शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भुयारी मार्गाचे काम पुन्हा नव्याने

By admin | Updated: April 26, 2016 04:23 IST

बदलापूरमधील बेलवली परिसरात रेल्वे फाटकाच्या शेजारी प्रशासनाने भुयारी मार्ग तयार करून रेल्वे फाटक बंद केले

बदलापूर : बदलापूरमधील बेलवली परिसरात रेल्वे फाटकाच्या शेजारी प्रशासनाने भुयारी मार्ग तयार करून रेल्वे फाटक बंद केले. मात्र, या मार्गाचे काम चुकीच्या पद्धतीने केल्याने येथे नेहमीच पाणी तुंबते. यामुळे वाहनचालकांना या मार्गाचा वापर करता येत नाही. तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी रेल्वेने नव्याने काम सुरू केले आहे.अडीच वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाने फाटक बंद करून भुयारी मार्ग वाहनचालकांसाठी सुरू केला. मात्र, या मार्गाच्या शेजारी असलेल्या नाल्याचे पाणी थेट या भुयारी मार्गात येत असल्यामुळे हा मार्ग बंद करावा लागला. सतत पाणी तुंबूनही रेल्वेने हा मार्ग तसाच सुरू ठेवला. रेल्वेच्या या हलगर्जीपणाचा फटका अनेक वाहनचालकांना बसला आहे. दुचाकीस्वार आणि चारचाकी गाडी या पाण्यात अडकल्याच्या घटना घडल्या आहेत. चार ते पाच फूट पाणी साचत असल्याने चारचाकी गाड्या अडकल्याच्या घटना घडल्या आहेत. अखेर, स्थानिकांनी पुढाकार घेत हा मार्ग बंद केला. अखेर, रेल्वे प्रशासनाला उशिरा जाग आली. मार्गामधील पाणी काढण्याचे आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे काम सुरू केले आहे. भुयारी मार्गाच्या शेजारी असलेला नाला मार्गापेक्षा १२ इंच खाली घेण्यात येत आहे. तसेच भुयारी मार्गाची उंचीही आठ इंच वाढवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)