शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

महिलाच जगातील सर्वोत्कृष्ट अर्थतज्ज्ञ

By admin | Updated: December 22, 2016 01:40 IST

जगातील सर्वोत्कृष्ट अर्थतज्ज्ञ महिलाच आहेत. स्त्री कुटुंबाचा कणा असते. स्त्री एक चांगली आई असते. कारण कुठल्याही

बारामती : जगातील सर्वोत्कृष्ट अर्थतज्ज्ञ महिलाच आहेत. स्त्री कुटुंबाचा कणा असते. स्त्री एक चांगली आई असते. कारण कुठल्याही आईला जर विचारले, की तुला आयुष्यात काय करायचे आहे. तेव्हा ती म्हणते, मला माझ्या मुलांना शिकवायचे आहे. ती त्यासाठी काटकसर करते, प्रसंगी तडजोड करते. एक स्त्री शिकली, की कुटुंबाची प्रगती होते. ‘स्वयंसिद्ध व्हा’ हा संदेशच या युवती संमेलनातून मिळतो आहे, असे मत रुरल रिलेशनचे संस्थापक प्रदीप लोखंडे यांनी व्यक्त केले. अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित शारदाबाई पवार महिला महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित स्वयंसिद्धा युवती संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी संस्थेच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी युवतींना मार्गदर्शन केले. प्राचार्य राजकुमार देशमुख यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात स्वयंसिद्धा युवती संमेलनात चार दिवसांच्या चाललेल्या संमेलनाचा आढावा घेतला. युवतींना संमेलनाला पाठविणाऱ्या रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील, प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव संदीप कदम व सर्व महाविद्यालयांच्या प्रचार्य, प्राध्यापक व पालकांचे आभार मानले. प्रा. आर. एस. लोहकरे यांनी स्वयंसिद्धा युवती संमेलनाच्या कार्यक्रमाचे अहवालवाचन केले. स्वयंसिद्धा युवती संमेलनातील सर्वोतकृष्ट विद्यार्थिनी म्हणून श्रीरामपूर येथील बोरावके महाविद्यालायाची गीता काकासाहेब मुळे, सासवडच्या वाघिरे महाविद्यालयाची भावना मंगेश बोरकर, शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालायाची पूजा विलास पंदरकर यांची निवड करण्यात आली. त्यांना सुनंदा पवार, प्रदीप लोखंडे, प्राचार्य डॉ. आर. जी. पवार यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे समन्वयक प्रल्हाद जाधव यांनी दीपोत्सवाचे संचालन केले व स्त्री-भ्रूणहत्या न करण्याचा संकल्प करण्यास सांगितले. प्रत्येकाने अंतरीचा दिवाही प्रज्वलित ठेवावा, असे आवाहन केले. या वेळी स्वयंसिद्धा संमेलनातील युवती व सर्व उपस्थितांनी पणती प्रज्वलित केली. ‘ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो’ या गीताने सभागृहातील वातावरण भारावून गेले. त्यानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.