शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

वीजगळती रोखणार!

By admin | Updated: May 10, 2015 02:52 IST

राज्यात सर्वत्र भूमिगत वीजपुरवठा यंत्रणा उभी करून वीजचोरीला आळा घालण्याकरिता केंद्र सरकारने राज्य सरकारला ८ हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी ऊर्जा मंत्रालयाने केली

संदीप प्रधान, मुंबई

राज्यात सर्वत्र भूमिगत वीजपुरवठा यंत्रणा उभी करून वीजचोरीला आळा घालण्याकरिता केंद्र सरकारने राज्य सरकारला ८ हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी ऊर्जा मंत्रालयाने केली आहे. राज्यात सध्या सरासरी १४ टक्के वीजचोरी व गळती असून, १ टक्के वीजचोरी रोखली तरी राज्य सरकारचे २०० कोटी रुपये वाचणार आहेत.ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, मुंबईत पूर्णत: तर पुणे, नागपूर, औरंगाबाद या शहरांत अंशत: भूमिगत वीजपुरवठा यंत्रणा आहे. याखेरीज राज्यात कुठेही अशी व्यवस्था नसल्याने आकडे टाकून वीजचोरी करणे, बेकायदा वीजजोडण्या घेणे असे प्रकार घडतात. भूमिगत वीजपुरवठ्याची व्यवस्था केल्यास खात्रीलायक वीजपुरवठा होतो. सध्या राज्यात सरासरी १४ टक्के वीजचोरी व गळती असल्याने १ हजार कोटी रुपयांचा फटका महावितरणला बसतो.याखेरीज राज्यातील १६ हजार फिडरकरिता फिडर व्यवस्थापन समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. सध्या एका फिडरची सात एजन्सीवर जबाबदारी आहे. याच एजन्सी मीटर रिडिंग घेणे, बिले तयार करणे आदी कामे करतात. आता फिडर व्यवस्थापन समितीमध्ये पाच आयटीआय व एक बीई इलेक्ट्रीकल यांचा समावेश असेल व त्यांनी त्या फिडरमधून वीजचोरी होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. जेवढी वीजचोरी ते रोखतील त्या प्रमाणात त्यांना मोबदला दिला जाणार आहे. राज्यातील एक हजार फिडरवर ४५ टक्क्यांपेक्षा जास्त वीजगळती असून, ८ हजार फिडरवर २० ते २५ टक्के वीजगळती आहे. ग्रामीण भागात ज्या फिडरवर ४२ टक्क्यांपेक्षा जास्त गळती आहे त्या भागात भारनियमन केले जाते; तर शहरी भागात ४५ टक्क्यांपेक्षा जास्त गळती असल्यास भारनियमन केले जाते.