शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही - रामदास कदम

By admin | Updated: June 10, 2017 19:28 IST

शेतक-यांना कर्जमाफी दिल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी हिंगोलीत पत्रकार परिषदेत सांगितले.

ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 10 - मुख्यमंत्री अभ्यासाच्या नावाखाली वेळकाढू भूमिका घेत असून शेतक-यांना कर्जमाफी देण्यासाठी कोणत्याही समितीची गरज नाही. शेतक-यांची अतिशय वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे कर्जमाफी दिल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी हिंगोलीत पत्रकार परिषदेत सांगितले.
 
पुढे ते असेही म्हणाले की, आम्ही शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने हा दौरा करीत आहोत. या अभियानात पदाधिकारी नियुक्ती व जबाबदारी निश्चिती केली जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे १५ ते १७ जून या काळात कालावधीत शेतक-यांशी संवाद साधणार आहेत. 
 
शेतकयांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. मुख्यमंत्री कर्जमाफीला तयार आहेत तर मग मागचे तीन महिने काय केले? सुकाणू समिती हे चालढकलीचे प्रयत्न आहेत. त्याची गरजच काय? असा सवाल केला. मुख्यमंत्र्यांची निवडणुकीची तयारी असेल तर शिवसेनाही तयार आहे. त्यांना सत्ता भोगण्यासाठी शिवसेनेची मदत लागते अन् बारामतीत जावून राष्ट्रवादी काँग्रेसशी चुंबाचुंबी करतात. ७0 हजार कोटींचा सिंचन घोटाळा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसवाले आम्हाला सत्तेतून बाहेर का पडत नाहीत, असे विचारत आहेत. हे म्हणजे सौ चुहे खाके बिल्ली चली हज को, असा प्रकार आहे, अशीही खोचक टीका कदम यांनी केली
 
काँग्रेस व राष्ट्रवादीची मंडळीच शेतक-यांचे हाल होण्यास जबाबदार आहे. तर आता केंद्र व राज्यात दोन्हीकडे सत्ता असून भाजप कर्जमाफीवर निर्णय घेत नाही. बुलेट ट्रेनची काय गरज आहे. त्यावर खर्च करायला पैसा आहे. शेतक-याला राजा म्हणायचे अन् तो दारिद्र्यात खितपत मरतोय तरीही पहायचे नाही. शेतकºयांच्या प्रश्नावर राजकारण योग्य नाही. तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा पाच महिने लावले तर आणखी ५00 शेतक-यांचा बळी जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
 
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर कदम म्हणाले, शेतक-यांचा जगण्याचा हक्क आहे. त्यांना त्यांच्या रास्त मागण्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचाही अधिकार आहे. तो कर्जमुक्त व्हावा, स्वाभिमानी व्हावा, त्याच्या मालाला निदान उत्पादनखर्चापेक्षा जास्त भाव मिळावा, हीच त्याची भूमिका आहे. शासनलेखी १२५ रुपये मजुरीचा दर आहे. प्रत्यक्षात ५00 मोजावे लागतात. खते, बियाणांचे दरही वाढले. मग त्याच्या मालाचा भाव किती असावा, हे योग्य पद्धतीने ठरलेच पाहिजे. शेतक-यांचे कोणतीही प्रश्न असो शिवसेना कायम त्यांच्या पाठीशी उभी राहिली. समृद्धी महामार्गाचा प्रश्न असो, कर्जमाफीचा असो की अन्य कुठलाही. भविष्यातही हीच भूमिका कायम राहील. यावेळी आ.जयप्रकाश मुंदडा, आ.हेमंत पाटील, आ. नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाप्रमुख संतोष बांगर आदींची उपस्थिती होती.
 
""ब्राह्मणाचा मंत्र वापरतील""
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभ्यासू आहेत. ते वकील आहेत. ते कायम अभ्यास करीत राहतात. त्यांना सगळे मंत्र माहिती आहेत. कोणाला ईडीत(अंमलबजावणी संचलनालय ) अडकवायचे, कोणाची चौकशी लावायची हे त्यांना माहिती आहे. शेतकरी कर्जमाफीसाठीही ते असाच ब्राह्मणाचा मंत्र वापरतील, असा चिमटाही त्यांनी काढला.