औरंगाबाद : महाराष्ट्रात १९७२ पासून सुरू असलेल्या रोजगार हमी योजना केंद्र सरकारने देशात राबवायला सुरवात केली त्याचा दशकपूर्ती समारंभ साजरा करीत असताना ही योजना बंद करण्याच्या नजरेने केंद्र व राज्य सरकार वागत आहे. सरकारच्या व सरकारी यंत्रणेच्या या भूमिकेमुळे ग्रामीण जनता भरडली जात आहे. अशावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारला जाग आणण्यासाठी सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन मंगळवारी येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले. जगद्गुरू तुकाराम महाराज नाट्यगृहात प्रदेश काँग्रेसने मनरेगावरील राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेचा अध्यक्षीय समारोप करताना चव्हाण बोलत होते. रोहयोचे जनक वि.स. पागे व महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे, कुदळ फावड्याचे पूजन करून व दीप प्रज्वलित करून या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी, अभिजित देशमुख यांनी तयार केलेली १५ मिनिटांचा माहितीपट दाखविण्यात आला.चव्हाण यांनी सांगितले की, मूळ राज्याची ही योजना केंद्रीय स्तरावर स्वीकारून देशातील गरिबांना विश्वास देण्याचा व मागेल त्याला काम उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. दुष्काळ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यासाठी प्रसंगी नियमांमध्ये शिथिलताही आणली; पण सध्याचे सरकार मनरेगासह अनेक लोकोपयोगी योजना बंद करण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रात तर मनरेगावरचा खर्च सध्याच्या सरकारने २०० कोटींपर्यंत खाली आणला आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर राजकारण करायचे नाही, हीच काँग्रेसचीही भूमिका आहे. काँग्रेसने आपल्या परीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुुटंबियांना आर्थिक मदतही केली. विधानसभेवर प्रचंड मोठा मोर्चाही काढला. सध्याचे सरकार कर्जमाफीच्या मागणीकडे दुर्लक्ष तर करीतच आहे; पण दुष्काळावरच्या अन्य उपाययोजनांच्या बाबतीत एकदम उदासीन दिसून येत आहे. (प्रतिनिधी)