शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
3
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
4
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
5
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
8
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
9
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
11
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
12
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
13
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
14
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
15
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
16
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
17
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
18
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
19
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
20
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला

नेवाळी आंदोलनात महिला पोलिसांचा विनयभंग

By admin | Updated: June 24, 2017 11:16 IST

ग्रामस्थांनी जाळपोळ, दगडफेकीबरोबरच महिला पोलिसांचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे

ऑनलाइन लोकमत

कल्याण, दि. 24- विमानतळाच्या जागेतील शेतजमिनी परत मिळाव्या यासाठी नेवाळी, भाल परिसरात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केलं. गुरुवारी हिंसक आंदोलन करणाऱ्या नेवाळी येथील ग्रामस्थांनी जाळपोळ, दगडफेकीबरोबरच महिला पोलिसांचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. या प्रकरणी उल्हासनगरच्या हिललाइन पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.  डीएनए या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. आंदोलनकर्त्यांनी महिला पोलीसाचा गणवेश फाडल्याचं हीललाइन पोलीस स्टेशनमध्ये दाखळ झालेल्या एफआयआरमध्ये म्हंटलं आहे. 
 
आपल्या जमिनीसाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवरही हल्ला केला. या हल्ल्यात 12 पोलीस जखमी झाले होते. यामध्ये चार महिलांचाही समावेश होता. खरंतर आंदोलनात महिला आंदोलकांची संख्याही मोठय़ा प्रमाणावर असल्याने पोलिसांच्या तुकडीत महिला पोलीसही मोठय़ा संख्येने होते. विनयभंगाच्या गुन्ह्य़ासह साहाय्यक पोलीस आयुक्तांसह १२ पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा हिललाइन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
 
ठाणे पोलीस विभागाने कल्याणमधील नेवाळी, खोनी आणि भाल या गावातील 700 जणांच्या विरोधात चार एफआयआर दाखल केले आहेत. खून करणं, दंगल घडविणं तसंच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनावेळी झालेल्या घटनांचे स्वरूप पाहता तेथील हिंसाचार पूर्वनियोजित होता, असं हिललाइन पोलीस स्टेशन आणि मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. याप्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्यांच्या अटकेची प्रक्रिया सध्या सुरू आहे. उपचारासाठी ज्या आंदोलनकर्त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे त्यांना तेथूनच अटक होऊ शकते, अशी माहिती ठाणे पोलिसांनी डीएनएला दिली आहे. 
 
नेवाळीतील हिंसाचार पूर्वनियोजित?
विमानतळाच्या जागेतील शेतजमिनी परत मिळाव्या यासाठी नेवाळी, भाल परिसरात शेतकऱ्यांच्या आंदोलनावेळी झालेल्या घटनांचे स्वरूप पाहता तेथील हिंसाचार पूर्वनियोजित होता, असा आरोप पोलीस आणि संरक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी केला. छायाचित्रे काढून देण्यास केलेला विरोध, वाहने जाळणे, वाहतूक रोखून धरणे हे नियोजनबद्धरित्या सुरू होते, असा त्यांचा दावा आहे. या भागातील विकास प्रकल्पांमुळे जमिनींना आलेल्या भावामुळे शेतकऱ्यांना पुढे करून काही राजकीय नेत्यांनी या आंदोलनावर आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पोलिसांना लाकडी दांडके, लोखंडी रॉडने झालेली मारहाण पाहता आंदोलक पुरेशा तयारीनिशी आल्याचाही त्यांचा दावा आहे. आंदोलकांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले असून पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने लाठीमार केल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा प्रत्यारोप केला आहे.
नेवाळीच्या जागेचा सातबारा संरक्षण खात्याच्या नावावर असल्याचा त्यांच्या जनसंपर्क विभागाचा दावा आहे. हे प्रकरण न्यायालयात असताना, याबाबत वेगवेगळ््या विभागांना निवेदने दिली असताना आंदोलन केले जाते. ते शांततेत पार पडेल, असे सांगितले जात असताना जाळपोळ सुरू होते. पोलिसांना लक्ष्य करून मारले जाते. दगडफेक होते. वाहने जाळली जातात. त्या आंदोलकांची छायाचित्रे काढू दिली जात नाहीत, हे नियोजनबद्ध असल्याचे दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
विमानतळाच्या जागेवरील संरक्षण खात्याचा अधिकार केंद्र सरकार, राज्य सरकारने मान्य केला आहे. त्या जागेची भरपाईही देण्यात आली आहे. त्यानंतरही तेथे शेती केली जात असली, आता भिंत बांधल्यामुळे तेथे प्रवेश करता येणार नाही. त्यातून वहिवाट बंद होईल आणि लाखमोलाच्या जमिनीवर दावा सांगता येणार नाही, यामुळेच हे आंदोलन करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आंदोलकांच्या नेत्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले. पोलिसांनी महिलांवर लाठीहल्ला केल्याने त्यांच्यावर दगडफेक झाली; हा आयत्यावेळचा उद्रेक होता, असा दावा त्यांनी केला. मात्र गाड्या जाळणे, टायर जाळणे, पोलिसांना दंडुक्याने मारणे याबाबत त्यांनी काहीही भाष्य केले नाही.