शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
4
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
5
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
6
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
7
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
8
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
9
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
10
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
11
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
12
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
13
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
14
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
15
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
16
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
17
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

कार्यकर्त्यांनो, एकजूट व्हा !

By admin | Updated: January 16, 2016 01:47 IST

राग आणि गटबाजी सोडा, मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळवायचा असेल तर सर्वांना सोबत घेऊन काम करावे लागेल. हीच काँग्रेसची पद्धत आहे, असा मूलमंत्र देत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल

मुंबई : राग आणि गटबाजी सोडा, मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळवायचा असेल तर सर्वांना सोबत घेऊन काम करावे लागेल. हीच काँग्रेसची पद्धत आहे, असा मूलमंत्र देत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी काँग्रेस नेत्यांना गटबाजी संपविण्याचा निर्वाणीचा इशाराही दिला. आझाद मैदान येथील काँग्रेस कार्यालयातील मुरली देवरा सभागृहाचे राहुल गांधी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यानंतर पक्षकार्यकर्त्यांसमोर बोलताना राहुल गांधी यांनी भाषणाचा रोख मुंबई काँग्रेसमधील गटबाजीकडे वळविला. राहुल म्हणाले की, ‘तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ हा मकरसंक्रांतीचा संदेश आहे. त्यामुळे इथे कार्यालयात तीळगुळाचा डबा ठेवायला मी सांगितले आहे. येणाऱ्या प्रत्येक नेत्याला लाडू द्या आणि गोड बोला. राजकारणात संघर्ष, मतभेद होतच राहतात. काँग्रेस लोकशाही मार्गाने चालणारा असल्याने थोडेफार पुढेमागे आपल्याकडे चालते. धाक दाखवून गप्प बसवायला हा काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाही. मात्र, राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वांना सोबत घेऊनच पुढे जावे लागेल, असे राहुल म्हणाले. तब्बल २२ वर्षे मुरली देवरांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळले. प्रदेशाध्यक्ष पद सांभाळणे किती अवघड आहे, याची मला कल्पना आहे. कुठून विरोध होतोय, कोण करतोय, हेच अनेकदा उमगत नाही. अशात २२ वर्षे अध्यक्षपदी ते राहिले याचाच अर्थ त्यांच्यात काही खास होतं. सदैव हसतमुख राहणाऱ्या देवरांनी मतभेद असणाऱ्यांनाही सोबत घेऊन काम केले, हेच काँग्रेसचे धोरण आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी करण्यासाठी सर्वांनी पक्षांतर्गत मतभेद विसरून एकत्र यायला हवे. गटबाजी थांबवायला हवी, असे आवाहन गांधी यांनी केले. माझे काम सगळ्यांना एकत्र करण्याचे आहे. मात्र, गटबाजीचे प्रकार चालूच राहीले तर ‘शिस्त’ शिकवावी लागेल, अशी समज द्यायलाही राहुल विसरले नाही. ‘कॉम्प्लिकेटेड’ पार्टी२००४पासून मी राजकारणात आहे. अनेक प्रदेश काँग्रेस कमिट्यांना भेटलो. त्यांच्या अडचणी काय असतात याची मला कल्पना आहे. कोण व कसा विरोध करेल याचा नेम नाही, असे सांगत काँग्रेस म्हणजे ‘कॉम्प्लिकेटेड’ पार्टी असल्याचे ते म्हणाले. मुंबई अध्यक्षपद म्हणजे ‘हॉट सीट’मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी म्हणजे एक प्रकारे ‘हॉट सीट’ असल्याचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले. मात्र, दिवंगत मुरली देवरा यांनी तब्बल २२ वर्षे ही जबाबदारी पार पाडली. त्यामुळे निरुपम बघा थोडं, असा चिमटा चव्हाणांनी काढताच सभागृहात हशा पिकला. मुंबईसाठी तीळगूळ घ्या आणि गोड बोला, हा संदेश घेऊनच सगळे आलो आहोत, असे चव्हाण म्हणाले. उत्साही कार्यकर्ते आणि हैराण पोलीसराहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. ३ वाजताच सभागृह गच्च भरल्याने पोलिसांनी गडबड टाळण्यासाठी सभागृहाकडे जाणारा मार्ग बंद केला. मात्र, आत जाणारच अशी भूमिका घेत कार्यकर्त्यांचा लोंढा पोलिसांच्या बॅरेकेडवर धडकला. या गोंधळात सुरक्षा तपासणीसाठी लावलेले ‘मेटल डिटेक्टर’ मात्र निखळून पडले.