शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

हिंदूंना सबळ करण्यासाठी संघाचे कार्य - मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 06:01 IST

सर्व विश्वाला सर्व सुखी करणारा हिंदू समाज असून, या समाजाला सबळ कसे करायचे, या समाजातील माणसामागे शक्ती कशी उभी करायची

मलकापूर (बुलडाणा) : सर्व विश्वाला सर्व सुखी करणारा हिंदू समाज असून, या समाजाला सबळ कसे करायचे, या समाजातील माणसामागे शक्ती कशी उभी करायची, हे कार्य संघ करीत असून, हे संघाचे कार्य अनेकांची तपश्चर्या व तपस्येतून उभे राहिले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.भारतीय नागरिक उत्थान समिती मलकापूरद्वारा निर्मित पू. बाळासाहेब देवरस स्मृती भवनाचे लोकार्पण गुरुवारी भागवत यांच्या हस्ते झाले. या वास्तूत उद्ययावत अभ्यासिका व संगणक उपलब्ध आहे. यानिमित्त भागवत यांच्या जाहीर उद्बोधनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.भागवत म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे शिस्त अन् अनुशासन यांचा मेळ आहे. स्वयंसेवक म्हणजे शुद्ध व सात्विक आत्मीयता. सर संघ कार्यालय म्हणजे आत्मीयता व सूचीतेचा अनुभव देणारे कार्यालय, असा अनुभव प्रत्येकाला येतो. संघ कार्यालय हे केवळ स्वयंसेवकांचे न राहता ते संपूर्ण समाजाचे व्हावे, समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे, देशभक्तीच्या विचारांचे प्रेरणास्रोत व्हावे.स्वयंसेवकांनी स्वत:चे वैयक्तिक जीवन उन्नत करावे, स्वत:च्या कुटुंबासाठी आवश्यक भौतिक सुविधांसाठी परिश्रम करावेत त्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता, कौशल्यप्राप्त करावे; परंतु त्याच वेळी ज्या समाजामुळे आपण सुखनैव जगतो त्या समाजाचा मात्र विसर पडू देऊ नये. समाज सुखी, संपन्न, शक्तिशाली व सुस्थिर असेल तरच आपल्याला जीवन आनंदाने जगता येईल, असेही सरसंघचालक भागवत म्हणाले.भागवत यांच्या वक्तव्याने चर्चेला पुन्हा उधाळ आले आहे़