शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
4
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
5
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
6
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
7
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
8
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
9
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
10
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
11
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
12
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
13
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
14
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
15
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
16
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
17
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
18
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
19
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
20
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य

‘सारथी’च्या कामकाजाने वेग घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 17:04 IST

मराठा समाजाने मुंबई काढलेल्या विशाल मोर्चानंतर मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात विविध मागण्यांच्या संदर्भात घोषणा केली. यात ‘बार्टी’च्या धर्तीवर ‘सारथी’ संस्थाचा उल्लेख झाला. त्यानंतर सहा महिने यासंदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नाही. मात्र ९ आॅगस्ट रोजी मुंबईत मोर्चा निघण्यापूर्वीच याविषयी जोरदार हालचाली करत संस्थेचे कामकाज व उद्दिष्ट निश्चितीसाठी नेमलेल्या समितीच्या कामाला वेग दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे‘बार्टी’च्या धर्तीवर ‘सारथी’ संस्थाचा उल्लेख या संस्थेच्या स्थापनेची घोषणा ९ डिसेंबर २०१६ रोजी केली होती.९ आॅगस्ट रोजी मुंबई मराठा क्रांती मोर्चा काढण्याची घोषणा झाल्यानंतर सरकारी पातळीवर सूत्र वेगाने हालली. ‘सारथी’ संस्थेच्या निर्मितीसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीचे कामकाज दररोज करण्यात येत आहे.

राम शिनगारे / ऑनलाईन लोकमत 

औरंगाबाद, दि. १२ :  मराठा समाजाने मुंबई काढलेल्या विशाल मोर्चानंतर मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात विविध मागण्यांच्या संदर्भात घोषणा केली. यात ‘बार्टी’च्या धर्तीवर ‘सारथी’ संस्थाचा उल्लेख झाला. या संस्थेच्या स्थापनेची घोषणा ९ डिसेंबर २०१६ रोजी केली होती. त्यानंतर सहा महिने यासंदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नाही. मात्र ९ आॅगस्ट रोजी मुंबईत मोर्चा निघण्यापूर्वीच याविषयी जोरदार हालचाली करत संस्थेचे कामकाज व उद्दिष्ट निश्चितीसाठी नेमलेल्या समितीच्या कामाला वेग दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोपर्डी येथे घडलेल्या अमानवी घटनेनंतर मराठा समाजाने ९ आॅगस्ट २०१६ पासून मराठा क्रांती मुक मोर्चाचे राज्यभरात आयोजन केले. या मोर्चेक-यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मागील वर्षांपासून अनेकवेळा घोषणा केल्या. यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थाच्या (बार्टी) धर्तीवर मराठा समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्था स्थापन करण्याचा समावेश होता. याची घोषणा नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनात ९ डिसेंबर २०१६ रोजी केली. 

यानंतर राज्य सरकारने ३ जानेवारी रोजी संस्थेची रचना, कार्य, उद्देश ठरविण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक व अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीचे सदस्य म्हणून बार्टीचे माजी महासंचालक डी. आर. परिहार यांना नेमले. याविषयी काढलेल्या  शासन निर्णयात स्पष्टता नव्हती.  ही संस्था केवळ मराठाच नव्हे तर सर्वांसाठी असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट झाल्यामुळे मराठा समाजात नाराजीचा सुर उमटले होते.

याविषयी ‘लोकमत’ने १६ मे रोजीच्या अंकात प्रकाश टाकला होता. ३ जानेवारीपासून जुलैपर्यंत समितीच्या कामकाजासाठी कार्यालय सूध्दा मिळाले नव्हते.  पुण्यातील ‘बार्टी’च्या कार्यालयात एक खोली देण्याचे प्रस्तावित होते. मात्र त्यास समितीने हरकत घेतली होती. त्यामुळे घोषणेनंतरच्या ७ महिन्यात ‘सारथी’ विषयी कोणतेच पाऊल उचलण्यात आले नाही. मात्र पुन्हा ९ आॅगस्ट रोजी मुंबई मराठा क्रांती मोर्चा काढण्याची घोषणा झाल्यानंतर सरकारी पातळीवर सूत्र वेगाने हालली. 

५ जुलै रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासन निर्णय काढत आगोदरच्या चुका दुरुस्त करत मराठा, कुणबी व शेती व्यवसायातील बहुजन समाज यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासावर प्रकर्षाने लक्ष देण्यासाठी, प्रश्न जाणून घेवून त्याचा सविस्तर अभ्यास,उपायोजनांसाठी ‘सारथी’ची स्थापना प्रस्तावित असल्याचे स्पष्ट केले. तसेच डॉ. मोरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीला संस्थेची रचना, प्रारूपासंदर्भात आवश्यक त्या सुविधा, कर्मचारी आणि कार्यालयाला जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश ‘बार्टी’ला दिले. यासह समितीचे अध्यक्ष, सदस्याचे मानधन, प्रवासभत्ते याविषयी सूध्दा स्पष्ट सूच    ना देण्यात आल्या. यानंतर संस्थेच्या निर्मितीसंदर्भात कामकाजला वेगाने सुरूवात झाली आहे. 

‘बार्टी’च्या बाहेर समितीचे कार्यालय‘सारथी’ संस्थेच्या स्थापनेसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीचे कार्यालय ‘बार्टी’ संस्थेमध्ये स्थापन करण्यात आलेले नसल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले. ‘बार्टी’ने केवळ सर्व गोष्टी जळवून दिल्या आहेत. या समितीचे स्वतंत्रपणे कामकाज करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 निर्धारित वेळेत काम संपविण्याचे प्रयत्न ‘सारथी’ संस्थेच्या निर्मितीसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीचे कामकाज दररोज करण्यात येत आहे. सरकारने दिलेल्या निर्धारित वेळेत हे काम संपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कार्यालय मिळाले असून, कर्मचारी टप्प्याटप्याने उपलब्ध होतील. - डॉ. सदानंद मोरे, अध्यक्ष, सारथी संस्था निर्मिती समिती