शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अनुदान थांबविल्याने वीज दरवाढीचे संकट

By admin | Updated: December 6, 2014 03:41 IST

राज्यातील औद्योगिक, कृषी आणि ३०० युनिटपर्यंत वीज वापर करणारे घरगुती वीज ग्राहक यांच्यावरील २० टक्के दरवाढीचे संकट टाळण्याकरिता मागील आघाडी

मुंबई : राज्यातील औद्योगिक, कृषी आणि ३०० युनिटपर्यंत वीज वापर करणारे घरगुती वीज ग्राहक यांच्यावरील २० टक्के दरवाढीचे संकट टाळण्याकरिता मागील आघाडी सरकारने महावितरणला सुरू केलेले दरमहा ७०६ कोटी रुपयांचे अनुदान थांबविण्याचा निर्णय नव्या युती सरकारने घेतला आहे. केवळ कृषी पंपांच्या वीज बिलाच्या दरवाढीचे सुमारे ८० ते १०० कोटी रुपये सरकार अनुदान स्वरुपात भरणार असल्याने औद्योगिक व घरगुती वीज ग्राहकांना जानेवारी महिन्यात चालू महिन्याचे वीज बिल मिळेल तेव्हा २० टक्के दरवाढीला सामोरे जावे लागेल.फेब्रुवारी २०१४ मध्ये केलेली २० टक्के दरवाढ टाळण्याकरिता मागील आघाडी सरकारने महावितरणला दरमहा ७०६ कोटी रुपये अनुदान स्वरुपात देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळीच ज्या दिवशी सरकार हे पैसे देणे थांबवेल त्या दिवसापासून वीज दरवाढ लागू केली जाईल, असे महावितरणने स्पष्ट केले होते. गेली दहा महिने सरकारने ७०६० कोटी रुपये भरून या वीज दरवाढीच्या संकटातून सर्व घटकांची सुटका केली होती. मात्र सरकारची आर्थिक स्थिती पाहता दीर्घकाळ ही सवलत सुरु ठेवणे अशक्य असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता ही सवलत केवळ कृषी पंपांकरिता सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता सरकारला दरमहा सुमारे ८० ते १०० कोटी रुपयांचा बोजा पडेल. मात्र औद्योगिक व घरगुती वीज ग्राहकांना आता दरवाढीला सामोरे जावे लागेल. (विशेष प्रतिनिधी)