शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

ढिसाळ यंत्रणेवर कारवाई करणार का?

By admin | Updated: December 22, 2015 01:59 IST

पोलीस, आरटीओ आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे संशयाचा फायदा घेत हिट अ‍ॅण्ड रन केसमधून बॉलीवूड अभिनेता सलमान खानची झालेली सुटका उच्च न्यायालयाने गांभीर्याने घेतली आहे

मुंबई : पोलीस, आरटीओ आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे संशयाचा फायदा घेत हिट अ‍ॅण्ड रन केसमधून बॉलीवूड अभिनेता सलमान खानची झालेली सुटका उच्च न्यायालयाने गांभीर्याने घेतली आहे. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा काही विचार आहे का, असा थेट सवाल उच्च न्यायालयाने सरकारला विचारला आहे. कारवाईचा विचार असेल तर कारवाई कोणत्या स्वरूपाची असेल? असे विचारत उच्च न्यायालयाने यासंदर्भातील तपशील बुधवारी सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.हिट अ‍ॅण्ड रन केसप्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा व्हावी, त्यासाठी कायद्यात सुधारणा करावी, याकरिता ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे होती.हिट अ‍ॅण्ड रन केसप्रकरणात पोलिसांनी अत्यंत ढिसाळ तपास केल्याने उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेवर ताशेरे ओढत सलमानची संशयाचा फायदा देत सुटका केली.सोमवारच्या सुनावणीवेळी न्या. ओक व न्या. पटेल यांनीही ही बाब सरकारी वकिलांच्या निदर्शनास आणून दिली. अशा प्रकारे तपास यंत्रणेच्या भोंगळ कारभाराचा फायदा घेत एखादा आरोपी सुटला तर संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करता? या केसमधील (२००२ हिट अ‍ॅण्ड रन) दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा विचार केला आहे का? विचार केला असेल तर कोणत्या स्वरूपाची कारवाई करणार? अशी विचारणा करत खंडपीठाने २३ डिसेंबरपर्यंत राज्य सरकारला माहिती देण्यास सांगितले आहे.ब्रिदिंग टेस्ट, रक्ताच्या नमुन्यांची चाचणी व रक्त सीलबंद करण्यासाठी काही स्टॅण्डर्ड प्रक्रिया आहे का? त्यासंबंधी काही शासननिर्णय किंवा मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात आली आहेत का? याची आम्हाला तपशीलवार माहिती द्या, असेही निर्देश खंडपीठाने राज्य सरकारला दिले.रक्ताचे नमुने तातडीने तपासण्याबाबत खंडपीठाने सरकारला सवाल केले. त्यावर मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी ग्रामीण भागासाठी फॉरेन्सिल मोबाइल व्हॅन उपलब्ध करण्याचे विचाराधीन आहे. त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आल्याची माहिती खंडपीठाला दिली.सोमवारच्या सुनावणीवेळी खंडपीठाने वाहन परवान्याचा मुद्दाही उपस्थित केला. ‘यासारख्या (हिट अ‍ॅण्ड रन) केसमधील आरोपींचा परवाना रद्द का करण्यात येत नाही? कायद्यात परवाना रद्द करण्याची सोय आहे का? गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या व्यक्तीचा परवानाच रद्द करा. जरी त्याने उच्च न्यायालयात अपील केले असले तरी अपिलावरील निर्णय प्रलंबित असेपर्यंत त्याचा परवाना निलंबित करा,’ अशी सूचना खंडपीठाने राज्य सरकारला केली. या याचिकेवरील पुढील सुनावणी २३ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. ब्रिदिंग टेस्ट, रक्ताच्या नमुन्यांची चाचणी व रक्त सीलबंद करण्यासाठी काही स्टॅण्डर्ड प्रक्रिया आहे का? त्यासंबंधी काही शासन निर्णय किंवा मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात आली आहेत का? याची आम्हाला तपशीलवार माहिती द्या, असेही निर्देश खंडपीठाने राज्य सरकारला दिले.रक्ताचे नमुने तातडीने तपासण्यासाठी नेण्यात येतात का? किती दिवस ते तसेच ठेवू शकता? ठरावीक कालावधीनंतर रक्त खराब होते का? ग्रामीण भागात रक्ताच्या नमुन्याच्या तपासणीबाबत काय, असाही सवाल खंडपीठाने सरकारला केला.