शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

सूर्यग्रहणाशी डोळे भिडवलेल्या महिलेने सुदृढ कन्येस दिला जन्म; अंधश्रद्धेचे ग्रहण कायमचं सुटलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 15:57 IST

ग्रहण काळात जे जे करायचे नाही, ते ते सर्व या गर्भवती महिलेने धाडसाने केले. सासू सिंधुताई, पती चंदन, दीर दिपक यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन मिळाले.

इस्लामपूर – अंधश्रद्धेत अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी येथील सावित्रीच्या लेकीने सात महिन्याची गर्भवती असताना ग्रहणकाळात भाजी चिरली, फळे तोडली, अन्न ग्रहण केले. मांडीवर मांडी घालून बसली, सोलर चष्म्यातून तिने थेट ग्रहणात काळवंडलेल्या सूर्याशी डोळेही भिडवले. ग्रहण काळात जे करायचे नाही ते करुन दाखवत, तिने कोणतेही व्यंग नसलेल्या सुदृढ कन्येला जन्म देत या अंधश्रद्धेला मूठमाती दिली आहे.

समृद्धी चंदन जाधव असं तिचं नाव आहे. २१ जूनला सूर्यग्रहण होते, ग्रहणाचे गर्भवती महिलांवर वाईट परिणाम होतात. तिने ग्रहण लागण्यापूर्वी अंघोळ करावी, ग्रहण सुटल्यावर अंघोळ करावी. मधल्या काळात काही खाऊ-पिऊ नये, देव-धर्म जप करावा, कोणतीही हालचाल करु नये, नाही तर होणारे अपत्य व्यंगत्व घेऊन जन्माला येते अशी अंधश्रद्धा अद्याप आहे. तिला समृद्धी जाधव यांनी अंनिसच्या साथीने छेद दिला.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संजय बनसोडे, डॉ. नितीन शिंदे, प्रा. बी. आर जाधव, प्रा. तृप्ती थोरात, डॉ. प्रमोद गंगनमाले, योगेश कुदळे, प्रा. विष्णू होनमारे, अवधूत कांबळे, प्रशांत इंगळे यांनी जाधव कुटुंबियांचे प्रबोधन करत, ग्रहण काळामध्ये मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही, गर्भवती महिलेवर किंवा होणाऱ्या बाळावरसुद्धा कोणताही परिणाम होत नाही असा विश्वास दिला. त्यामुळे हे कुटुंबीय अंधश्रद्धा झुगारुन देण्यास तयार झाले. ग्रहण काळात जे जे करायचे नाही, ते ते सर्व या गर्भवती महिलेने धाडसाने केले. सासू सिंधुताई, पती चंदन, दीर दिपक यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन मिळाले.

ग्रहणाचा मानवी जीवनावर गर्भवती महिलेवर किंबहुना तिच्या बाळावर कोणताही परिणाम होत नाही. हा माझा अनुभव आहे. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी माझे व माझ्या कुटुंबाचे प्रबोधन केल्यामुळे हे धाडसाचे पाऊल उचलू शकले – समृद्धी जाधव

अंनिसच्या पुढाकाराने येथील गर्भवती महिलेने स्वत: ग्रहण पाहिले, तिने सुदृढ कन्येला जन्म दिला आहे. त्यामुळे ग्रहणाचा मानवी जीवनावर कसलाही परिणाम होत नसल्याचं सिद्ध झाले आहे. – संजय बनसोडे, प्रधान सचिव, अंनिस

बाळाची वाढ पहिल्या तीन महिन्यातच पूर्ण होते, अशावेळी ग्रहण पाहिल्याने किंवा शारिरीक हालचाल वा कृती केल्याने बाळाला व्यंगत्व येते, ही अंधश्रद्धा आहे – डॉ. सीमा पोरवाल, प्रसूती तज्ज्ञ, इस्लामपूर

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहणWomenमहिला