शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

सातबारा व घराच्या नोंदीवर महिलांची पाटी कोरीच

By admin | Updated: June 9, 2015 00:30 IST

आश्‍वासन हवेतच; चिचपूर ग्रामपंचायतचा ठरावही बेदखल.

राजेश शेगोकार/बुलडाणा : महिलांचे सबलीकरण करण्याच्या दृष्टीने त्यांना समान हक्क देऊन शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ५0 टक्के जागा राखीव केल्या. मात्र सातबार्‍यावर महिलांचे नाव तसेच घरांची नोंद पती-पत्नी या दोघांच्या नावे करण्याबाबत शासन स्तरावर कमालीची उदासीनता दिसून येते.बुलडाणा जिलतील मोताळा तालुक्यातील चिचपूर या ग्रामपंचायतने सातबार्‍यावर महिलांच्या नावाची नोंद घेण्याचा ठराव डिसेंबर २00८ मध्ये घेतला. हा ठराव सूचविणार्‍या तत्कालीन उपसरपंच शकुंतला मापारी यांचे राज्य शासनाकडून कौतुकही झाले. तत्कालीन महसूल मंत्री डॉ.पतंगराव कदम यांनी हा निर्णय राज्यभर लागू करू, असे हिवाळी अधिवेशनात जाहिरही केले होते. प्रत्यक्षात मात्र तसा आदेश निघालाच नाही व सातबार्‍यावर अर्धांगिनीचे नाव आले नाही. शासनाने तसा आदेशच काढला नसल्याने तलाठीही सातबार्‍यावर दोघांच्या नावाची नोंद घेत नाही.असाच प्रकार घराची नोंद करताना महिलेचे नाव लावण्याबाबत झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने २0 नोव्हेंबर २00३ रोजी परिपत्रक काढून घराची नोंद करताना पती पत्नी दोघांच्या नावाने करावी असे सूचित केले; मात्र या आदेशाचीही राज्यभरात कुठेही अंमलबजावणी झालेली नसल्याचे आढळूल आले आहे. पतीच्या निधनानंतर पतीच्या मालमत्तेमध्ये हक्क प्रस्थापित करताना महिलांना अनेक कायदेशीर अडचणीना समोर जावे लागते. आधीच पती-पत्नीचे हक्क महसूली दफ्तरात असतील, तर अशा अडचणी येऊ नये, हा यामागे शासनाचा उद्देश आहे. प्रत्यक्षात अनेक ग्रामपंचायतींकडे हे परिपत्रक पोहचलेच नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. महिला सक्षमीकरणाबाबत हे दोन्ही निर्णय महत्वपूर्ण असून, याबाबत ग्रामविकास खात्याने पुढाकार घेण्याची गरज आहे.