शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
3
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
4
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
5
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
6
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
7
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
8
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
9
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
10
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
11
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
12
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
13
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
14
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
15
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
16
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
17
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
18
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
19
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
20
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर

‘म्हाडा’ सोडत विजेत्यांची परवड

By admin | Updated: December 26, 2016 04:39 IST

मुंबईकरांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी वर्षाला हजारो घरांची निर्मिती करण्याची घोषणा करणाऱ्या म्हाडाची प्रत्यक्षात कृती मात्र

जमीर काझी /मुंबईमुंबईकरांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी वर्षाला हजारो घरांची निर्मिती करण्याची घोषणा करणाऱ्या म्हाडाची प्रत्यक्षात कृती मात्र, ‘पुढचे पाठ मागचे सपाट’ अशी असल्याची स्थिती आहे. दीड वर्षापूर्वी सोडत काढण्यात आलेली मुलुंड गव्हाणपाडा येथील बांधकाम अद्याप अपूर्णावस्थेत आहेत. त्यामुळे एका वर्षात या घराच्या किमती सरासरी पाच लाखांनी वाढल्या आहेत. कामाची ही ‘कूर्मगती’ कायम राहिल्यास, त्यामध्ये आणखी वाढ होण्याच्या शक्यतेने घर विजेत्यांची अवस्था ‘भीक नको, पण कुत्रा आवर’ अशी झाली आहे. नव्या इमारतींच्या परिसरातील दुरवस्थेतील संक्रमण इमारत (ट्रान्झिस्ट) पाडण्यात प्रशासनाने दिरंगाई केल्याने, प्रदूषण महामंडळाकडून ना हरकत दाखला (एनओसी) मिळण्यास विलंब लागत आहे. प्रशासनाच्या या दिरंगाईकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुलर्क्ष झाल्याने, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष देऊन संबंधितावर कार्यवाही करावी, अशी मागणी सोडत विजेत्यांकडून व्यक्त होत आहे. मुलुंड गव्हाणपाडा येथे म्हाडाकडून मध्यम उत्पन्न व अल्प उत्पन गट (एमआयजी व एलआयजी) बांधण्यात येत असलेल्या गृहसंकुलांची मे २०१५ मध्ये सोडत काढण्यात आली आहे. त्या वेळी या इमारतीचे बांधकाम काम सरासरी ६० ते ७५ टक्के झाले होते. आता दीड वर्षे पूर्ण होत आली असताना, ‘एमआयजी’ धारकासाठीची इमारतीचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे, तर ‘एलआयजी’साठीची २३ मजली बिल्डिंगमधील अंतर्गत कामे रखडलेली आहेत. त्याशिवाय या इमारतीच्या मागे उभारण्यात येत असलेली बिल्डिंग अद्याप अर्धवट अवस्थेत आहे. याच भागात मोडकळीस आलेली तीन मजली ट्रान्झिस्ट इमारत आहे. ती हटविल्यानंतर प्रदूषण मंडळाकडून नाहरकत दाखला मिळेल. त्यानंतर, मुंबई महापालिकेकडे ताबा प्रमाणपत्रासाठी (ओसी) प्रयत्न करता येणार आहे. मात्र, म्हाडाच्या सुस्ताईमुळे त्याला आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. या दरम्यानच्या काळात या गृहसंकल्पातील काही सदनिका या वर्षाच्या सोडतीत घेण्यात आली. त्याची किंमत गेल्या वर्षाच्या तुलनेत सरासरी पाच लाखांनी वाढविली आहे. त्यामुळे म्हाडाच्या नियमानुसार, २०१५च्या सोडतीतील विजेत्यांनाही याच किमतीने घर विकत घ्यावे लागणार आहे. मार्केटिंग विभागाकडे निकालाची प्रत नाही विजेत्याचा खरेदी व्यवहार पणन मंडळाकडून होत असल्याने, त्यांच्याकडे सोडतीचा पूर्ण निकाल असणे अत्यावश्यक आहे. मात्र, या ठिकाणीही ढिसाळ कारभाराचा अनुभव येत आहे. या वर्षीच्या लॉटरीचा निकाल जाहीर झाल्याने, म्हाडाने २०१५च्या सोडतीचा निकाल संकेतस्थळावरून काढला. त्यामुळे विजेत्यांच्या यादीची प्रत पणन विभागाचे उपमुुख्याधिकारी तुषार मठकर यांच्याकडे मागितली असता, त्यांनी आपल्याकडे उपलब्ध नसल्याची कबुली देत, संगणक विभागाकडून मागविण्यात आल्याचे सांगितले. मात्र, तब्बल दोन महिने पाठपुरावा करूनही, त्यांनी केवळ त्याबाबत आश्वासनावर बोळवण केली आहे. पणन मंडळाकडे निकाल उपलब्ध नसल्याने, दलालाकडून बनावट कागदपत्राच्या आधारे परस्पर घरे दुसऱ्याला विकून लाखोंचा गैरव्यवहार होण्याचा धोका आहे.बांधकामाच्या विलंबाबाबत म्हाडा मुंबई मंडळाचे कार्यकारी अधिकारी सुभाष लाखे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही, तर कुर्ला-मुलुंड विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद तोंशाळ यांनी इमारतीचे काम पूर्ण केले जाईल, ट्रान्झिस्ट इमारत हटविण्याचे काम सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले.