शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
4
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
5
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
6
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
7
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
8
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
9
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
10
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
11
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
12
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
13
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
14
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
15
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
16
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
17
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
18
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
19
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
20
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स

बारा दिवसांत संपले दीड टीएमसी पाणी

By admin | Updated: May 18, 2016 00:41 IST

खडकवासला धरणसाखळीतून गेल्या १२ दिवसांत तब्बल १.५० दक्षलक्ष घनमीटर (टीएमसी) पाणी सोडण्यात आले आहे.

पुणे : जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी खडकवासला धरणसाखळीतून गेल्या १२ दिवसांत तब्बल १.५० दक्षलक्ष घनमीटर (टीएमसी) पाणी सोडण्यात आले आहे. त्यातील ०.४० टीएमसी पाणी पुणे शहरासाठी सोडण्यात आले. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या चारही धरणांमध्ये अवघा ३.५० टीएमसी पाणी शिल्लक राहिला आहे. दौंड साठी ४ मे रोजी पाणी सोडण्यात आले होते, त्या वेळी या चारही धरणांमध्ये सुमारे ५.०४ टीएमसी पाणीसाठा होता. तो मंगळवारी (दि. १७) सकाळी ३.५४ टीएमसी असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. उर्वरित पाण्याचे बाष्पीभवन, पालखीसाठी पाणी, दोन मोठ्या टाऊनशिपसाठी पाणी तसेच धरणाचा शिल्लक साठा याचे कशा प्रकारे केले जाणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे. मागील वर्षी जेमतेम ५० टक्के धरणे भरल्याने या चारही धरणांत केवळ ५० टक्केच पाणीसाठा होता. हे सर्व पाणी पुणे शहरासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील ३२ गावांसह दौंड आणि इंदापूर या तालुक्यांसाठी सुमारे १.६० टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर सर्व पाणी पुणेकरांसाठीच ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, मे महिन्यात या गावांमध्ये पुन्हा पाणी सोडण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे या गावांना केवळ अर्धा टीएमपी पाणी सोडण्यात येणार असल्याचे आधी जाहीर करण्यात आले. त्यानंतर हे पाणी एक टीएमसी असेल, असे सांगण्यात आले. त्याला राजकीय पक्षांचा विरोध असतानाही ४ मेपासून धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली असून, १९ मेपर्यंत हे पाणी सोडण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. (प्रतिनिधी)कालव्यातून १,२०० क्युसेक्सने पाणी४ मे रोजी पाणी कालव्यातून सोडण्यात आले, त्या वेळी ६०० क्युसेक्सने ते सोडण्यात येत होते. त्यानंतर आजअखेर १,२०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे.वरसगाव-टेमघरने गाठला तळया धरणप्रणालीतील वरसगाव आणि टेमघर धरणाने तळ गाठला आहे. ४ मे रोजी वरसगाव धरणात १.१० टीएमसी पाणीसाठा होता. हा साठा आजअखेर ०.५२ टीएमसी झाला आहे. तर, टेमघर धरणार १२ दिवसांपूर्वी ०.१७ टीएमसीवर असलेला पाणीसाठी ०.0९ टीएमसीवर आला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.