शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

सुवर्ण संग्रामला हवा मदतीचा हात

By admin | Updated: November 6, 2014 22:05 IST

गुणवंत खेळाडू : मदत न मिळाल्यास नेपाळला जाण्याची संधी हुकण्याची शक्यता

श्रीकांत चाळके - खेड -अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर विविध खेळांमध्ये आपल्या वैविध्यपूर्ण अंगभूत गुणांनी प्राविण्य मिळविणाऱ्या गुणवंत खेळाडूंची संख्या काही कमी नाही. मात्र, घरच्या आर्थिक दुर्बलतेमुळे अशा खेळाडूंना यशोशिखरापासून वंचित राहावे लागते. खेड तालुक्यातील केळणे गावातील संग्राम महेश कदम या गुणवंत खेळाडूच्या बाबतीत हा अनुभव येत आहे़ संग्रामची कीक बॉक्सिंग क्रीडा प्रकारात नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याआधी राज्यस्तरीय ज्युनिअर कीक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण आणि राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली आहे. संग्रामला आता नेपाळ येथे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवासखर्चाला पैसे नाहीत़ याकरिता त्याला लाखभर रूपये खर्च येणार आहे. घरची परिस्थिती नसल्याने तो हा खर्च करू शकत नाही़ त्यामुळे त्याला मदतीची गरज आहे. खेडचे तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी संग्राम व त्याची आई यांचा पुष्पगुच्छ देवून गौरव केला आहे. मात्र, संग्रामचा नुसता गौरव करून चालणार नाही, तर त्याला प्रत्यक्ष मदतीची गरज आहे,़ अन्यथा तो या स्पर्धेपासून वंचित राहणार आहे़स्ांग्राम कदम याचे पाचवीपर्यंतचे शिक्षण खेड तालुक्यातील आवाशी देऊळवाडी येथील प्राथमिक शाळेत झाले़ नंतर सहावीसाठी तो खेड शहरातील एल. पी. इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झाला. तिथे शिक्षण घेतल्यानंतर त्याने सातारा जिल्ह्यातील वाई येथील कमांडो ट्रेनिंग स्कूलमध्ये सातवी इयत्तेत प्रवेश घेतला. तिथे त्याची या खेळातील जडणघडण झाली. या विद्यालयाचे प्रशिक्षक कॅप्टन एस़ बी़ खंकाळ, कमांडो एस. पी. जावळे, ए़ एस. कल्याणकर यांनी कीकबॉक्सिंग प्रकारात संग्रामची आवड लक्षात घेता त्याला प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली़ संग्रामने या प्रशिक्षणाचा लाभ घेत आणि प्रशिक्षकांनी दिलेल्या टीप्सचे काटेकोरपणे पालन केले. केवळ सहा महिन्यांच्या काळात राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण आणि राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक पटकावून प्रशिक्षकांचा विश्वास त्याने सार्थ ठरवला. आई-वडिलांचे परिश्रम आणि हलाखीच्या परिस्थितीतून दिलेले शिक्षण याची जाण ठेवत अवघ्या १६ वर्र्षे वयोगटातील २८व्या ज्युनिअर राज्यस्तरीय कीक बॉक्सिंग स्पर्धेत मिळविलेले हे उत्तुंग यश पाहून आई-वडिलांनाही आपले आनंदाश्रू आवरता आले नाहीत. तरूणाईला संग्रामचे हे यश नक्कीच भूषणावह आहे़ आता त्याचे लक्ष आहे ते नेपाळमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेकडे. लाखभर रूपयांची मदत नाही मिळाली तर संग्रामला या स्पर्धेला मुकावे लागणार आहे़ जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनी तसेच लोकप्रतिनिधींनी संग्रामला मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.