शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

शब्दांना पंख ई-साहित्याचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 06:51 IST

परंपरेने चालत आलेले जे साहित्य आहे, त्याच प्रकारच्या परंपरेतले नवीन जाणिवेचे साहित्य आगामी वर्षात अपेक्षित आहे. जसे की, सध्या कविता, गझल, चारोळी हे प्रकार लोकप्रिय आहेत. या प्रकारात तरुणाई अधिक रमताना, अभिव्यक्त होताना दिसते. त्यामुळेच नवीन वर्षात फेसबुक पोस्ट, टिष्ट्वटर, व्हॉट्सअ‍ॅप पर्यायाने ई-साहित्याचे नवे दालन अधिक व्यापक स्वरूपात खुले झालेले पाहायला मिळेल.

- श्रीपाल सबनीसपरंपरेने चालत आलेले जे साहित्य आहे, त्याच प्रकारच्या परंपरेतले नवीन जाणिवेचे साहित्य आगामी वर्षात अपेक्षित आहे. जसे की, सध्या कविता, गझल, चारोळी हे प्रकार लोकप्रिय आहेत. या प्रकारात तरुणाई अधिक रमताना, अभिव्यक्त होताना दिसते. त्यामुळेच नवीन वर्षात फेसबुक पोस्ट, टिष्ट्वटर, व्हॉट्सअ‍ॅप पर्यायाने ई-साहित्याचे नवे दालन अधिक व्यापक स्वरूपात खुले झालेले पाहायला मिळेल. विशेष उल्लेखनीय म्हणजे, परंपरागत चालत आलेल्या साहित्य प्रकारांइतकीच ताकद शब्दांना लाभलेल्या या नव्या ई-साहित्याच्याही पंखात आहे....हे शहाणपणाचे लक्षण नाहीसाहित्य आणि संमेलने यांचे अतूट, जिव्हाळ्याचे नाते आहे. साहित्य संमेलने ही सर्वार्थाने संस्कृतीचे उत्सव सोहळे आहेत, असे सोहळे झालेच पाहिजेत. लाखो लोक तेथे जमतात. ते वेडे नसतात. ते एकत्र येतात, ते केवळ साहित्य, संस्कृतीची देवाण-घेवाण करण्याच्या शुद्ध हेतूतून! त्यामुळे त्यांना वेडे म्हणणे हे शहाणपणाचे लक्षण नाही.सोशल मीडियावर अभिव्यक्त होणारे मराठी साहित्य हा नवीन वर्षाचा नवा ट्रेंड होऊ पाहत आहे. हा ट्रेंड योग्य की अयोग्य, यावर चर्वितचर्वण करण्यापेक्षा तो अटळ, अपरिहार्य आहे, हे लक्षात घ्यायला हवे. खंत एवढीच आहे की, तरुणाई ज्या पद्धतीने, ज्या शैलीमध्ये अभिव्यक्त होत आहे, ती शैली मात्र तितकीशी योग्य नाही. त्यात अनेक दोष आहेत. माणसातील झाकलेले पशुत्व आणि लपलेली विकृृती ही तरुणाईच्या आविष्कारातून सोशल मीडियातून व्यक्त होत आहे. अर्थात, सर्वच तरुणाईचे साहित्य हे अशा प्रकारचे विकृतीकडे झुकणारे आहे, असे म्हणता येणार नाही. विधायक प्रवृत्तीचे भाष्य, काव्य, विचार, संवाद, विकृतीवरील हल्लाबोल, टीका-टिप्पणीदेखील ई-साहित्याच्या माध्यमातून वाचायला मिळत आहे. फक्त या माध्यमाचा वापर सक्षमपणे होणे गरजेचे आहे.म्हणूनच सोशल मीडियाच्या नव्या माध्यमात संस्कृती शुद्धीकरणाची नवी चळवळ सुरू व्हायला हवी. ही चळवळ जास्तीत जास्त सत्यनिष्ठ असावी, मानवतावादाशी सुसंवाद साधणारी असावी. यासाठी तरुणाईची मने अधिक संस्कारक्षम करण्याची गरज आहे. कारण तरुण हे समाज माध्यमातील, समाज परिवर्तनातील, सशक्त समाज उभारणीतील महत्त्वाचा घटक आहेत. म्हणूनच आता ज्येष्ठ, श्रेष्ठ साहित्यिकांनी समाज जागरणाचा, समाज शुद्धीकरणाचा ध्येयवाद निष्ठेने जोपासत, तरुणाईला योग्य दिशा दाखवायला हवी. त्यांच्याशी संवाद साधायला हवा. कारण आज तरुणाईतील निखळ संवाद कुठेतरी हरवत चालला आहे. प्रत्यक्षात संवादातूनच सुसंवाद घडतो. अनेकदा हाच संवाद विसंवादही घडवून आणतो, पण घाबरण्याची गरज नाही. कारण विसंवादाच्या पूर्वी आणि नंतर संवादच असतो. म्हणूनच संवाद हा समाजाचा, संस्कृतीचा गाभा असला पाहिजे, याची जाणीव तरुणाईला करून द्यायलाच हवी.ई-साहित्यात रमणाºया नवोदित साहित्यिकांना, तरुणाईला एवढेच सांगावेसे वाटते की, कुठल्याही परिस्थितीत सौहार्द, सहिष्णुता ही जपायलाच हवी. त्यासाठी लिखाणाची शैली चिंतनात्मक, मनोरंजनात्मक, प्रसंगी उपरोधिक असली तरी चालेल, परंतु ती हिंसक नसावी. तर माणूसपण जागवणारी, त्यांचे प्रबोधन करणारी, त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी हवी. कारण समाजातील सर्व पातळीवरील अंधार दूर करणे हेच साहित्यिकाचे आद्यकर्तव्य आहे. आजवरच्या साहित्यिकांनी आपापल्या परीने ते पार पाडले आहे. आता त्याची धुरा तरुणाईच्या रूपातील नवोदित साहित्यिकांवर आहे. त्यामुळेच आगामी कालखंडात निसर्गाचा आविष्कार, प्रेम, करुणा, वात्सल्य शब्दांच्या धाग्यात नजाकतीने गुंफताना क्रौर्य, द्वेष, सामाजिक विकृती, अन्याय, अत्याचाराविरुद्धची लढाईही प्रभावी लेखणीच्या माध्यमातूनच लढावी लागणार आहे. आजची तरुणाई, नवोदित साहित्यिक याचे भान ठेवून, सोशल मीडियाच्या अमर्याद आकाशात ई-साहित्याच्या पंखावर सजग, सशक्त शब्दांची उत्तुंग झेप निश्चितच घेतील, ही अपेक्षा आणि याच त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा!(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आहेत.)

टॅग्स :marathiमराठी