शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
4
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
5
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
6
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
7
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
8
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
9
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
10
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
11
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
12
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
13
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
14
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
15
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
16
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
17
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
18
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
19
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
20
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की

आप्तेष्टांवर वार करून सिंहासन जिंकलेच पाहिजे!

By admin | Updated: September 26, 2014 13:23 IST

महाऽऽराज.. मोहीम फत्ते जाहली. आपल्याला हवे तसे सारे जुळून आले. वाटेतले काटे दूर झाले. गनिम स्वत:हून बाजूला सरकले.

होऊ दे चर्चा...(स्थळ : मातोश्री महाल. २८८ इंचांच्या आलिशान राजमंचकावर महाराज लोळत पडलेले.)मिलिंद : (कुर्निसात करत) महाऽऽराज.. मोहीम फत्ते जाहली. आपल्याला हवे तसे सारे जुळून आले. वाटेतले काटे दूर झाले. गनिम स्वत:हून बाजूला सरकले. उद्धोराजे : (खूश होत) आता ताबडतोब ‘सिंहासनावर कसं बसावं?’ हे पुस्तक आणून द्या. एक महिना वेळ आहे. तोपर्यंत त्याचा अभ्यास करतो.आदिराजे : (हळूच) मग मलाही ‘उपसिंहासनावर बसण्याचा फॉर्म्युला’ हे पुस्तक आणून द्या नां मिलिंद अंकल.उद्धोराजे : आता माझा मोबाईल चालू करा. त्या ‘देव-विनोद’ जोडीनं गेले पंधरा दिवस सकाळ-दुपार-संध्याकाळ फोन करून डोकं उठवलं होतं माझं.मिलिंद : पण, तुम्ही त्यांचा कॉल घेतलाच कधी? रोजची चर्चा तर मी अन् संजयरावच करत होतो. उद्धोराजे : आजचा दिवस मला तुमच्यामुळंच पाहायला मिळाला. महाभारतातला ‘संजय’ म्हणे फक्त युद्धाची वर्णनं करत होता; पण माझ्या ‘संजय’नं तर आधुनिक महाभारत घडवलं.मिलिंद : (विनयानं) त्यात आमचा काय रोल महाराज? तुम्ही जेवढं सांगत गेलात, तेवढंच आम्ही करत गेलो. छानपैकी मोडत गेलो. आदिराजे : पण, काय हो अंकल... माझे आजोबा तर मला लहानपणी सांगायचे की, ‘जोडायला खूप कष्ट लागतात, मोडायला एक क्षणही लागत नाही.’उद्धोराजे : (चपापत) गप्प बसा बाळराजे. अजून तुम्ही लहान आहात. दिल्लीश्वरांचं राजकारण समजायला तुम्हाला अजून बराच अवधी आहे. मिलिंद : मग आता पुढच्या तयारीला लागावं म्हणतोय महाराज. उद्धोराजे : लागा नां. लागा. आमच्या सिंहासन स्थानापन्नतेचा मुहूर्त शोधा. राज्यात सर्वत्र दवंडी पिटवा की ‘अखेर आम्ही सर्वेसर्वा जाहलो!’मिलिंद : (डोकं खाजवत) पण महाराज अजून युद्ध व्हायचंय. त्यात आपल्याला जिंकायचंय. त्यानंतर मग....आदिराजे : (दचकून) म्हणजे आज जे काही आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय, ते राज्य करण्याचं नव्हे तर?मिलिंद : होय महाराज. आपल्याला अगोदर स्वत:ची फौज तयार करावी लागणार. त्यानंतर रणांगणात दुष्मनांसोबतच आपल्याच बंधूंवर वार करावे लागणार. वेळप्रसंगी त्यांचा खातमाही होणार!उद्धोराजे : (वास्तवाची जाणीव होताच) खामोश. आम्ही तुम्हाला फक्त एवढाच आदेश दिला होता की, ‘आम्हाला सिंहासन पाहिजे.’ याचा अर्थ आम्हाला महाभारतातला अर्जून बनायचं नव्हतं. मी माझ्याच बंधूंवर शस्त्रं उगारू? कदापिही शक्य नाही. ताबडतोब तो निर्णय बदला. आमच्या ‘रामभाऊ, राजूअण्णा अन् म्हादबा’ या तीन शूर सरदारांना बोलवा. मिलिंद : ती वेळ केव्हाच निघून गेली महाराज... आपले जवळचे हे सरदारही केव्हाच फितूर जाहले.- सचिन जवळकोटे