शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीच्या फरकाची रक्कम क धी मिळणार?

By admin | Updated: July 30, 2014 01:13 IST

उच्च शिक्षणासाठी शासनाच्या वतीने देण्यात येणारी शिष्यवृत्तीच्या फरकाची रक्कम कधी मिळणार असा सवाल विद्यार्थी करीत आहेत. एम.एड. करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यावृत्तीच्या फ रकाचा निधी

परिपत्रक असूनही अधिकाऱ्यांची टाळाटाळनागपूर : उच्च शिक्षणासाठी शासनाच्या वतीने देण्यात येणारी शिष्यवृत्तीच्या फरकाची रक्कम कधी मिळणार असा सवाल विद्यार्थी करीत आहेत. एम.एड. करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यावृत्तीच्या फ रकाचा निधी शासनाने मान्य करूनही केवळ अधिकाऱ्यांच्या कामचलाऊ धोरणामुळे ही रक्कम मिळाली नसल्याचा आरोप विद्यार्थी करीत आहेत. राज्याच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. एमएड अभ्यासक्रमासाठी समाजकल्याण विभागाने सन २०१२ साली १० हजार रुपये शिष्यवृती मंजूर केली होती. महाविद्यालयात लागणाऱ्या शिक्षण शुल्काएवढी रक्कम शिष्यवृत्ती म्हणून दिली जावी अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. त्यावेळी एमएड अभ्यासक्रमाचे शिक्षण शुल्क ५० ते ७० हजारांच्या दरम्यान होते. यामुळे शासनाने मंजूर केलेली शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांनी नाकारली. एमएड महाविद्यालयांनी ती स्वीकारली नाही. मात्र काही महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे १० हजार घेतले. यानंतर शासनाने एका अध्यादेशानुसार शिष्यवृत्ती म्हणून संपूर्ण शिक्षण शुल्क मंजूर केले. सोबतच शिष्यवृत्तीच्या फरकाची रक्कम देखील देण्याचे शासनाने मान्य केले. ज्या महाविद्यालयांनी १० हजार रुपये घेतले होते अशा महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना ही रक्कम मिळेल अशी अपेक्षा होती. सन २०१२ साली मान्य झालेली शिष्यवृतीची तफावत महाविद्यालयांना अद्याप मिळाली नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे कागदपत्रे महाविद्यालयात अडकून पडली आहेत. नागपुरातील एका महाविद्यालयाचा यात समावेश आहे. आपली कागदपत्रे मिळवी यासाठी विद्यार्थी प्रयत्न करीत असताना पूर्ण शिष्यवृती मिळाल्याशिवाय कागदपत्रे देता येणार नाहीत असे महाविद्यालयांनी सांगितले. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी महाविद्यालय, समाजकल्याण आयुक्त यांनादेखील निवेदने सादर केली. शिष्यवृत्तीच्या फरकाची रक्कम शासनाने मान्य केली असताना केवळ अधिकारी कोणत्या पद्धतीने फरकाची रक्कम द्यावी याबाबत शासनाने आदेश दिले नसल्याचा हवाला विद्यार्थ्यांना देत आहेत. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी समाज कल्याण मंत्री शिवाजीराव मोघे, वित्त व नियोजन राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना निवेदने दिली आहेत. याबाबत त्यांच्याकडूनही पत्र व्यवहार झाल्यावर देखील अधिकारी कार्यवाही करीत नसल्याने विद्यार्थी संकटात सापडले आहेत. (प्रतिनिधी)