शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘म्हाडा’ सोडत विजेत्यांची परवड

By admin | Updated: December 26, 2016 04:39 IST

मुंबईकरांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी वर्षाला हजारो घरांची निर्मिती करण्याची घोषणा करणाऱ्या म्हाडाची प्रत्यक्षात कृती मात्र

जमीर काझी /मुंबईमुंबईकरांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी वर्षाला हजारो घरांची निर्मिती करण्याची घोषणा करणाऱ्या म्हाडाची प्रत्यक्षात कृती मात्र, ‘पुढचे पाठ मागचे सपाट’ अशी असल्याची स्थिती आहे. दीड वर्षापूर्वी सोडत काढण्यात आलेली मुलुंड गव्हाणपाडा येथील बांधकाम अद्याप अपूर्णावस्थेत आहेत. त्यामुळे एका वर्षात या घराच्या किमती सरासरी पाच लाखांनी वाढल्या आहेत. कामाची ही ‘कूर्मगती’ कायम राहिल्यास, त्यामध्ये आणखी वाढ होण्याच्या शक्यतेने घर विजेत्यांची अवस्था ‘भीक नको, पण कुत्रा आवर’ अशी झाली आहे. नव्या इमारतींच्या परिसरातील दुरवस्थेतील संक्रमण इमारत (ट्रान्झिस्ट) पाडण्यात प्रशासनाने दिरंगाई केल्याने, प्रदूषण महामंडळाकडून ना हरकत दाखला (एनओसी) मिळण्यास विलंब लागत आहे. प्रशासनाच्या या दिरंगाईकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुलर्क्ष झाल्याने, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष देऊन संबंधितावर कार्यवाही करावी, अशी मागणी सोडत विजेत्यांकडून व्यक्त होत आहे. मुलुंड गव्हाणपाडा येथे म्हाडाकडून मध्यम उत्पन्न व अल्प उत्पन गट (एमआयजी व एलआयजी) बांधण्यात येत असलेल्या गृहसंकुलांची मे २०१५ मध्ये सोडत काढण्यात आली आहे. त्या वेळी या इमारतीचे बांधकाम काम सरासरी ६० ते ७५ टक्के झाले होते. आता दीड वर्षे पूर्ण होत आली असताना, ‘एमआयजी’ धारकासाठीची इमारतीचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे, तर ‘एलआयजी’साठीची २३ मजली बिल्डिंगमधील अंतर्गत कामे रखडलेली आहेत. त्याशिवाय या इमारतीच्या मागे उभारण्यात येत असलेली बिल्डिंग अद्याप अर्धवट अवस्थेत आहे. याच भागात मोडकळीस आलेली तीन मजली ट्रान्झिस्ट इमारत आहे. ती हटविल्यानंतर प्रदूषण मंडळाकडून नाहरकत दाखला मिळेल. त्यानंतर, मुंबई महापालिकेकडे ताबा प्रमाणपत्रासाठी (ओसी) प्रयत्न करता येणार आहे. मात्र, म्हाडाच्या सुस्ताईमुळे त्याला आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. या दरम्यानच्या काळात या गृहसंकल्पातील काही सदनिका या वर्षाच्या सोडतीत घेण्यात आली. त्याची किंमत गेल्या वर्षाच्या तुलनेत सरासरी पाच लाखांनी वाढविली आहे. त्यामुळे म्हाडाच्या नियमानुसार, २०१५च्या सोडतीतील विजेत्यांनाही याच किमतीने घर विकत घ्यावे लागणार आहे. मार्केटिंग विभागाकडे निकालाची प्रत नाही विजेत्याचा खरेदी व्यवहार पणन मंडळाकडून होत असल्याने, त्यांच्याकडे सोडतीचा पूर्ण निकाल असणे अत्यावश्यक आहे. मात्र, या ठिकाणीही ढिसाळ कारभाराचा अनुभव येत आहे. या वर्षीच्या लॉटरीचा निकाल जाहीर झाल्याने, म्हाडाने २०१५च्या सोडतीचा निकाल संकेतस्थळावरून काढला. त्यामुळे विजेत्यांच्या यादीची प्रत पणन विभागाचे उपमुुख्याधिकारी तुषार मठकर यांच्याकडे मागितली असता, त्यांनी आपल्याकडे उपलब्ध नसल्याची कबुली देत, संगणक विभागाकडून मागविण्यात आल्याचे सांगितले. मात्र, तब्बल दोन महिने पाठपुरावा करूनही, त्यांनी केवळ त्याबाबत आश्वासनावर बोळवण केली आहे. पणन मंडळाकडे निकाल उपलब्ध नसल्याने, दलालाकडून बनावट कागदपत्राच्या आधारे परस्पर घरे दुसऱ्याला विकून लाखोंचा गैरव्यवहार होण्याचा धोका आहे.बांधकामाच्या विलंबाबाबत म्हाडा मुंबई मंडळाचे कार्यकारी अधिकारी सुभाष लाखे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही, तर कुर्ला-मुलुंड विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद तोंशाळ यांनी इमारतीचे काम पूर्ण केले जाईल, ट्रान्झिस्ट इमारत हटविण्याचे काम सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले.