शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दारूमुक्त खारघरमध्ये मद्यविक्रीचा परवाना

By admin | Updated: July 12, 2017 02:39 IST

मद्यविक्रीची दुकाने, हॉटेल्स, बार, रिसॉर्टमधील दारूविक्री बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : राष्ट्रीय महामार्गापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या सर्वच मद्यविक्रीची दुकाने, हॉटेल्स, बार, रिसॉर्टमधील दारूविक्री बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. एप्रिल महिन्यात पनवेल तालुक्यातील शेकडो दारूविक्र ीच्या दुकाने, हॉटेल्स, बारला यामुळे टाळे ठोकावे लागले होते. विशेष म्हणजे खारघर शहर दारूमुक्तीचा लढा अनेक वर्षांपासून सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शहरातील अजित पॅलेस, रॉयल ट्युलिप या दोन्ही हॉटेल्समधील दारूविक्र ी बंद होऊन खारघर दारूमुक्त झाले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेल्या सर्वेक्षणात रॉयल ट्युलिपचे अंतर ६०० मीटरपेक्षा जास्त असल्याने पुन्हा एकदा याठिकाणी दारूविक्र ी सुरू झाली असून, दारूमुक्त खारघर दारूयुक्त झाले आहे. खारघर शहरात संघर्ष समितीने दारूमुक्त खारघरचा लढा उभारला आहे. मागील दहा वर्षांपासून हा लढा सुरू असून शहरात दारूविक्र ीला संघर्ष समिती विरोध करीत आली आहे. उत्पादन शुल्क विभागाने रॉयल ट्युलिपलादेखील मद्यविक्रीचा परवाना दिल्यानंतर शहरात संघर्ष समिती, सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी येथील पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. रॉयल ट्युलिपला मद्यविक्रीच्या परवानगीमुळे संघर्ष समितीने उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेदेखील अपील केले होते. वर्षभरापूर्वी या प्रकरणी मंत्र्यासमोर सुनावणीदेखील झाली होती. या प्रकरणाचा अंतिम निकाल अद्याप राखीव आहे. महामार्गापासून ५०० मीटरच्या आत अंतरावर असल्याने रॉयल ट्युलिपच्या मद्यविक्रीचा परवाना रद्द करण्यात आला होता. मात्र, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सर्वेक्षणानुसार रॉयल ट्युलिप हे हॉटेल सायन-पनवेल महामार्गापासून ६०० मीटरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे पुन्हा एकदा याठिकाणी दारूविक्रीला परवानगी मिळाल्याने संपूर्ण दारूमुक्त खारघरच्या प्रयत्नाला या वेळी सुरुंग लागल्याचे दिसून येत आहे. उत्पादन शुल्क विभागाचे पनवेल येथील अधिकारी सुधीर पोकळे यांनी हॉटेल रॉयल ट्युलिपला या निर्णयातून वगळण्यात आले आहे. ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असल्याने ५०० मीटरचा निर्णय या हॉटेलला लागू होत नसल्याचे सांगितले. >सरकार वेळोवेळी धोरण बदलत आहे त्यामुळे आम्ही नेमके काय करावे? हा आता प्रश्न पडला आहे. रॉयल ट्युलिपला दिलेल्या मद्यविक्र ीच्या परवण्यासंदर्भात आम्ही उत्पादन शुल्क विभागाकडेदेखील अपील केले आहे. त्याचा निर्णय येणे अपेक्षित असताना अशा तऱ्हेने पळवाटा काढून जर का अशाप्रकारे दारूविक्र ीची परवाने बहाल केली जात असतील तर हे दुर्दैवी आहे. संघर्ष समितीमार्फत बैठक घेऊन यासंदर्भात आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. - केसरीनाथ पाटील, सदस्य, खारघर संघर्ष समिती