शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

सरकारला जाग आणण्यासाठी कार्यकर्त्यांनो सज्ज व्हा!

By admin | Updated: February 3, 2016 03:40 IST

महाराष्ट्रात १९७२ पासून सुरू असलेल्या रोजगार हमी योजना केंद्र सरकारने देशात राबवायला सुरवात केली त्याचा दशकपूर्ती समारंभ साजरा करीत

औरंगाबाद : महाराष्ट्रात १९७२ पासून सुरू असलेल्या रोजगार हमी योजना केंद्र सरकारने देशात राबवायला सुरवात केली त्याचा दशकपूर्ती समारंभ साजरा करीत असताना ही योजना बंद करण्याच्या नजरेने केंद्र व राज्य सरकार वागत आहे. सरकारच्या व सरकारी यंत्रणेच्या या भूमिकेमुळे ग्रामीण जनता भरडली जात आहे. अशावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारला जाग आणण्यासाठी सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन मंगळवारी येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले. जगद्गुरू तुकाराम महाराज नाट्यगृहात प्रदेश काँग्रेसने मनरेगावरील राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेचा अध्यक्षीय समारोप करताना चव्हाण बोलत होते. रोहयोचे जनक वि.स. पागे व महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे, कुदळ फावड्याचे पूजन करून व दीप प्रज्वलित करून या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी, अभिजित देशमुख यांनी तयार केलेली १५ मिनिटांचा माहितीपट दाखविण्यात आला.चव्हाण यांनी सांगितले की, मूळ राज्याची ही योजना केंद्रीय स्तरावर स्वीकारून देशातील गरिबांना विश्वास देण्याचा व मागेल त्याला काम उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. दुष्काळ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यासाठी प्रसंगी नियमांमध्ये शिथिलताही आणली; पण सध्याचे सरकार मनरेगासह अनेक लोकोपयोगी योजना बंद करण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रात तर मनरेगावरचा खर्च सध्याच्या सरकारने २०० कोटींपर्यंत खाली आणला आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर राजकारण करायचे नाही, हीच काँग्रेसचीही भूमिका आहे. काँग्रेसने आपल्या परीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुुटंबियांना आर्थिक मदतही केली. विधानसभेवर प्रचंड मोठा मोर्चाही काढला. सध्याचे सरकार कर्जमाफीच्या मागणीकडे दुर्लक्ष तर करीतच आहे; पण दुष्काळावरच्या अन्य उपाययोजनांच्या बाबतीत एकदम उदासीन दिसून येत आहे. (प्रतिनिधी)