शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी सक्षम व्हायला हवे : अमृता फडणवीस

By admin | Updated: February 8, 2016 02:18 IST

आपल्याकडे महिलांना कायम पुरुषांची सावली म्हणून पाहिले जाते. परंतु ही प्रतिमा बदलण्यासाठी महिलांनी स्वत:ला आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करायला हवे

पुणे : आपल्याकडे महिलांना कायम पुरुषांची सावली म्हणून पाहिले जाते. परंतु ही प्रतिमा बदलण्यासाठी महिलांनी स्वत:ला आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करायला हवे. त्यामुळे देशाचा विकास होण्यास निश्चितच मदत होईल, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटच्या १८व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित जीवनगौरव व राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यादरम्यान त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक संचालक डॉ. संजय चोरडिया, सुषमा चोरडिया, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू व आॅल इंडिया अ‍ॅँटी टेररिस्ट फ्रंटचे अध्यक्ष एम.एस. बिट्टा उपस्थित होते. या वेळी आचार्य ब्रह्मऋषी गुरुवानंद स्वामी यांना ‘सूर्यरत्न -आधुनिक युगाचे संत’ हा पुरस्कार देण्यात आला. तर पद्मभूषण डॉ. सत्यव्रत शास्त्री, न्यायमूर्ती पी. बी . सावंत, प्यारेलाल शर्मा, पद्मभूषण राजन व साजन मिश्रा, दिलीप छाब्रिया, डॉली ठाकूर, मोतिलाल ओसवाल, उदित नारायण यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पवनकुमार रुईया, अंजली गोपालन, राजेंद्र मेहता, लीना मोगरे, दिनेश नाथानी, मानवेन्द्रसिंग गोहिल, डॉ. रणजित जगताप, विवेक वेलणकर, प्रदीप लोखंडे, सुधीर गोयल, सायली आगवणे, निलाद्री कुमार व अमृता फडणवीस यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले. फडणवीस म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांची पत्नी ही माझी ओळख असली तरी त्यापलीकडे जायला मला आवडते. देशसेवेची सुरुवात ही कुटुंब आणि समाजसेवेपासून व्हायला हवी. मुख्यमंत्रीही सामाजिक कामाला कायम प्रोत्साहन देतात. मी पुरस्कार कधीही परत करणार नाही, कारण पुरस्कार परत करणे हा तो देणाऱ्याचा अपमान करण्यासारखे असते. पुरस्कार हा प्रसादासारखा असल्याने तो कधीही परत केला जात नाही. श्याम जाजू म्हणाले, समाजाचे परिवर्तन करणे ही केवळ सरकारची नाही तर प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. समाज, त्यातील लोक, परिस्थिती सारखीच आहे मात्र पंतप्रधान ती ज्या पद्धतीने मांडत आहेत ती विशेष आहे. येत्या ५ वर्षांत इन्स्टिट्यूटचे रूपांतर विद्यापीठात करणार असल्याचे डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले. या वेळी फडणवीस यांनी ‘अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम’ हे भजनही सादर केले. सूत्रसंचालन जयकिशन शर्मा यांनी केले.