शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

आप्तेष्टांवर वार करून सिंहासन जिंकलेच पाहिजे!

By admin | Updated: September 26, 2014 13:23 IST

महाऽऽराज.. मोहीम फत्ते जाहली. आपल्याला हवे तसे सारे जुळून आले. वाटेतले काटे दूर झाले. गनिम स्वत:हून बाजूला सरकले.

होऊ दे चर्चा...(स्थळ : मातोश्री महाल. २८८ इंचांच्या आलिशान राजमंचकावर महाराज लोळत पडलेले.)मिलिंद : (कुर्निसात करत) महाऽऽराज.. मोहीम फत्ते जाहली. आपल्याला हवे तसे सारे जुळून आले. वाटेतले काटे दूर झाले. गनिम स्वत:हून बाजूला सरकले. उद्धोराजे : (खूश होत) आता ताबडतोब ‘सिंहासनावर कसं बसावं?’ हे पुस्तक आणून द्या. एक महिना वेळ आहे. तोपर्यंत त्याचा अभ्यास करतो.आदिराजे : (हळूच) मग मलाही ‘उपसिंहासनावर बसण्याचा फॉर्म्युला’ हे पुस्तक आणून द्या नां मिलिंद अंकल.उद्धोराजे : आता माझा मोबाईल चालू करा. त्या ‘देव-विनोद’ जोडीनं गेले पंधरा दिवस सकाळ-दुपार-संध्याकाळ फोन करून डोकं उठवलं होतं माझं.मिलिंद : पण, तुम्ही त्यांचा कॉल घेतलाच कधी? रोजची चर्चा तर मी अन् संजयरावच करत होतो. उद्धोराजे : आजचा दिवस मला तुमच्यामुळंच पाहायला मिळाला. महाभारतातला ‘संजय’ म्हणे फक्त युद्धाची वर्णनं करत होता; पण माझ्या ‘संजय’नं तर आधुनिक महाभारत घडवलं.मिलिंद : (विनयानं) त्यात आमचा काय रोल महाराज? तुम्ही जेवढं सांगत गेलात, तेवढंच आम्ही करत गेलो. छानपैकी मोडत गेलो. आदिराजे : पण, काय हो अंकल... माझे आजोबा तर मला लहानपणी सांगायचे की, ‘जोडायला खूप कष्ट लागतात, मोडायला एक क्षणही लागत नाही.’उद्धोराजे : (चपापत) गप्प बसा बाळराजे. अजून तुम्ही लहान आहात. दिल्लीश्वरांचं राजकारण समजायला तुम्हाला अजून बराच अवधी आहे. मिलिंद : मग आता पुढच्या तयारीला लागावं म्हणतोय महाराज. उद्धोराजे : लागा नां. लागा. आमच्या सिंहासन स्थानापन्नतेचा मुहूर्त शोधा. राज्यात सर्वत्र दवंडी पिटवा की ‘अखेर आम्ही सर्वेसर्वा जाहलो!’मिलिंद : (डोकं खाजवत) पण महाराज अजून युद्ध व्हायचंय. त्यात आपल्याला जिंकायचंय. त्यानंतर मग....आदिराजे : (दचकून) म्हणजे आज जे काही आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय, ते राज्य करण्याचं नव्हे तर?मिलिंद : होय महाराज. आपल्याला अगोदर स्वत:ची फौज तयार करावी लागणार. त्यानंतर रणांगणात दुष्मनांसोबतच आपल्याच बंधूंवर वार करावे लागणार. वेळप्रसंगी त्यांचा खातमाही होणार!उद्धोराजे : (वास्तवाची जाणीव होताच) खामोश. आम्ही तुम्हाला फक्त एवढाच आदेश दिला होता की, ‘आम्हाला सिंहासन पाहिजे.’ याचा अर्थ आम्हाला महाभारतातला अर्जून बनायचं नव्हतं. मी माझ्याच बंधूंवर शस्त्रं उगारू? कदापिही शक्य नाही. ताबडतोब तो निर्णय बदला. आमच्या ‘रामभाऊ, राजूअण्णा अन् म्हादबा’ या तीन शूर सरदारांना बोलवा. मिलिंद : ती वेळ केव्हाच निघून गेली महाराज... आपले जवळचे हे सरदारही केव्हाच फितूर जाहले.- सचिन जवळकोटे