शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

अनधिकृत बांधकाम प्रश्न सोडविणार

By admin | Updated: October 1, 2014 00:25 IST

‘‘अनधिकृत बांधकामांचा प्रश्न राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढला असून, राज्यात सरकार आल्यानंतर या प्रश्नांची सोडवणूक करू’’, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

पिंपरी : ‘‘अनधिकृत बांधकामांचा प्रश्न राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे  वाढला असून, राज्यात सरकार आल्यानंतर या प्रश्नांची सोडवणूक करू’’, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडा संकुलात आयोजित सभेत ते बोलत होते. जिल्ह्यातील भाजपाचे उमेदवार या वेळी उपस्थित होते. 
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना गडकरी म्हणाले, ‘‘महाराष्ट्रावर तीन लाख कोटींचे कर्ज आहे. त्याचे व्याज दिले तर विकास कशातून करायचा हा खरा प्रश्न आहे. महाराष्ट्र कजर्बाजारी कोणामुळे झाला,  का झाला, ज्या कामात भ्रष्टचार झाला, तो कोणामुळे झाला याची माहिती जनतेला मिळायला हवी. चुकीच्या कामांमुळे महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर गेला आहे. सिंचनाबाबत श्वेतपत्रिका काढली त्यात आलेली माहिती धक्कादायक आहे. 7क् हजार कोटी खचरून सिंचन मात्र क्.1 टक्के वाढले. आजही शेतीला पाणी मिळत नाही. सिंचनाचा पैसा गेला कुठे? भ्रष्टाचार वाढल्यामुळे शेती आहे तर पाणी नाही, पाणी आहे तर वीज नाही. एकेकाळी वीजनिर्मितीत आघाडीवर असणा:या राज्यात आज वीज नाही. त्यामुळे शेतमालाला भाव नाही. यातून कजर्बाजारी झालेल्या शेतक:यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही. वीज नसल्याने पंपावर कर्ज झाले आहे. व्याजाचा मीटर चालू झाल्याने वीज मीटर बंद झाला आहे. त्यामुळे तरुणांना रोजगार मिळत नाही. व्यापारी एलबीटीने त्रस्त आहेत. एकाही क्षेत्रत समाधान नाही.’’
गडकरी म्हणाले, ‘‘जात, पंथ, भाषेचा आधार घेऊन भाजपा काम करीत नाही. शिवाजीमहाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या नावाने लक्ष्मीदर्शनाचे काम आघाडी सरकारने केले आहे. मुख्यमंत्री फायलींवर बसून आहेत. म्हणूनच शरद पवार म्हणाले होते, त्यांच्या हाताला लकवा मारलाय, ते खरे आहे.’’
जगताप म्हणाले, ‘‘नागपूरचा विकास झाला, तसा पिंपरी-चिंचवडचा विकास झाला नाही. या शहराचे शांघाय करण्याची गरज आहे. विनापरवाना बांधकामे, पूररेषा, शास्तीकराचे प्रश्न सुटण्यासाठी मी भाजपामध्ये आलो आहे.’’ (प्रतिनिधी)
 
पुण्यातही मेट्रो, रस्ते विकासास प्राधान्य, 
देहू-आळंदी-पंढरपूर पालखी मार्गास पाच हजार कोटी, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण, सोलापूर-कोल्हापूर अशा विविध रस्त्यांच्या 4क् हजार कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. नागपूरला मेट्रो आली, तर मुख्यमंत्र्यांना पोटदुखी झाली. नागपूरला अगोदर मेट्रो कशी, असा प्रश्न त्यांनी केला. तुमची फाईल कोठे होती? मंत्रलयातच ना, कारण तुम्हीच तिच्यावर बसून होतात. कोणताही प्रस्ताव दिला नसताना मेट्रो येईल कशी? आम्हाला विकासाचे राजकारण करायचे आहे. पुण्यातही मेट्रो येईल.
 
आरटीओ कार्यालय व पांढ:या वेशातील पोलिसांची गरज भासणार नाही. कारण सर्व परवाने ऑनलाइन केले जातील. एखाद्या मंत्र्याने सकाळी सिग्नल तोडला, तर दंडाची पावती त्याच्या घरी सायंकाळी पोहोचेल. देश भ्रष्टाचारमुक्त करण्याचे ध्येय आहे.
- नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री