शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

राज्यभर ऊन-पावसाचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 01:04 IST

मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारीही पावसाचा जोर कायम राहिला. विशेषत: मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. शहर, पूर्व आणि

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारीही पावसाचा जोर कायम राहिला. विशेषत: मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत असतानाच ठरावीक अंतराने ऊनही पडत होते. परिणामी सकाळपासून सायंकाळपर्यंत ठिकठिकाणी अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी पडत असतानाच वातावरणातील बदलामुळे पडलेल्या उन्हाच्या कवडशाने मुंबापुरीत दिवसभर ऊन-पावसाचा खेळ रंगला होता.मुंबई शहरात सकाळी कुलाबा, फोर्ट, भायखळा, लालबाग, परळ, लोअर परेल, दादर, माटुंगा, गिरगाव, महालक्ष्मी, वरळी, माहीम आणि सायन येथे पावसाने जोरदार मारा केला. दुपारी मात्र पावसाने विश्रांती घेतली. पूर्व उपनगरातही सकाळी कुर्ला, घाटकोपर, भांडुप आणि मुलुंड येथे ठिकठिकाणी पावसाच्या मोठ्या सरी कोसळल्या आणि दुपारी काही क्षण पडलेले ऊन वगळता येथे दुपारीही पावसाचा मारा कायम राहिला. पश्चिम उपनगरात वांद्रे-कुर्ला संकुल येथे सकाळी पावसाने तुफान मारा केला. विलेपार्ले, माहीम, अंधेरी, बोरीवली आणि गोरेगाव येथे मात्र सकाळी तुरळक ठिकाणी पाऊस पडला. दुपारीही कमी-अधिक फरकाने येथे अशीच अवस्था होती. एकंदर मुंबईत ऊन-पाऊस असे दुहेरी वातावरण होते.- गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे; तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अनेक ठिकाणी, मराठवाड्यातही पाऊस नोंदविण्यात आला आहे. २२ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. २३ आणि २४ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. २५ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.रायगडमध्ये पावसाची संततधार सुरूच - रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून शुक्रवारी २४ तासांत सर्वाधिक १२७ मि.मी. पावसाची नोंद माथेरान येथे झाली आहे. महाड येथे ७६ मि.मी. तर पोलादपूर येथे ८२ मि.मी. पाऊस चोवीस तासात झाला आहे. सततच्या पावसामुळे गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाट प्रारंभाच्या ब्रिटिशकालीन पुलाला तडे गेल्याने हा पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. परिणामी रत्नागिरी-गोव्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहतुकीवर स्थानिक प्रशासनाने वाहतूक निर्बंध लागू केले आहेत. वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले असून, सद्यस्थितीत वाहतूक सुरू आहे. म्हसळा तालुक्यातील आंबेत येथे निवासी चाळीवर गुरुवारी दरड कोसळून सुमारे ९५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र येथे कोणीही जखमी झालेले नाही. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. पालघरमध्ये पावसाने घेतली उसंतमागील चार दिवसापासून पालघर जिल्ह्याला झोडपलेल्या पावसाने आज काहीशी उसंत दिली. जव्हारच्या नदीत वाहून गेलेल्या एका महिलेचा मृतदेह शुक्रवारी विक्र मगड मध्ये आढळून आला तर पहाटे मुंबई-अहमदाबाद राज्यमहामार्ग दोन कंटेनर मध्ये झालेल्या अपघाता मध्ये एक चालकाचा मृत्यू झाला.पालघर जिल्ह्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून लावणीची कामे जोरात सुरु होऊन अंतिम टप्प्यात पोहचली आहेत. शुक्रवारी जिल्ह्यातील सर्वाधिक ११८.६ मिमी इतका पाऊस तलासरी तालुक्यात पडला असून वसई तालुक्यात ४५.३ मिमी, वाडा तालुक्यात ९२.० मिमी, डहाणू ९४.९ मिमी, पालघर ३७ .५ मिमी, मोखाडा ४७.२ मिमी, विक्र मगड ३२.० मिमी तर सर्वात कमी पावसाची नोंद जव्हार २२.० मिमी झाली आहे. पडझड : पूर्व उपनगरात १, पश्चिम उपनगरात २ अशा एकूण ३ ठिकाणी बांधकामांचा भाग कोसळला. शहरात ५, पूर्व उपनगरात ५ आणि पश्चिम उपनगरात १५ अशी एकूण २५ ठिकाणी झाडे पडली. शहरात ६, पश्चिम उपनगरात ७ अशा एकूण १३ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. सुदैवाने या दुर्घटनांत मनुष्यहानी झाली नाही.मुंंबईसाठी अंदाज : कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांकरिता वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर आणि उपनगरात अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी कोसळतील. काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे.