शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
4
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
5
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
6
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
7
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
8
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
9
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
10
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
11
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
12
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
13
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
14
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
15
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
16
जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले
17
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
18
या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!
19
Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
20
टीम इंडियातील खेळाडूंना कोच गौतम गंंभीर देणार डिनर पार्टी; पण 'तो' आला तर प्लॅन फिस्कटण्याची भीती

महिला तक्रार निवारण समिती

By admin | Updated: September 22, 2016 02:19 IST

गेली तीन वर्षे केवळ कागदावरच असलेली पीएमपीएमएलमधील महिला तक्रार निवारण समिती पुन्हा कार्यरत झाली

पुणे : गेली तीन वर्षे केवळ कागदावरच असलेली पीएमपीएमएलमधील महिला तक्रार निवारण समिती पुन्हा कार्यरत झाली आहे. पीएमपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून, मागील तीन महिन्यांत समितीने तीन तक्रारींची चौकशी सुरू आहे. त्यातील दोन प्रकरणांमध्ये चौकशीसाठी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, एका कर्मचाऱ्याला चौकशीची नोटीस बजाविण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी पीएमपीच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीमधील स्वच्छतागृहात मोबाईलद्वारे छायाचित्रण झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर तातडीने ही समिती कार्यरत करण्यात आली आहे.राज्यशासनाच्या आदेशानुसार, शासकीय कार्यालयांमध्ये महिलांना होणाऱ्या त्रासाला आळा घालण्यासाठी पीएमपी प्रशासनाने २0१३ मध्ये ही समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात किरकोळ तक्रारी वगळता या समितीकडे फारशा तक्रारी येत नसल्याने ही समिती कागदावरच शिल्लक होती. मात्र, गेल्या वर्षभरात महिलांसंदर्भातील तक्रारी वाढल्या असल्याने तसेच तक्रार करण्यासाठी महिलाही पुढे येत असल्याने काही महिन्यांपूर्वी बीआरटीचा पदभार स्वीकारलेल्या कोल्हे यांनी या समितीची नव्याने नियुक्ती केली आहे. याबाबतचे माहितीफलकही पीएमपी कार्यालयाच्या परिसरात लावण्यात आलेले असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.तक्रारींमध्ये प्रामुख्याने पाठलाग करणे, मानसिक त्रास देणे, कामाच्या ठिकाणी अडवणूक करणे अशा प्रकारच्या तक्रारी असल्याचेही त्या म्हणाल्या. >तीन वर्षांत सहा तक्रारी पीएमपीच्या महिला तक्रार निवारण कक्षाकडे गेल्या तीन वर्षांत सुमारे सहा तक्रारी आल्या असून, त्यातील तीन तक्रारी मागील सहा महिन्यांच्या आतील आहेत. याशिवाय काही चालक वाहकांच्या पत्नीही या समितीकडे तक्रार घेऊन येत आहेत.मात्र, या तक्रारी समितीच्या कक्षेत येत नसल्याने या तक्रारी घेण्यात आलेल्या नसल्या तरी त्यांनी तक्रार कोठे करावी, याबाबत या महिलांना समितीकडून मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे कोल्हे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.याशिवाय गैरसमजातून अथवा किरकोळ स्वरूपात या तक्रारी असल्यास त्या समितीपुढे येण्याआधी दोन्ही पक्षांना तडजोडीची संधी मिळावी यासाठी तडजोड समितीही स्थापन करण्यात आल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले.