शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

काँग्रेसची वर्क आॅर्डर, भाजपाचे हात वर

By admin | Updated: June 5, 2015 01:31 IST

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात या कामांची वर्क आॅर्डर काढली होती म्हणून भाजपा सरकारने दोन हजार कोटी रुपये देण्यास असमर्थता दर्शविली आहे.

यवतमाळ : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात या कामांची वर्क आॅर्डर काढली होती म्हणून भाजपा सरकारने दोन हजार कोटी रुपये देण्यास असमर्थता दर्शविली आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना (‘पीएमजीएसवाय’) ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली होती. त्यानंतर केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकारने ही योजना सलग चालविली. २०१४च्या लोकसभा निवडणुका लागण्यापूर्वी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने या योजनेत महाराष्ट्रासाठी दोन हजार कोटी रुपयांच्या कामांचे आदेश जारी केले. त्यामुळे राज्यात रस्ते व पुलांच्या निर्मितीची कामे सुरू झाली. मात्र, बहुतांश कामे अर्ध्यावर आली असताना या कामांवर निधीची तरतूदच झालेली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. यातील ८०० कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. पूर्ण झालेल्या कामांचीच देयके मिळत नसल्याने अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे, ठाणे या परिमंडळातील ६००वर उर्वरित कंत्राटदारांनी २ हजार २०० कोटींची कामे अर्ध्यावरच थांबविली आहे. ही कामे केवळ ३० ते ३५ टक्के झाल्याचे सांगितले जाते. देयके थकलेल्या कंत्राटदारांंनी राज्यातील भाजपाच्या काही खासदार-आमदारांशी चर्चा केली असता ‘काँग्रेस आघाडी सरकारमधील तरतुदीशिवाय निघालेल्या दोन हजार कोटींच्या वर्क आॅर्डरची जबाबदारी भाजपाने का घ्यावी? असा प्रतिप्रश्न त्यांना केला गेला. त्यानंतर या कंत्राटदारांच्या एका शिष्टमंडळाने सोमवारी १ जून रोजी थेट दिल्ली गाठून अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री वीरेंद्रसिंह चौधरी यांची भेट घेतली. ‘पीएमजीएसवाय’च्या या दोन हजार कोटी रुपयांसाठी ग्रामीण विकास मंत्रालयाला नाबार्ड, जागतिक बँकेकडून तीन प्रकारचे कर्ज घ्यावे लागणार असून भाजप सरकार तयार नसल्याची माहिती पुढे आली. याबाबत मुख्यमंत्री, अर्थमंत्री, ग्रामविकास मंत्री यांच्या भेटी घेतल्या. मात्र यातूनही कंत्राटदारांना दिलासा मिळाला नाही. थकीत देयके तत्काळ देण्याच्यादृष्टीने शासनस्तरावर वरिष्ठांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे पीएमजीएसवायच्या अमरावती परिमंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता ए.सी. अडचुले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)केंद्रातील ‘पीएमजीएसवाय’च्या धर्तीवर राज्यात ‘सीएमजीएसवाय’ अर्थात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विचाराधीन आहे. ‘पीएमजीएसवाय’चीच आर्थिक सोय नसताना राज्य सरकारने ‘सीएमजीएसवाय’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प अद्याप सुरू झाला नाही, त्याचे नियोजनही पूर्ण झालेले नाही. त्यासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद केली. हा निधी शासनाच्या तिजोरीत आरक्षित होऊन पडून आहे. राज्यात अर्धवट असलेल्या रस्ते व पुलांच्या निर्मितीसाठी तात्पुरता का होईना ‘पीएमजीएसवाय’मध्ये हा निधी वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ५० कोटी देण्याची तयारीवित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना कंत्राटदार भेटले असता ‘पीएमजीएसवाय’ ही केंद्र शासनाची योजना असल्याने केंद्रानेच त्यासाठी पैसे द्यावे, अशी भूमिका घेऊन शेवटी केवळ ५० कोटी रुपये देण्याची तयारी त्यांनी दर्शविली.