शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांनो, एकजूट व्हा !

By admin | Updated: January 16, 2016 01:47 IST

राग आणि गटबाजी सोडा, मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळवायचा असेल तर सर्वांना सोबत घेऊन काम करावे लागेल. हीच काँग्रेसची पद्धत आहे, असा मूलमंत्र देत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल

मुंबई : राग आणि गटबाजी सोडा, मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळवायचा असेल तर सर्वांना सोबत घेऊन काम करावे लागेल. हीच काँग्रेसची पद्धत आहे, असा मूलमंत्र देत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी काँग्रेस नेत्यांना गटबाजी संपविण्याचा निर्वाणीचा इशाराही दिला. आझाद मैदान येथील काँग्रेस कार्यालयातील मुरली देवरा सभागृहाचे राहुल गांधी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यानंतर पक्षकार्यकर्त्यांसमोर बोलताना राहुल गांधी यांनी भाषणाचा रोख मुंबई काँग्रेसमधील गटबाजीकडे वळविला. राहुल म्हणाले की, ‘तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ हा मकरसंक्रांतीचा संदेश आहे. त्यामुळे इथे कार्यालयात तीळगुळाचा डबा ठेवायला मी सांगितले आहे. येणाऱ्या प्रत्येक नेत्याला लाडू द्या आणि गोड बोला. राजकारणात संघर्ष, मतभेद होतच राहतात. काँग्रेस लोकशाही मार्गाने चालणारा असल्याने थोडेफार पुढेमागे आपल्याकडे चालते. धाक दाखवून गप्प बसवायला हा काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाही. मात्र, राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वांना सोबत घेऊनच पुढे जावे लागेल, असे राहुल म्हणाले. तब्बल २२ वर्षे मुरली देवरांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळले. प्रदेशाध्यक्ष पद सांभाळणे किती अवघड आहे, याची मला कल्पना आहे. कुठून विरोध होतोय, कोण करतोय, हेच अनेकदा उमगत नाही. अशात २२ वर्षे अध्यक्षपदी ते राहिले याचाच अर्थ त्यांच्यात काही खास होतं. सदैव हसतमुख राहणाऱ्या देवरांनी मतभेद असणाऱ्यांनाही सोबत घेऊन काम केले, हेच काँग्रेसचे धोरण आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी करण्यासाठी सर्वांनी पक्षांतर्गत मतभेद विसरून एकत्र यायला हवे. गटबाजी थांबवायला हवी, असे आवाहन गांधी यांनी केले. माझे काम सगळ्यांना एकत्र करण्याचे आहे. मात्र, गटबाजीचे प्रकार चालूच राहीले तर ‘शिस्त’ शिकवावी लागेल, अशी समज द्यायलाही राहुल विसरले नाही. ‘कॉम्प्लिकेटेड’ पार्टी२००४पासून मी राजकारणात आहे. अनेक प्रदेश काँग्रेस कमिट्यांना भेटलो. त्यांच्या अडचणी काय असतात याची मला कल्पना आहे. कोण व कसा विरोध करेल याचा नेम नाही, असे सांगत काँग्रेस म्हणजे ‘कॉम्प्लिकेटेड’ पार्टी असल्याचे ते म्हणाले. मुंबई अध्यक्षपद म्हणजे ‘हॉट सीट’मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी म्हणजे एक प्रकारे ‘हॉट सीट’ असल्याचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले. मात्र, दिवंगत मुरली देवरा यांनी तब्बल २२ वर्षे ही जबाबदारी पार पाडली. त्यामुळे निरुपम बघा थोडं, असा चिमटा चव्हाणांनी काढताच सभागृहात हशा पिकला. मुंबईसाठी तीळगूळ घ्या आणि गोड बोला, हा संदेश घेऊनच सगळे आलो आहोत, असे चव्हाण म्हणाले. उत्साही कार्यकर्ते आणि हैराण पोलीसराहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. ३ वाजताच सभागृह गच्च भरल्याने पोलिसांनी गडबड टाळण्यासाठी सभागृहाकडे जाणारा मार्ग बंद केला. मात्र, आत जाणारच अशी भूमिका घेत कार्यकर्त्यांचा लोंढा पोलिसांच्या बॅरेकेडवर धडकला. या गोंधळात सुरक्षा तपासणीसाठी लावलेले ‘मेटल डिटेक्टर’ मात्र निखळून पडले.