शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

अडतीचा प्रश्न लवकर सोडविणार

By admin | Updated: January 7, 2015 02:03 IST

‘शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येणाऱ्या अडतीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. बाजार समित्यांना भेट देऊन सर्वांचे मत ऐकून घेतले जात आहे

नवी मुंबई : ‘शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येणाऱ्या अडतीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. बाजार समित्यांना भेट देऊन सर्वांचे मत ऐकून घेतले जात आहे. शेतकऱ्यांवरील थोडासा भार ग्राहकांवर टाकता येईल का, याचीही चाचपणी सुरू आहे. याविषयी तोडगा काढण्यासाठी १५ जानेवारीला मंत्रालयात विशेष बैठक आयोजित केली जाणार आहे,’ अशी माहिती पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पणनमंत्र्यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन येथील व्यापारी, अधिकारी व इतर घटकांशी अडतीविषयी चर्चा केली. भाजी व फळ मार्केटला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. भाजी मार्केटमध्ये ८ टक्के तर फळ मार्केटमध्ये १० टक्के अडत घेतली जात आहे. या रकमेमध्ये कपात करता येईल का, शेतकऱ्यांकडून सर्व रक्कम वसूल न करता काही रक्कम ग्राहकांकडून वसूल करता येईल का, याविषयी चर्चा केली. व्यापारी प्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडूनच अडत घेणे सोयीस्कर आहे. ग्राहकांकडून पैसे वसूल करण्यातअडचणी असल्याचे मत व्यक्त केले. मुंबई हे टर्मिनल मार्केट आहे. या ठिकाणी खरेदी केलेला माल मोठ्याप्रमाणात येत असल्याचेही मत अनेकांनी व्यक्त केले. पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, ‘अधिवेशन सुरू असताना घाई-गडबडीत अडत बंदचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राज्यभर व्यापाऱ्यांनी आंदोलन केले. यामुळे आदेशास तत्काळ स्थगिती दिली आहे. याविषयी शेतकरी व बाजार समितीमधील घटक सर्वांना विश्वासात घेऊन योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.’ नाशिक, पुणे परिसरातील बाजार समित्यांनाही पणनमंत्री भेट देणार आहेत. यानंतर १५जानेवारीला मंत्रालयात व्यापारी, शेतकरी व सर्व घटकांची बैठक घेऊन योग्य तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी आमदार मंदा म्हात्रे, बाजार समितीचे सचिव सुधीर तुंगार, शरद जरे, व्यापारी प्रतिनिधी अशोक हांडे, संजय पानसरे व इतर उपस्थित होते. बाजार समितीमध्ये सर्व अडत शेतकऱ्यांकडून वसूल केली जात आहे. यास राज्यभरातील शेतकरी प्रतिनिधींनी विरोध करण्यास सुरवात केली आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील भार कमी करण्यासाठी काही रक्कम शेतकरी तर काही रक्कम ग्राहकांकडून वसूल करण्याविषयी तोडगा काढण्याची तयारी सुरू आहे.