शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
3
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
4
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
5
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
6
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
7
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
8
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
9
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
12
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
13
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
14
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
15
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
16
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
17
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
18
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
19
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
20
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   

झाईत किनारा स्वच्छता!

By admin | Updated: September 20, 2016 03:41 IST

निर्मल सागर तट अभियानाचा शुभारंभ सोमवार, १९ सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील झाई गावातून करण्यात आला.

अनिरुद्ध पाटील,

डहाणू/बोर्डी- महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून निर्मल सागर तट अभियानाचा शुभारंभ सोमवार, १९ सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील झाई गावातून करण्यात आला. या वेळी झाई सरपंच जनी प्रकाश सांबर, उपसरपंच अर्जुन वांगड उपस्थित होते. मेरीटाइम बोर्डाचे बंदर निरिक्षक अभिजीत जाधव, सुधीर जंगम, श्रीधर मोरे, सुभाष औणकर, प्रसाद पारकर, चौकीदार रविंद्र अंसुरकर, नितिन कोळी तसेच आचार्य भिसे शिक्षण संस्थेच्या मुख्याध्यापिका दिपा पाटील, झाई मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष धर्मेन माच्छी, सचिव किशोर ठाकूर, सदस्य विनोद माच्छी, मांगेला समाज मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष सहदेव दवणे, सचिव सुरेश दवणे, पंचायत समिती सदस्य प्रकाश सांबर, ग्रामपंचायत सदस्य विनित राऊत, माजी सदस्या उषाबेन माच्छी, कृषी अधिकारी कडू स्थानिक मच्छीमार, ग्रामस्थ, महिला, लाखाणी विद्यालयाचे शिक्षक मनीष जोंधळेकर, स्मिता सावे आणि विद्यार्थी अभियानात सहभागी झाले होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी जम्मू काश्मीर मधील उरी येथे दहशतवादी हल्ल्यातील शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर बंदर निरिक्षक श्रीधर मोरे यानी प्रास्ताविक भाषणातून अभियानाची माहिती दिली. त्यानंतर किनारा स्वच्छ ठेऊन पुरस्कार प्राप्त करण्याचे आवाहन केले. झाई गावातील विद्यार्थी, महिला व मच्छीमारांनी उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत सहकार्य केले. झाई गाव मासेमारीसह पर्यटनात अग्रेसर झाल्यास स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. या स्वच्छता मोहिमेचे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे नवनीत निजाई यांनी सांगितले. कॅप्टन संजय शर्मा यांच्या मार्गर्शनाखाली मोहीम यशस्विरित्या पार पडली. १७ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर हा निर्मल ग्राम अभियानाचा कालावधी आहे. त्यानुसार २० सप्टेंबर पासून अनुक्रमे बोर्डी, घोलवड, चिखले, नरपड आणि 28 सप्टेंबरला डहाणूच्या समुद्रकिनारी राबविले जाणार असल्याची माहिती बंदर विभागाने दिली.>जुहू येथे झाला शुभारंभमहाराष्ट्र राज्याला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून किनारा स्वच्छतेसाठी शासनाने निर्मल सागर तट अभियान महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून हाती घेतले आहे. शनिवार १७ सप्टेंबर रोजी जुहू बीच येथे बंदर खात्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील झाई या मासेमारी गावातून १९ सप्टेंबर रोजी या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.