शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
6
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
7
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
8
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
9
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
10
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
12
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
13
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
14
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
15
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
16
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
17
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
18
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
19
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
20
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन

सुवर्ण संग्रामला हवा मदतीचा हात

By admin | Updated: November 6, 2014 22:05 IST

गुणवंत खेळाडू : मदत न मिळाल्यास नेपाळला जाण्याची संधी हुकण्याची शक्यता

श्रीकांत चाळके - खेड -अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर विविध खेळांमध्ये आपल्या वैविध्यपूर्ण अंगभूत गुणांनी प्राविण्य मिळविणाऱ्या गुणवंत खेळाडूंची संख्या काही कमी नाही. मात्र, घरच्या आर्थिक दुर्बलतेमुळे अशा खेळाडूंना यशोशिखरापासून वंचित राहावे लागते. खेड तालुक्यातील केळणे गावातील संग्राम महेश कदम या गुणवंत खेळाडूच्या बाबतीत हा अनुभव येत आहे़ संग्रामची कीक बॉक्सिंग क्रीडा प्रकारात नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याआधी राज्यस्तरीय ज्युनिअर कीक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण आणि राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली आहे. संग्रामला आता नेपाळ येथे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवासखर्चाला पैसे नाहीत़ याकरिता त्याला लाखभर रूपये खर्च येणार आहे. घरची परिस्थिती नसल्याने तो हा खर्च करू शकत नाही़ त्यामुळे त्याला मदतीची गरज आहे. खेडचे तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी संग्राम व त्याची आई यांचा पुष्पगुच्छ देवून गौरव केला आहे. मात्र, संग्रामचा नुसता गौरव करून चालणार नाही, तर त्याला प्रत्यक्ष मदतीची गरज आहे,़ अन्यथा तो या स्पर्धेपासून वंचित राहणार आहे़स्ांग्राम कदम याचे पाचवीपर्यंतचे शिक्षण खेड तालुक्यातील आवाशी देऊळवाडी येथील प्राथमिक शाळेत झाले़ नंतर सहावीसाठी तो खेड शहरातील एल. पी. इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झाला. तिथे शिक्षण घेतल्यानंतर त्याने सातारा जिल्ह्यातील वाई येथील कमांडो ट्रेनिंग स्कूलमध्ये सातवी इयत्तेत प्रवेश घेतला. तिथे त्याची या खेळातील जडणघडण झाली. या विद्यालयाचे प्रशिक्षक कॅप्टन एस़ बी़ खंकाळ, कमांडो एस. पी. जावळे, ए़ एस. कल्याणकर यांनी कीकबॉक्सिंग प्रकारात संग्रामची आवड लक्षात घेता त्याला प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली़ संग्रामने या प्रशिक्षणाचा लाभ घेत आणि प्रशिक्षकांनी दिलेल्या टीप्सचे काटेकोरपणे पालन केले. केवळ सहा महिन्यांच्या काळात राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण आणि राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक पटकावून प्रशिक्षकांचा विश्वास त्याने सार्थ ठरवला. आई-वडिलांचे परिश्रम आणि हलाखीच्या परिस्थितीतून दिलेले शिक्षण याची जाण ठेवत अवघ्या १६ वर्र्षे वयोगटातील २८व्या ज्युनिअर राज्यस्तरीय कीक बॉक्सिंग स्पर्धेत मिळविलेले हे उत्तुंग यश पाहून आई-वडिलांनाही आपले आनंदाश्रू आवरता आले नाहीत. तरूणाईला संग्रामचे हे यश नक्कीच भूषणावह आहे़ आता त्याचे लक्ष आहे ते नेपाळमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेकडे. लाखभर रूपयांची मदत नाही मिळाली तर संग्रामला या स्पर्धेला मुकावे लागणार आहे़ जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनी तसेच लोकप्रतिनिधींनी संग्रामला मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.