शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

हिताच्या तेवढ्याच शिफारशी स्वीकारणार

By admin | Updated: April 10, 2015 04:18 IST

राज्याच्या समतोल विकासासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या डॉ. विजय केळकर समितीच्या अहवालातील शिफारशी जशाच्या तशा स्वीकारण्यात

मुंबई : राज्याच्या समतोल विकासासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या डॉ. विजय केळकर समितीच्या अहवालातील शिफारशी जशाच्या तशा स्वीकारण्यात येणार नाहीत, असे राज्य शासनाने आज स्पष्ट केले. राज्याच्या हिताच्या असतील त्याच शिफारशी स्वीकारू, असे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज स्पष्ट केले.केळकर समितीच्या अहवालावरील दोन दिवसांच्या चर्चेला उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, केळकर समितीने केलेल्या शिफारशींवरील कार्यवाहीसंदर्भात आपल्या अध्यक्षतेखाली मंत्री उपसमिती नेमण्यात आली आहे. या उपसमितीचा अहवाल अंतिम करण्यापूर्वी आमदारांशी चर्चा केली जाईल आणि त्यांच्यासमोर सादरीकरणदेखील केले जाईल. तज्ज्ञांची मते घेण्यात येतील. केळकर समितीने १४६ शिफारशी केलेल्या आहेत. दरडोई उत्पन्न, रोजगाराच्या संधी आणि एकूण समतोल विकासासंदर्भात उपयुक्त शिफारशीच स्वीकारल्या जातील, मंत्रिमंडळ उपसमितीचा अहवाल येत्या डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी तयार होईल, असे मुनगंटीवार म्हणाले. सौरऊर्जा धोरण, मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन, ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी अशा शिफारशींची अंमलबजावणी सरकारने आधीच सुरू केली आहे. जलसंपदासाठी ३० टक्के निधी राखून ठेवावा, अशी शिफारस समितीने केली आहे. पाच वर्षांत राज्यपालांच्या निर्देशांनुसार निधीचा वापर करावयाचा आहे. भूजल हा महत्त्वाचा घटक मानून प्रकल्पांना प्राधान्य द्यावे, अशी चांगली शिफारस समितीने केलेली आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांचा समावेश करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. केळकर समितीचा उद्देश हा समतोल विकासासंदर्भात वाद वाढविण्याचा वा आजवर असा विकास न होण्यासाठी कोण जबाबदार होते हे शोधण्याचा नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)