शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

आपण जागे होणार का?

By admin | Updated: July 5, 2015 02:52 IST

मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात पावसास सुरुवात झाली आणि सगळीकडे आनंदाचे वातावरण फुलले. गेल्यावर्षी ज्या भागात दुष्काळी स्थिती होती, त्या भागातही या वर्षी वरुणराजाने हजेरी लावली.

- डॉ. रामचंद्र साबळे(लेखक राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाचे राज्य सल्लागार आहेत.)

मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात पावसास सुरुवात झाली आणि सगळीकडे आनंदाचे वातावरण फुलले. गेल्यावर्षी ज्या भागात दुष्काळी स्थिती होती, त्या भागातही या वर्षी वरुणराजाने हजेरी लावली. त्यामुळे सगळीकडे समाधान होते. मात्र मराठवाड्यातील वाशिम, परभणी, बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात त्या जिल्ह्यातील जून महिन्याच्या सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. अद्यापही त्या भागात पाऊस अपुरा असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांसाठी चारा इत्यादी प्रश्न ऐरणीवर आले आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील विदर्भातील बुलढाणा, अकोला या जिल्ह्यांतही तेथील जूनच्या सरासरीपेक्षा पाऊस थोडा कमी झाला आहे. या दोन्ही जिल्ह्यांत काही भागात सरासरीहून अधिक, तर काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात जून महिन्याच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला आणि त्या भागात खरिपातील पिकांच्या पेरण्या झाल्या असल्या, तरी तेथील उगवून आलेली पिके पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आता पावसात उघडीप आणि खंड काही काळ जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेरलेली पिके अडचणीत आली आहेत. तेथे पावसाने अधिक ओढ दिल्यास पिके पाण्यावाचून जाणे शक्य असून, तेथे दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. तसेच दुबार पेरणीसाठी निवडावयाची पिके, त्यांच्या जाती आणि बियाण्याची उपलब्धता हे प्रश्न शेती व्यवस्थापनातील महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. तसेच जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता हाही प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. शेतकरी अडचणीत येणार आहेत. बागायत क्षेत्रात या समस्येचे स्वरूप अत्यल्प प्रमाणात राहील. मात्र केवळ १८ टक्केच क्षेत्र महाराष्ट्रात बागायत असल्याने उरलेल्या कोरडवाहू क्षेत्रात आणि दुष्काळी पट्ट्यात या समस्येचे स्वरूप वाढलेले दिसून येईल.या सर्व समस्यांचे स्वरूप हवामान बदलामुळे होत आहे. कमी दिवसात अधिक पाऊस होणे आणि बराच काळ पावसात खंड पडणे, तसेच पावसाचे एकूण दिवस कमी होणे, अशी स्थिती या २१व्या शतकात केवळ हवामान बदलाच्या परिणामाने जाणवत आहे. दुष्काळी पट्ट्यात केवळ तीन आठवड्यांतील ३ ते ४ दिवसांत भरपूर पाऊस होऊन पाणी वाहून जाणे आणि उरलेल्या मान्सून काळात अल्पसा पाऊस होणे, ही स्थिती या शतकाच्या सुरुवातीपासूनच जाणवत आहे. सन १९७२ साली केवळ ८४ तालुके दुष्काळी गणले होते. मात्र सन २०१२ साली १२३ तालुके दुष्काळी होते. म्हणजेच गेल्या ४० वर्षांत ४० हून अधिक तालुक्यांची भर पडत आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने हे चित्र चिंताजनक आहे. तापमानवाढ व हवामान बदल या समस्येस वाहनांच्या संख्येत होणारी वाढ, कारखान्यांच्या संख्येत होणारी वाढ व त्यातून बाहेर पडणारा कार्बन डायआॅक्साइड, कार्बन मोनोआॅक्साईड आणि विमानांमधून बाहेर पडणारा क्लोरोफ्ल्युरो कार्बन यामुळे या समस्या दिवसेंदिवस वाढतच जाणार आहेत. दुसऱ्या बाजूस कार्बन वापरणारी यंत्रणा म्हणजे वनामधील वनस्पतींचे प्रमाण कमी झालेले असल्याने कार्बन वापरणारी यंत्रणा मानवानेच संपुष्टात आणली आहे. त्यामुळे हवेत कार्बन डायआॅक्साइडचे प्रमाण वाढत जाणार आहे. माणसांच्या आरोग्यासाठीही या बाबी भविष्यात घातक ठरणार आहेत आणि ते दिसूनही येत आहे. हे सारे बदल होत असताना उपाय योजण्यासाठी आपण जागे होणार आहोत का?