शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
4
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
5
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
6
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
7
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
8
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
9
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
10
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
11
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
12
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
13
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
14
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
15
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
16
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
18
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
19
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
20
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
Daily Top 2Weekly Top 5

झाईत किनारा स्वच्छता!

By admin | Updated: September 20, 2016 03:41 IST

निर्मल सागर तट अभियानाचा शुभारंभ सोमवार, १९ सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील झाई गावातून करण्यात आला.

अनिरुद्ध पाटील,

डहाणू/बोर्डी- महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून निर्मल सागर तट अभियानाचा शुभारंभ सोमवार, १९ सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील झाई गावातून करण्यात आला. या वेळी झाई सरपंच जनी प्रकाश सांबर, उपसरपंच अर्जुन वांगड उपस्थित होते. मेरीटाइम बोर्डाचे बंदर निरिक्षक अभिजीत जाधव, सुधीर जंगम, श्रीधर मोरे, सुभाष औणकर, प्रसाद पारकर, चौकीदार रविंद्र अंसुरकर, नितिन कोळी तसेच आचार्य भिसे शिक्षण संस्थेच्या मुख्याध्यापिका दिपा पाटील, झाई मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष धर्मेन माच्छी, सचिव किशोर ठाकूर, सदस्य विनोद माच्छी, मांगेला समाज मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष सहदेव दवणे, सचिव सुरेश दवणे, पंचायत समिती सदस्य प्रकाश सांबर, ग्रामपंचायत सदस्य विनित राऊत, माजी सदस्या उषाबेन माच्छी, कृषी अधिकारी कडू स्थानिक मच्छीमार, ग्रामस्थ, महिला, लाखाणी विद्यालयाचे शिक्षक मनीष जोंधळेकर, स्मिता सावे आणि विद्यार्थी अभियानात सहभागी झाले होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी जम्मू काश्मीर मधील उरी येथे दहशतवादी हल्ल्यातील शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर बंदर निरिक्षक श्रीधर मोरे यानी प्रास्ताविक भाषणातून अभियानाची माहिती दिली. त्यानंतर किनारा स्वच्छ ठेऊन पुरस्कार प्राप्त करण्याचे आवाहन केले. झाई गावातील विद्यार्थी, महिला व मच्छीमारांनी उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत सहकार्य केले. झाई गाव मासेमारीसह पर्यटनात अग्रेसर झाल्यास स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. या स्वच्छता मोहिमेचे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे नवनीत निजाई यांनी सांगितले. कॅप्टन संजय शर्मा यांच्या मार्गर्शनाखाली मोहीम यशस्विरित्या पार पडली. १७ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर हा निर्मल ग्राम अभियानाचा कालावधी आहे. त्यानुसार २० सप्टेंबर पासून अनुक्रमे बोर्डी, घोलवड, चिखले, नरपड आणि 28 सप्टेंबरला डहाणूच्या समुद्रकिनारी राबविले जाणार असल्याची माहिती बंदर विभागाने दिली.>जुहू येथे झाला शुभारंभमहाराष्ट्र राज्याला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून किनारा स्वच्छतेसाठी शासनाने निर्मल सागर तट अभियान महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून हाती घेतले आहे. शनिवार १७ सप्टेंबर रोजी जुहू बीच येथे बंदर खात्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील झाई या मासेमारी गावातून १९ सप्टेंबर रोजी या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.