शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

अवकाळीचे १० कोटी वाटपाविना पडून

By admin | Updated: October 8, 2015 05:03 IST

अमरावती विभागात फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती व फळपिकांच्या नुकसानीकरिता शासनाने ५१ कोटी १९ लाख १४ हजारांचा निधी उपलब्ध केला होता

अमरावती : अमरावती विभागात फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती व फळपिकांच्या नुकसानीकरिता शासनाने ५१ कोटी १९ लाख १४ हजारांचा निधी उपलब्ध केला होता. यापैकी १० कोटी २२ लाख ५० हजारांच्या निधीचे वाटप बाकी आहे. हे वाटप ८० टक्के असून ९ हजार ६५० शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.अमरावती विभागासाठी २५ मे रोजीच्या निर्णयानुसार २१ कोटी २४ लाख ९४ हजार व ८ जुलैच्या आदेशान्वये २९ कोटी ९५ लाख असा ६४ लाख ९७ हजारांचा निधी उपलब्ध करून दिला होता. ६४ हजार ९८८ खातेदार शेतकऱ्यांच्या खात्यात ४० कोटी ९७ लाख ४४ हजार रुपयांचा निधी जमा केला आहे. परंतु अद्याप ९,६५० शेतकऱ्यांना १० कोटी २२ लाख ५० हजार रुपयांच्या मदतनिधीचे वाटप व्हायचे आहे. वाटपाची ही टक्केवारी ८०.०३ टक्के आहे. अमरावती जिल्ह्णात २,०३२ शेतकऱ्यांना १ कोटी १९ लाख रुपयांचे वाटप अद्याप व्हायचे असून अकोला जिल्ह्णात ९७ शेतकऱ्यांना १ कोटी २ लाखांचे वाटप बाकी आहे. यवतमाळ जिल्ह्णात ५,१२० शेतकऱ्यांना ६ कोटी ११ लाख ३८ हजारांचे वाटप अद्याप झालेले नाही. बुलडाणा जिल्ह्णात ३७ हजार, वाशिम जिल्ह्णात २४०१ शेतकऱ्यांना १ कोटी ८५ हजार ७६ हजारांचे वाटप बाकी आहे.