शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलीसही होणार ‘इन्चार्ज’

By admin | Updated: May 24, 2017 02:59 IST

खाकी वर्दीचे कर्तव्य जपण्यासाठी पुरुषांप्रमाणेच वेळेची पर्वा न करता मिळेल ती जबाबदारी आणि ड्युटी बजावत असून

जमीर काझी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : खाकी वर्दीचे कर्तव्य जपण्यासाठी पुरुषांप्रमाणेच वेळेची पर्वा न करता मिळेल ती जबाबदारी आणि ड्युटी बजावत असूनही केवळ स्त्री असल्याने सापत्नपणाची वर्तणूक मिळणाऱ्या राज्य पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी, अंमलदारांसाठी एक खूशखबर आहे. महिला पोलिसांना त्यांची ज्येष्ठता व कार्यक्षमतेनुसार आता पोलीस ठाणे व विविध शाखा, विभागातील प्रभारी, महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी त्याबाबत सर्व पोलीस घटकप्रमुुखांना सूचना केल्या आहेत. सर्व आयुक्त व अधीक्षकांनी आपापल्या कार्यकक्षेतील कार्यक्षम महिला अधिकारी, अंमलदारांना पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी (इन्चार्ज)सह महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करावी, त्याबाबतचा कार्यअहवाल पाठवावा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. राज्य पोलीस दलात दोन लाख दहा हजारांवर मनुष्यबळ कार्यरत आहे. त्यात महिलांचे प्रमाण साडेसात टक्के म्हणजे २६ हजार इतके आहे. अन्य विविध कार्यक्षेत्रे व विभागाप्रमाणेच पोलीस दलातील या महिला अधिकारी, अंमलदार पुरुषांच्या बरोबरीने कर्तव्य बजावत आहेत. मात्र काही अपवाद वगळता बहुतेक महिला पोलिसांना पुरुषांच्या तुलनेत दुय्यम दर्जाचे काम दिले जाते. त्यात वायरलेस, आरोपी पार्टी,बंदोबस्त अशा ड्युट्या दिल्या जातात. त्याबाबत महिला पोलिसांकडून अप्रत्यक्ष व्यक्त होत असललेली नाराजी लक्षात घेऊन महासंचालक माथूर यांनी सर्व पोलीस घटकप्रमुखांना सूचना केल्या आहेत. ज्या महिला अधिकारी, अंमलदार महत्त्वाच्या ठिकाणी, कार्यकारी पदावर (एक्झिक्युटिव्ह) पदावर काम करण्यास इच्छुक आहेत आणि त्या सक्षम असल्यास त्यांची तेथे नियुक्ती करावी, त्याचप्रमाणे पोलीस ठाण्याचे प्रभारीपद, महिला व बालकाच्या संबंधी गुन्ह्यांच्या तपासकामांमध्ये त्यांच्याकडे प्रमुख जबाबदारी देण्याबाबत प्रामुख्याने विचार करावा, या वर्षाच्या सर्वसाधारण बदल्या झाल्यानंतर आपल्या कार्यक्षेत्रात उपलब्ध महिला पोलिसांचा आढावा घेऊन त्यानुसार त्यांना महत्त्वाची जबाबदारी सोपविण्याबाबत निर्णय घेण्यात यावा. त्याबाबतचा कार्यअहवाल मुख्यालयात पाठवावा, असे आदेश दिले आहेत. यासंबंधी १४ जूनला होणाऱ्या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. भ्रष्टाचाराला आळा बसण्याची अपेक्षाभ्रष्टाचारात पोलीस विभागाचा क्रमांक अव्वल आहे. त्यामुळे पुरुष अधिकारी, अंमलदारांच्या तुलनेत महिलांकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवल्यास त्यांच्याकडून होणारा गैरव्यवहार, भ्रष्टाचारालाही काही प्रमाणात लगाम बसू शकतो, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. अन्य शासकीय विभागाप्रमाणेच पोलीस दलातील महिला अधिकारी, अंमलदार आपले कर्तव्य सक्षमपणे बजावत आहेत. त्यामुळे केवळ महिला असल्याने त्यांना पोलीस ठाण्याचे प्रभारी पद व अन्य महत्त्वाच्या जबाबदारीपासून वंचित ठेवणे अयोग्य आहे. त्यामुळे सक्षम असणाऱ्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्याबाबत सर्व घटकप्रमुखांना सूचना केल्या आहेत.- सतीश माथूर, पोलीस महासंचालक