शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

ढिसाळ यंत्रणेवर कारवाई करणार का?

By admin | Updated: December 22, 2015 01:59 IST

पोलीस, आरटीओ आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे संशयाचा फायदा घेत हिट अ‍ॅण्ड रन केसमधून बॉलीवूड अभिनेता सलमान खानची झालेली सुटका उच्च न्यायालयाने गांभीर्याने घेतली आहे

मुंबई : पोलीस, आरटीओ आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे संशयाचा फायदा घेत हिट अ‍ॅण्ड रन केसमधून बॉलीवूड अभिनेता सलमान खानची झालेली सुटका उच्च न्यायालयाने गांभीर्याने घेतली आहे. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा काही विचार आहे का, असा थेट सवाल उच्च न्यायालयाने सरकारला विचारला आहे. कारवाईचा विचार असेल तर कारवाई कोणत्या स्वरूपाची असेल? असे विचारत उच्च न्यायालयाने यासंदर्भातील तपशील बुधवारी सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.हिट अ‍ॅण्ड रन केसप्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा व्हावी, त्यासाठी कायद्यात सुधारणा करावी, याकरिता ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे होती.हिट अ‍ॅण्ड रन केसप्रकरणात पोलिसांनी अत्यंत ढिसाळ तपास केल्याने उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेवर ताशेरे ओढत सलमानची संशयाचा फायदा देत सुटका केली.सोमवारच्या सुनावणीवेळी न्या. ओक व न्या. पटेल यांनीही ही बाब सरकारी वकिलांच्या निदर्शनास आणून दिली. अशा प्रकारे तपास यंत्रणेच्या भोंगळ कारभाराचा फायदा घेत एखादा आरोपी सुटला तर संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करता? या केसमधील (२००२ हिट अ‍ॅण्ड रन) दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा विचार केला आहे का? विचार केला असेल तर कोणत्या स्वरूपाची कारवाई करणार? अशी विचारणा करत खंडपीठाने २३ डिसेंबरपर्यंत राज्य सरकारला माहिती देण्यास सांगितले आहे.ब्रिदिंग टेस्ट, रक्ताच्या नमुन्यांची चाचणी व रक्त सीलबंद करण्यासाठी काही स्टॅण्डर्ड प्रक्रिया आहे का? त्यासंबंधी काही शासननिर्णय किंवा मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात आली आहेत का? याची आम्हाला तपशीलवार माहिती द्या, असेही निर्देश खंडपीठाने राज्य सरकारला दिले.रक्ताचे नमुने तातडीने तपासण्याबाबत खंडपीठाने सरकारला सवाल केले. त्यावर मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी ग्रामीण भागासाठी फॉरेन्सिल मोबाइल व्हॅन उपलब्ध करण्याचे विचाराधीन आहे. त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आल्याची माहिती खंडपीठाला दिली.सोमवारच्या सुनावणीवेळी खंडपीठाने वाहन परवान्याचा मुद्दाही उपस्थित केला. ‘यासारख्या (हिट अ‍ॅण्ड रन) केसमधील आरोपींचा परवाना रद्द का करण्यात येत नाही? कायद्यात परवाना रद्द करण्याची सोय आहे का? गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या व्यक्तीचा परवानाच रद्द करा. जरी त्याने उच्च न्यायालयात अपील केले असले तरी अपिलावरील निर्णय प्रलंबित असेपर्यंत त्याचा परवाना निलंबित करा,’ अशी सूचना खंडपीठाने राज्य सरकारला केली. या याचिकेवरील पुढील सुनावणी २३ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. ब्रिदिंग टेस्ट, रक्ताच्या नमुन्यांची चाचणी व रक्त सीलबंद करण्यासाठी काही स्टॅण्डर्ड प्रक्रिया आहे का? त्यासंबंधी काही शासन निर्णय किंवा मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात आली आहेत का? याची आम्हाला तपशीलवार माहिती द्या, असेही निर्देश खंडपीठाने राज्य सरकारला दिले.रक्ताचे नमुने तातडीने तपासण्यासाठी नेण्यात येतात का? किती दिवस ते तसेच ठेवू शकता? ठरावीक कालावधीनंतर रक्त खराब होते का? ग्रामीण भागात रक्ताच्या नमुन्याच्या तपासणीबाबत काय, असाही सवाल खंडपीठाने सरकारला केला.