शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
3
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
4
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
5
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
6
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
7
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
8
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
9
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
10
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
11
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
12
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
13
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
14
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
15
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
16
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
17
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
18
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
19
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
20
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यग्रहणाशी डोळे भिडवलेल्या महिलेने सुदृढ कन्येस दिला जन्म; अंधश्रद्धेचे ग्रहण कायमचं सुटलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 15:57 IST

ग्रहण काळात जे जे करायचे नाही, ते ते सर्व या गर्भवती महिलेने धाडसाने केले. सासू सिंधुताई, पती चंदन, दीर दिपक यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन मिळाले.

इस्लामपूर – अंधश्रद्धेत अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी येथील सावित्रीच्या लेकीने सात महिन्याची गर्भवती असताना ग्रहणकाळात भाजी चिरली, फळे तोडली, अन्न ग्रहण केले. मांडीवर मांडी घालून बसली, सोलर चष्म्यातून तिने थेट ग्रहणात काळवंडलेल्या सूर्याशी डोळेही भिडवले. ग्रहण काळात जे करायचे नाही ते करुन दाखवत, तिने कोणतेही व्यंग नसलेल्या सुदृढ कन्येला जन्म देत या अंधश्रद्धेला मूठमाती दिली आहे.

समृद्धी चंदन जाधव असं तिचं नाव आहे. २१ जूनला सूर्यग्रहण होते, ग्रहणाचे गर्भवती महिलांवर वाईट परिणाम होतात. तिने ग्रहण लागण्यापूर्वी अंघोळ करावी, ग्रहण सुटल्यावर अंघोळ करावी. मधल्या काळात काही खाऊ-पिऊ नये, देव-धर्म जप करावा, कोणतीही हालचाल करु नये, नाही तर होणारे अपत्य व्यंगत्व घेऊन जन्माला येते अशी अंधश्रद्धा अद्याप आहे. तिला समृद्धी जाधव यांनी अंनिसच्या साथीने छेद दिला.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संजय बनसोडे, डॉ. नितीन शिंदे, प्रा. बी. आर जाधव, प्रा. तृप्ती थोरात, डॉ. प्रमोद गंगनमाले, योगेश कुदळे, प्रा. विष्णू होनमारे, अवधूत कांबळे, प्रशांत इंगळे यांनी जाधव कुटुंबियांचे प्रबोधन करत, ग्रहण काळामध्ये मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही, गर्भवती महिलेवर किंवा होणाऱ्या बाळावरसुद्धा कोणताही परिणाम होत नाही असा विश्वास दिला. त्यामुळे हे कुटुंबीय अंधश्रद्धा झुगारुन देण्यास तयार झाले. ग्रहण काळात जे जे करायचे नाही, ते ते सर्व या गर्भवती महिलेने धाडसाने केले. सासू सिंधुताई, पती चंदन, दीर दिपक यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन मिळाले.

ग्रहणाचा मानवी जीवनावर गर्भवती महिलेवर किंबहुना तिच्या बाळावर कोणताही परिणाम होत नाही. हा माझा अनुभव आहे. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी माझे व माझ्या कुटुंबाचे प्रबोधन केल्यामुळे हे धाडसाचे पाऊल उचलू शकले – समृद्धी जाधव

अंनिसच्या पुढाकाराने येथील गर्भवती महिलेने स्वत: ग्रहण पाहिले, तिने सुदृढ कन्येला जन्म दिला आहे. त्यामुळे ग्रहणाचा मानवी जीवनावर कसलाही परिणाम होत नसल्याचं सिद्ध झाले आहे. – संजय बनसोडे, प्रधान सचिव, अंनिस

बाळाची वाढ पहिल्या तीन महिन्यातच पूर्ण होते, अशावेळी ग्रहण पाहिल्याने किंवा शारिरीक हालचाल वा कृती केल्याने बाळाला व्यंगत्व येते, ही अंधश्रद्धा आहे – डॉ. सीमा पोरवाल, प्रसूती तज्ज्ञ, इस्लामपूर

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहणWomenमहिला