शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बारा दिवसांत संपले दीड टीएमसी पाणी

By admin | Updated: May 18, 2016 00:41 IST

खडकवासला धरणसाखळीतून गेल्या १२ दिवसांत तब्बल १.५० दक्षलक्ष घनमीटर (टीएमसी) पाणी सोडण्यात आले आहे.

पुणे : जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी खडकवासला धरणसाखळीतून गेल्या १२ दिवसांत तब्बल १.५० दक्षलक्ष घनमीटर (टीएमसी) पाणी सोडण्यात आले आहे. त्यातील ०.४० टीएमसी पाणी पुणे शहरासाठी सोडण्यात आले. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या चारही धरणांमध्ये अवघा ३.५० टीएमसी पाणी शिल्लक राहिला आहे. दौंड साठी ४ मे रोजी पाणी सोडण्यात आले होते, त्या वेळी या चारही धरणांमध्ये सुमारे ५.०४ टीएमसी पाणीसाठा होता. तो मंगळवारी (दि. १७) सकाळी ३.५४ टीएमसी असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. उर्वरित पाण्याचे बाष्पीभवन, पालखीसाठी पाणी, दोन मोठ्या टाऊनशिपसाठी पाणी तसेच धरणाचा शिल्लक साठा याचे कशा प्रकारे केले जाणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे. मागील वर्षी जेमतेम ५० टक्के धरणे भरल्याने या चारही धरणांत केवळ ५० टक्केच पाणीसाठा होता. हे सर्व पाणी पुणे शहरासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील ३२ गावांसह दौंड आणि इंदापूर या तालुक्यांसाठी सुमारे १.६० टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर सर्व पाणी पुणेकरांसाठीच ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, मे महिन्यात या गावांमध्ये पुन्हा पाणी सोडण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे या गावांना केवळ अर्धा टीएमपी पाणी सोडण्यात येणार असल्याचे आधी जाहीर करण्यात आले. त्यानंतर हे पाणी एक टीएमसी असेल, असे सांगण्यात आले. त्याला राजकीय पक्षांचा विरोध असतानाही ४ मेपासून धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली असून, १९ मेपर्यंत हे पाणी सोडण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. (प्रतिनिधी)कालव्यातून १,२०० क्युसेक्सने पाणी४ मे रोजी पाणी कालव्यातून सोडण्यात आले, त्या वेळी ६०० क्युसेक्सने ते सोडण्यात येत होते. त्यानंतर आजअखेर १,२०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे.वरसगाव-टेमघरने गाठला तळया धरणप्रणालीतील वरसगाव आणि टेमघर धरणाने तळ गाठला आहे. ४ मे रोजी वरसगाव धरणात १.१० टीएमसी पाणीसाठा होता. हा साठा आजअखेर ०.५२ टीएमसी झाला आहे. तर, टेमघर धरणार १२ दिवसांपूर्वी ०.१७ टीएमसीवर असलेला पाणीसाठी ०.0९ टीएमसीवर आला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.