शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची वर्क आॅर्डर, भाजपाचे हात वर

By admin | Updated: June 5, 2015 01:31 IST

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात या कामांची वर्क आॅर्डर काढली होती म्हणून भाजपा सरकारने दोन हजार कोटी रुपये देण्यास असमर्थता दर्शविली आहे.

यवतमाळ : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात या कामांची वर्क आॅर्डर काढली होती म्हणून भाजपा सरकारने दोन हजार कोटी रुपये देण्यास असमर्थता दर्शविली आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना (‘पीएमजीएसवाय’) ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली होती. त्यानंतर केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकारने ही योजना सलग चालविली. २०१४च्या लोकसभा निवडणुका लागण्यापूर्वी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने या योजनेत महाराष्ट्रासाठी दोन हजार कोटी रुपयांच्या कामांचे आदेश जारी केले. त्यामुळे राज्यात रस्ते व पुलांच्या निर्मितीची कामे सुरू झाली. मात्र, बहुतांश कामे अर्ध्यावर आली असताना या कामांवर निधीची तरतूदच झालेली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. यातील ८०० कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. पूर्ण झालेल्या कामांचीच देयके मिळत नसल्याने अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे, ठाणे या परिमंडळातील ६००वर उर्वरित कंत्राटदारांनी २ हजार २०० कोटींची कामे अर्ध्यावरच थांबविली आहे. ही कामे केवळ ३० ते ३५ टक्के झाल्याचे सांगितले जाते. देयके थकलेल्या कंत्राटदारांंनी राज्यातील भाजपाच्या काही खासदार-आमदारांशी चर्चा केली असता ‘काँग्रेस आघाडी सरकारमधील तरतुदीशिवाय निघालेल्या दोन हजार कोटींच्या वर्क आॅर्डरची जबाबदारी भाजपाने का घ्यावी? असा प्रतिप्रश्न त्यांना केला गेला. त्यानंतर या कंत्राटदारांच्या एका शिष्टमंडळाने सोमवारी १ जून रोजी थेट दिल्ली गाठून अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री वीरेंद्रसिंह चौधरी यांची भेट घेतली. ‘पीएमजीएसवाय’च्या या दोन हजार कोटी रुपयांसाठी ग्रामीण विकास मंत्रालयाला नाबार्ड, जागतिक बँकेकडून तीन प्रकारचे कर्ज घ्यावे लागणार असून भाजप सरकार तयार नसल्याची माहिती पुढे आली. याबाबत मुख्यमंत्री, अर्थमंत्री, ग्रामविकास मंत्री यांच्या भेटी घेतल्या. मात्र यातूनही कंत्राटदारांना दिलासा मिळाला नाही. थकीत देयके तत्काळ देण्याच्यादृष्टीने शासनस्तरावर वरिष्ठांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे पीएमजीएसवायच्या अमरावती परिमंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता ए.सी. अडचुले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)केंद्रातील ‘पीएमजीएसवाय’च्या धर्तीवर राज्यात ‘सीएमजीएसवाय’ अर्थात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विचाराधीन आहे. ‘पीएमजीएसवाय’चीच आर्थिक सोय नसताना राज्य सरकारने ‘सीएमजीएसवाय’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प अद्याप सुरू झाला नाही, त्याचे नियोजनही पूर्ण झालेले नाही. त्यासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद केली. हा निधी शासनाच्या तिजोरीत आरक्षित होऊन पडून आहे. राज्यात अर्धवट असलेल्या रस्ते व पुलांच्या निर्मितीसाठी तात्पुरता का होईना ‘पीएमजीएसवाय’मध्ये हा निधी वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ५० कोटी देण्याची तयारीवित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना कंत्राटदार भेटले असता ‘पीएमजीएसवाय’ ही केंद्र शासनाची योजना असल्याने केंद्रानेच त्यासाठी पैसे द्यावे, अशी भूमिका घेऊन शेवटी केवळ ५० कोटी रुपये देण्याची तयारी त्यांनी दर्शविली.