शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
4
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
5
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
6
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
7
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
8
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
9
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
10
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
11
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
12
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
13
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
14
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
15
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
16
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
18
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
19
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
20
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान

आप्तेष्टांवर वार करून सिंहासन जिंकलेच पाहिजे!

By admin | Updated: September 26, 2014 13:23 IST

महाऽऽराज.. मोहीम फत्ते जाहली. आपल्याला हवे तसे सारे जुळून आले. वाटेतले काटे दूर झाले. गनिम स्वत:हून बाजूला सरकले.

होऊ दे चर्चा...(स्थळ : मातोश्री महाल. २८८ इंचांच्या आलिशान राजमंचकावर महाराज लोळत पडलेले.)मिलिंद : (कुर्निसात करत) महाऽऽराज.. मोहीम फत्ते जाहली. आपल्याला हवे तसे सारे जुळून आले. वाटेतले काटे दूर झाले. गनिम स्वत:हून बाजूला सरकले. उद्धोराजे : (खूश होत) आता ताबडतोब ‘सिंहासनावर कसं बसावं?’ हे पुस्तक आणून द्या. एक महिना वेळ आहे. तोपर्यंत त्याचा अभ्यास करतो.आदिराजे : (हळूच) मग मलाही ‘उपसिंहासनावर बसण्याचा फॉर्म्युला’ हे पुस्तक आणून द्या नां मिलिंद अंकल.उद्धोराजे : आता माझा मोबाईल चालू करा. त्या ‘देव-विनोद’ जोडीनं गेले पंधरा दिवस सकाळ-दुपार-संध्याकाळ फोन करून डोकं उठवलं होतं माझं.मिलिंद : पण, तुम्ही त्यांचा कॉल घेतलाच कधी? रोजची चर्चा तर मी अन् संजयरावच करत होतो. उद्धोराजे : आजचा दिवस मला तुमच्यामुळंच पाहायला मिळाला. महाभारतातला ‘संजय’ म्हणे फक्त युद्धाची वर्णनं करत होता; पण माझ्या ‘संजय’नं तर आधुनिक महाभारत घडवलं.मिलिंद : (विनयानं) त्यात आमचा काय रोल महाराज? तुम्ही जेवढं सांगत गेलात, तेवढंच आम्ही करत गेलो. छानपैकी मोडत गेलो. आदिराजे : पण, काय हो अंकल... माझे आजोबा तर मला लहानपणी सांगायचे की, ‘जोडायला खूप कष्ट लागतात, मोडायला एक क्षणही लागत नाही.’उद्धोराजे : (चपापत) गप्प बसा बाळराजे. अजून तुम्ही लहान आहात. दिल्लीश्वरांचं राजकारण समजायला तुम्हाला अजून बराच अवधी आहे. मिलिंद : मग आता पुढच्या तयारीला लागावं म्हणतोय महाराज. उद्धोराजे : लागा नां. लागा. आमच्या सिंहासन स्थानापन्नतेचा मुहूर्त शोधा. राज्यात सर्वत्र दवंडी पिटवा की ‘अखेर आम्ही सर्वेसर्वा जाहलो!’मिलिंद : (डोकं खाजवत) पण महाराज अजून युद्ध व्हायचंय. त्यात आपल्याला जिंकायचंय. त्यानंतर मग....आदिराजे : (दचकून) म्हणजे आज जे काही आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय, ते राज्य करण्याचं नव्हे तर?मिलिंद : होय महाराज. आपल्याला अगोदर स्वत:ची फौज तयार करावी लागणार. त्यानंतर रणांगणात दुष्मनांसोबतच आपल्याच बंधूंवर वार करावे लागणार. वेळप्रसंगी त्यांचा खातमाही होणार!उद्धोराजे : (वास्तवाची जाणीव होताच) खामोश. आम्ही तुम्हाला फक्त एवढाच आदेश दिला होता की, ‘आम्हाला सिंहासन पाहिजे.’ याचा अर्थ आम्हाला महाभारतातला अर्जून बनायचं नव्हतं. मी माझ्याच बंधूंवर शस्त्रं उगारू? कदापिही शक्य नाही. ताबडतोब तो निर्णय बदला. आमच्या ‘रामभाऊ, राजूअण्णा अन् म्हादबा’ या तीन शूर सरदारांना बोलवा. मिलिंद : ती वेळ केव्हाच निघून गेली महाराज... आपले जवळचे हे सरदारही केव्हाच फितूर जाहले.- सचिन जवळकोटे