शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

काळदरी पुलाचे काम रखडले

By admin | Updated: July 12, 2017 01:29 IST

पुलाचे काम बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे सध्या रखडले असल्याने दळणवळणाची गैरसोय निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : काळदरी येथील धनकवडी रस्त्यावर थोपटेवाडीच्या ओढ्यावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या पुलाचे काम बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे सध्या रखडले असल्याने दळणवळणाची गैरसोय निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन तातडीने पुलाचे बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी काळदरी, बहिरवाडी, बांदलवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.काळदरी- धनकवडी रस्त्यावर असणारा हा पूल दरवर्षी अतिवृष्टीच्या काळात पाण्याखाली जातो. त्यामुळे वाहतुक पूर्णत: बंद होते. ग्रामस्थांच्या वारंवार पाठपुराव्यामुळे पुलासाठी निधी मंजूर झाला. बांधकाम विभागाने तातडीने ठेकेदाराची नियुक्ती करून प्रत्यक्षात दोन वषार्नंतर पुलाच्या कामास प्रारंभ करण्यात आला.सद्यस्थितीत जुना पूल पाडण्यात आलेला असून हंगामी स्वरूपात नळ्या टाकून रस्ता सुरू आहे. किरकोळ स्वरूपात पाऊस झाला तरी हंगामी रस्त्यावरून पाणी जात आहे. सद्या पिलरचे काम अपूर्ण असून उर्वरित काम रखडले आहे.पावसाळा तोंडावर असताना काम सुरू केलेले असून आतापर्यंत हे काम तातडीने पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हे काम सध्या रखडलेल्या अवस्थेत आहे. ग्रामस्थांनी वारंवार बांधकाम विभागात विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. दुरुस्तीचे काम अपुर्ण असल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.काळदरी हे गाव परींचे पासून १८ किमी अंतरावर आहे. शालेय विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना बाजारपेठेत जाण्यासाठी, तसेच वीर येथे बँकेत जाण्यासाठी हा एकमेव मार्ग उपलब्ध आहे. गेल्या दोन वर्षात या पुलावरून वारंवार पाणी गेल्यावर अंशत: गैरसोय होत होती मात्र आता जुना पूल पाडल्यामुळे पयार्यी लगतच्या पुलाखाली असणा-या पाइप मोकळ्याच असल्याने धोका निर्माण झाला आहे. दळणवळणाची गैरसोय झाल्याने ग्रामस्थांनी नवीन पुलाची मागणी केली होती. सध्या याच पुलाच्या रखडलेल्या कामामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी व ग्रामस्थ मेटाकुटीला आले आहेत. सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने एस. टी बसेस चालू आहेत. जोराचा पाऊस झाल्यास एसटी बंद करण्याचा इशारा डेपोच्या वतीने देण्यात आला आहे.