शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

अडतीचा प्रश्न लवकर सोडविणार

By admin | Updated: January 7, 2015 02:03 IST

‘शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येणाऱ्या अडतीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. बाजार समित्यांना भेट देऊन सर्वांचे मत ऐकून घेतले जात आहे

नवी मुंबई : ‘शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येणाऱ्या अडतीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. बाजार समित्यांना भेट देऊन सर्वांचे मत ऐकून घेतले जात आहे. शेतकऱ्यांवरील थोडासा भार ग्राहकांवर टाकता येईल का, याचीही चाचपणी सुरू आहे. याविषयी तोडगा काढण्यासाठी १५ जानेवारीला मंत्रालयात विशेष बैठक आयोजित केली जाणार आहे,’ अशी माहिती पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पणनमंत्र्यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन येथील व्यापारी, अधिकारी व इतर घटकांशी अडतीविषयी चर्चा केली. भाजी व फळ मार्केटला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. भाजी मार्केटमध्ये ८ टक्के तर फळ मार्केटमध्ये १० टक्के अडत घेतली जात आहे. या रकमेमध्ये कपात करता येईल का, शेतकऱ्यांकडून सर्व रक्कम वसूल न करता काही रक्कम ग्राहकांकडून वसूल करता येईल का, याविषयी चर्चा केली. व्यापारी प्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडूनच अडत घेणे सोयीस्कर आहे. ग्राहकांकडून पैसे वसूल करण्यातअडचणी असल्याचे मत व्यक्त केले. मुंबई हे टर्मिनल मार्केट आहे. या ठिकाणी खरेदी केलेला माल मोठ्याप्रमाणात येत असल्याचेही मत अनेकांनी व्यक्त केले. पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, ‘अधिवेशन सुरू असताना घाई-गडबडीत अडत बंदचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राज्यभर व्यापाऱ्यांनी आंदोलन केले. यामुळे आदेशास तत्काळ स्थगिती दिली आहे. याविषयी शेतकरी व बाजार समितीमधील घटक सर्वांना विश्वासात घेऊन योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.’ नाशिक, पुणे परिसरातील बाजार समित्यांनाही पणनमंत्री भेट देणार आहेत. यानंतर १५जानेवारीला मंत्रालयात व्यापारी, शेतकरी व सर्व घटकांची बैठक घेऊन योग्य तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी आमदार मंदा म्हात्रे, बाजार समितीचे सचिव सुधीर तुंगार, शरद जरे, व्यापारी प्रतिनिधी अशोक हांडे, संजय पानसरे व इतर उपस्थित होते. बाजार समितीमध्ये सर्व अडत शेतकऱ्यांकडून वसूल केली जात आहे. यास राज्यभरातील शेतकरी प्रतिनिधींनी विरोध करण्यास सुरवात केली आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील भार कमी करण्यासाठी काही रक्कम शेतकरी तर काही रक्कम ग्राहकांकडून वसूल करण्याविषयी तोडगा काढण्याची तयारी सुरू आहे.