शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या पदरी निराशाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2016 01:40 IST

अर्थसंकल्पामध्ये महिलांच्या प्रगतीच्या दृष्टीने विशेष तरतुदी असाव्यात, महिला आणि बाल कल्याण विकासासाठी भरीव योगदान दिले जावे

पुणे : अर्थसंकल्पामध्ये महिलांच्या प्रगतीच्या दृष्टीने विशेष तरतुदी असाव्यात, महिला आणि बाल कल्याण विकासासाठी भरीव योगदान दिले जावे, अशी अपेक्षा असते. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पाने महिलांच्या पदरी निराशाच टाकली आहे. गरीब महिलांच्या नावे एलपीजी सिलिंडर देण्यासाठी करण्यात आलेली २ हजार कोटींची तरतूद वगळता महिलांसाठी कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. स्वयंसिद्धा, इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना, बचत गटांसाठी लागणारा निधी, स्वाधार योजना किंवा प्रियदर्शिनीसारखी योजनांमध्ये कोणतीही भरीव तरतूद करण्यात आलेली नाही.केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत २०१६-१७ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये लहान उद्योग, कृषी, पायाभूत सुविधा यांवर विशेष भर देण्यात आला असला, तरी महिलांसाठी कोणतेही पॅकेज अथवा योजना जाहीर करण्यात आलेली नाही. अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ करून त्यांनी महिलांच्या अडचणींत भरच टाकली आहे, असे मत अनेक जाणकार महिलांनी व्यक्त केले.एकूण खर्चापैकी स्त्रियांसाठी होणारा खर्च मागील अर्थसंकल्पामध्ये ४.५ टक्के होता. यंदा तो ४.५८ टक्के करण्यात आला आहे. वाढत्या महागाईचा विचार करता, ही वाढ नगण्य असल्याचे मत जनवादी महिला संघटनेच्या किरण मोघे यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ‘‘महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या योजनांच्या आणि कायद्यांच्या काटेकोर अंमलबजावणीची गरज आहे. मात्र, समाजातील वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली दखल सरकारकडून यंदाच्या अर्थसंकल्पात घेण्यात आलेली नाही.’’शेतकऱ्यांचे उत्पन्न पुढील ५ वर्षांत दुप्पट करण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. प्रत्यक्षात २०१४-१५च्या अर्थसंकल्पात असणाऱ्या २२,३०९ कोटी रुपयांच्या तरतुदीपेक्षा यंदा करण्यात आलेली २०,४०० कोटी रुपयांची तरतूद कमी आहे. संबंधित विभागाने नाराजी दर्शविल्यानंतर मागील वर्षी ही तरतूद १७,३५२ कोटी करण्यात आली होती. (प्रतिनिधी)यंदाच्या अर्थसंकल्पात गरीब महिलांच्या नावे एलपीजी सिलिंडर दिले जाणार असून, त्यासाठी २ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. १७ लाख कुटुंबांना एलपीजी सिलिंडर देण्यात येणार आहे. एलपीजी सिलिंडरच्या माध्यमातून स्त्रीला जीवनावश्यक मूलभूत गरजेचा स्रोत उपलब्ध झाला आहे. इंडिया स्टँडअप योजनेचाही महिला उद्योजकांना लाभ होणार आहे. या योजनेच्या निमित्ताने महिलांना उद्योग-व्यवसायासाठी चालना मिळणार आहे. अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदीनुसार, प्रत्येक ग्रामपंचायतीला ८० लाख रुपयांचा निधी दिला जाईल. ग्रामपंचायतींमध्ये महत्त्वाच्या पदांवर असलेल्या महिला या निधीचा योग्य विनियोग करु शकतील.- उषा काकडे, अध्यक्षा, यूएसके फाउंडेशन