शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

शिवस्मारक कोर्टकज्ज्यात रखडणार? काम सुरू करू नका - सर्वोच्च न्यायालय

By यदू जोशी | Updated: January 13, 2019 05:45 IST

पर्यावरण मंजुरीचा वाद : अंतरिम स्थगिती न देता दिले तोंडी निर्देश

- यदु जोशी

मुंबई : पर्यटनाच्या दृष्टीने देशातील महत्त्वाचे आकर्षण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईजवळच्या अरबी समुद्रात अतिभव्य स्मारक उभारण्याची राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना कोर्टकज्ज्यात रखडण्याची चिन्हे आहेत. एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने औपचारिक स्थगिती दिली नसली, तरी या प्रकल्पाचे काम सुरू करू नका, असे स्पष्ट तोंडी निर्देश शुक्रवारी दिले.

या स्मारकास केंद्र सरकारने दिलेल्या सीआरझेड व पर्यावरणविषयक मंजुरीला आव्हान देणारी ‘कॉन्झर्व्हेशन अ‍ॅक्शन ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेने व त्यांचे विश्वस्त देबी गोएंका यांनी केलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. याचिकाकर्त्यांनी अंतरिम मनाई हुकूम देण्याचा आग्रह धरल्यावर उच्च न्यायालयाने तेवढ्याच मुद्द्यावर सविस्तर सुनावणी घेऊन, गेल्या २ नोव्हेंबर रोजी मनाईस नकार दिला होता. मुख्य न्यायाधीश न्या. नरेश पाटील व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने त्या वेळी २२ पानी निकालपत्र देऊन अंतरिम मनाई न देण्याच्या कारणांचा सविस्तर ऊहापोह केला होता. उच्च न्यायालयाच्या या अंतरिम निकालाविरुद्ध याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका केली आहे. ही याचिका शुक्रवारी सुनावणीस आली, तेव्हा सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई व न्या. संजय कृष्ण कौल यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचे म्हणणे ऐकले व संबंधित कागदपत्रेही वाचली. त्यानंतर, राज्य सरकार, केंद्रीय पर्यावरण मंत्रालय व राज्याचे सीआरझेड प्राधिकरण या प्रतिवादींना नोटीस काढण्याचा औपचारिक आदेश दिला गेला.

सुनावणीस हजर असलेल्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंतरिम स्थगितीचा मुद्दा निघाला, तेव्हा याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी या कामाची ‘वर्क आॅर्डर’ आॅक्टोबरमध्येच जारी झाली असल्याचे निदर्शनास आणले. मात्र, जागेवर प्रत्यक्षात कोणत्याही कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही, असे सरकारच्या वकिलाने सांगितले. यावर न्यायालयाने असे सांगितले की, आम्ही अंतरिम स्थगितीचा उल्लेख औपचारिकपणे करत नाही, पण हे काम सुरू झाले नसल्याने सरकारने ते दरम्यानच्या काळात सुरू करू नये.

याचिका पुन्हा चार आठवड्यांनी सुनावणीस ठेवण्याची याचिकाकर्त्यांची विनंतीही न्यायालयाने मान्य केली नाही. मुळात उच्च न्यायालयाचा निकाल झाल्यावर लगेच म्हणजे २२ नोव्हेंबर रोजी केलेली ही याचिका दीड महिन्याने पहिल्या सुनावणीस आली. आताही प्रतिवादींना नोटीस काढली असली, तरी ती पुन्हा केव्हा सुनावणीस येईल, याविषयी निश्चिती नाही. त्यामुळे ‘काम सुरू करू नका, हे न्यायालयाचे तोंडी निर्देश पुढील चार-सहा महिनेही लागू राहू शकतील.या सुनावणीत याचिकाकर्त्यांसाठी ज्येष्ठ वकील सी. यू. सिंग यांनी तर राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. निशांंत कातनेश्वरकर यांनी काम पाहिले.प्रकल्पातील वादग्रस्त कळीचा मुद्दा काय?केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या स्मारकाच्या कामास सीआरझेड व पर्यारणीय मंजुरी २३ फेब्रुवारी, २०१५ रोजी दिली. त्याच्या एक आठवडा आधी केंद्र सरकारने १५ फेब्रुवारी रोजी अधिसूचना काढून, सन २०११च्या मूळ सीआरझेड नियमावलीत दुरुस्ती केली. याद्वारे असे ठरविण्यात आले की, पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने पुरेसे खबरदारीचे उपाय योजून, सीआरझेड क्षेत्रात राज्य सरकार एखाद्या स्मारकाचे काम करणार असेल. ते मानवी वस्तीपासून दूरवर आहे व त्यात कोणाही विस्थापिताचे पुनर्वसन करण्याचा प्रश्न उद््भवणार नाही,याविषयी खात्री पटली, तर सीआरझेड मंजुरीआधी जाहीर जनसुनावणी घेण्याची अट केंद्र सरकार माफ करू शकेल. या दुरुस्तीचा आधार घेऊन जाहीर जनसुनावणीस फाटा देऊनकेंद्र सरकारने मंजुरी दिली होती. याचिकेत या दुरुस्तीची वैधता हाच मुख्य विवाद्य मुद्दा आहे.

टॅग्स :Shiv Smarakशिवस्मारकCourtन्यायालय