शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
5
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
8
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
9
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
10
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
11
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
12
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
13
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
14
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
15
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
16
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
17
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
18
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
19
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
20
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

वीजगळती रोखणार!

By admin | Updated: May 10, 2015 02:52 IST

राज्यात सर्वत्र भूमिगत वीजपुरवठा यंत्रणा उभी करून वीजचोरीला आळा घालण्याकरिता केंद्र सरकारने राज्य सरकारला ८ हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी ऊर्जा मंत्रालयाने केली

संदीप प्रधान, मुंबई

राज्यात सर्वत्र भूमिगत वीजपुरवठा यंत्रणा उभी करून वीजचोरीला आळा घालण्याकरिता केंद्र सरकारने राज्य सरकारला ८ हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी ऊर्जा मंत्रालयाने केली आहे. राज्यात सध्या सरासरी १४ टक्के वीजचोरी व गळती असून, १ टक्के वीजचोरी रोखली तरी राज्य सरकारचे २०० कोटी रुपये वाचणार आहेत.ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, मुंबईत पूर्णत: तर पुणे, नागपूर, औरंगाबाद या शहरांत अंशत: भूमिगत वीजपुरवठा यंत्रणा आहे. याखेरीज राज्यात कुठेही अशी व्यवस्था नसल्याने आकडे टाकून वीजचोरी करणे, बेकायदा वीजजोडण्या घेणे असे प्रकार घडतात. भूमिगत वीजपुरवठ्याची व्यवस्था केल्यास खात्रीलायक वीजपुरवठा होतो. सध्या राज्यात सरासरी १४ टक्के वीजचोरी व गळती असल्याने १ हजार कोटी रुपयांचा फटका महावितरणला बसतो.याखेरीज राज्यातील १६ हजार फिडरकरिता फिडर व्यवस्थापन समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. सध्या एका फिडरची सात एजन्सीवर जबाबदारी आहे. याच एजन्सी मीटर रिडिंग घेणे, बिले तयार करणे आदी कामे करतात. आता फिडर व्यवस्थापन समितीमध्ये पाच आयटीआय व एक बीई इलेक्ट्रीकल यांचा समावेश असेल व त्यांनी त्या फिडरमधून वीजचोरी होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. जेवढी वीजचोरी ते रोखतील त्या प्रमाणात त्यांना मोबदला दिला जाणार आहे. राज्यातील एक हजार फिडरवर ४५ टक्क्यांपेक्षा जास्त वीजगळती असून, ८ हजार फिडरवर २० ते २५ टक्के वीजगळती आहे. ग्रामीण भागात ज्या फिडरवर ४२ टक्क्यांपेक्षा जास्त गळती आहे त्या भागात भारनियमन केले जाते; तर शहरी भागात ४५ टक्क्यांपेक्षा जास्त गळती असल्यास भारनियमन केले जाते.