शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

अपघातांमुळे एक्स्प्रेस वे बंद करणार का?

By admin | Updated: June 22, 2016 01:57 IST

कंपन्या-औद्योगिक विभाग स्थलांतरित करण्याचा कल्याण-डोंबिवली पालिकेचा ठराव चुकीचा आहे. दुर्घटनेचे मूळ कारण शोधून भविष्यात दुर्घटना घडणार नाही, हे पाहणे महत्वाचे आहे.

कल्याण : कंपन्या-औद्योगिक विभाग स्थलांतरित करण्याचा कल्याण-डोंबिवली पालिकेचा ठराव चुकीचा आहे. दुर्घटनेचे मूळ कारण शोधून भविष्यात दुर्घटना घडणार नाही, हे पाहणे महत्वाचे आहे. एका स्फोटामुळे संपूर्ण उद्योग स्थलांतरित करायचे असतील तर याच न्यायाने वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे एक्स्प्रेस वे बंद करावा लागेल, अशी कडवट टीका कामा या उद्योजकांच्या संघटनेने केली आहे.कल्याण-डोंबिवलीच्या सोमवारच्या महासभेत प्रोबेस कंपनीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली एमआयडीसी विभागातील औद्योगिक पट्टा रद्द करून कंपन्यांचे महापालिका हद्दीबाहेर स्थलांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्याला कामा (कल्याण डोंबिवली मन्युफकचरर्स असोसिएशन) या कारखानदारांच्या संघटनेने विरोध दर्शविला आहे. त्यावेळी संघटनेने या दुर्घटनेविषयी प्रथमच मंगळवारी आपली बाजू मांडली. कामाचे अध्यक्ष संजीव कटेकर, उपाध्यक्ष मुरली अय्यर याच्यासह अन्य आजी-माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. जवळजवळ सर्वच व्यवसायात काही ना काही धोका असतोच. टीबी झालेल्यांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेसनाही त्या रोगाचा धोका असतो, विमान अपघातातही शेकडो प्रवासी मरण पावतात. अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणे आपल्या हातात असते. तरीही त्या होतात. दुर्घटना कोणी मुद्दाम घडवत नाही. तो अपघात असतो. प्रोबेस कंपनीच्या दुर्घटनेचेही समर्थन करण्याचा आमचा हेतू नाही, असे म्हणणे कामा संघटनेने मांडले. रासायनिक कंपन्यांभोवती किमान दोनशे मीटर्सचा मोकळा संरक्षित पट्टा (बफर झोन) ठेवणे आवश्यक असताना नियोजन करणाऱ्या सरकारी यंत्रणेने त्याची तरतूद केली नाही. ही घोडचूक या अपघाती घटनांच्या मुळाशी असल्याकडे कामाने लक्ष वेधले. आपल्या कंपनीत दुर्घटना घडावी आणि हानी व्हावी अशी कुठल्याही कारखानदाराची इच्छा नसते. तो अपघात असतो. परंतु घटना घडल्यानंतर संबंधित मालकावर गुन्हे दाखल करून त्याला गुन्हेगाराच्या भूमिकेत उभे केले जाते, हे चुकीचे असल्याचे म्हणणे संघटनेने मांडले. प्रोबेस कंपनीत झालेला अपघात हे कोडे असून तेथे पडलेला मोठा खड्डा हे गूढ आहे. म्हणूनच या अपघाताची सक्षम यंत्रणांकडून सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी संघटनेने केली. (प्रतिनिधी) शनिवारी घेणार सुरक्षेची प्रतिज्ञाकामा संघटनेच्या डोंबिवली कार्यालयात शनिवारी, २५ जूनला सुरक्षेची प्रतिज्ञा घेतली जाणार आहे. सुरक्षिततेचा प्रसार करण्यासाठी आणि असे अपघात पुन्हा घडू नयेत, यासाठी मालक, अधिकारी आणि कामगारांना प्रशिक्षण देण्यास आम्ही बांधील आहोत, हे दाखवून देण्यासाठी प्रतिज्ञा घेतली जाणार आहे. भविष्यात असे अपघात होऊ नयेत म्हणनू काळजी घेऊ, सुरक्षेच्या नियमांचे पालन करू, कामगारांना सुरक्षेसंदर्भात प्रशिक्षण देऊ, उत्पादनाचे लक्ष्य गाठण्यासाठी सुरक्षिततेशी तडजोड करणार नाही, अशी प्रतिज्ञा घेतली जाणार आहे. ‘त्या’ ठरावाचे भवितव्य अधांतरीप्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटातील हानीमुळे औद्योगिक पट्टा रद्द करून कंपन्या इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव सोमवारी झालेल्या केडीएमसीच्या महासभेत मंजूर करण्यात आला असला, तरी अशा अशासकीय ठरावांचे भवितव्य हे प्रशासनाच्या भूमिकेवर अवलंबून आहे. त्यामुळे त्याच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्हच शंकाच आहे.हा प्रस्ताव पालिका प्रशासनाने सादर केलेला नाही. तर सभागृहनेते राजेश मोरे यांनी त्याची सूचना दाखल केली होती. सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्याला मान्यता दिली असली तरी हा अशासकीय ठराव आहे. त्यामुळे तो पालिका प्रशासनाकडे पाठवावा लागेल. त्यानंतर सर्व बाजूंनी विचार करून योग्य वाटल्यास प्रशासन तो शासकीय स्वरूपात महासभेला पाठवेल. मंजुरीसाठी संबंधित अशासकीय ठराव सरकारकडेही पाठविला जाऊ शकतो. त्यामुळे सर्वपक्षीय सदस्यांनी एकमताने जरी कंपन्या हद्दीबाहेर घालविण्याचा प्रस्ताव मान्य केला असला, तरी ही सध्या त्या प्रस्तावाचे भवितव्य अधांतरी आहे.