शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

भक्कम पुराव्यांसह बाजू मांडणार

By admin | Updated: October 6, 2016 05:39 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात भक्कम पुराव्यांसह प्रभावीपणे राज्य सरकार आपली बाजू मांडेल

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात भक्कम पुराव्यांसह प्रभावीपणे राज्य सरकार आपली बाजू मांडेल, असा विश्वास मराठा समाज आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.मराठा आरक्षणाबाबत १३ आॅक्टोबर रोजी उच्च न्यायलयात सुनावणी आहे. या संदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मराठा आरक्षण कृती समितीची बैठक झाली. बैठकीला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार, ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. ए. थोरात, विशेष सरकारी वकील अभिनंदन वग्यानी आदी मान्यवर उपस्थित होते. उच्च न्यायालयात १३ आॅक्टोबरपासून मराठा आरक्षणाच्या याचिकांवर नियमित सुनावणी अपेक्षित आहे. या सुनावणींच्या वेळी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी सरकार आवश्यक ७० पुरावे सादर करणार आहे. त्याचप्रमाणे मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला असून या समाजाची आर्थिकस्थिती बिकट आहे, हे सिद्ध करण्याच्यादृष्टीने राज्य सरकारच्या वतीने मराठा समाजाची सांख्यिकी माहिती न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. या सुनावणी दरम्यान राज्य सरकारची बाजू कोणत्या पध्दतीने मांडता येईल? कोणते भक्कम पुरावे सादर करण्यात येतील? त्याचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत घेतला, अशी माहिती तावडे यांनी दिली. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ हरीश साळवे हे राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात आपली बाजू मांडणार आहेत. कोणतेही मानधन न घेता मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्यादृष्टीने ते सरकारची कायदेशीर बाजू मांडतील, असे तावडे यांनी स्पष्ट केले.