शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

राज्यात दोन कोटी झाडे जगविणार - रामदास कदम

By admin | Updated: April 8, 2016 02:44 IST

बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर वातावरणीय बदलांचा वेध घेण्यासाठी राज्यात स्वतंत्र वातावरण बदल कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम

मुंबई : बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर वातावरणीय बदलांचा वेध घेण्यासाठी राज्यात स्वतंत्र वातावरण बदल कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. तसेच आगामी काळात राज्यात दोन कोटी झाडे लावून ती जगविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पर्यावरणीय बदल आणि त्याच्या परिणामांबाबत भाजपाच्या शोभा फडणवीस यांनी अल्पकालीन चर्चेची मागणी केली होती. वातावरणातील बदलामुळे राज्यात पावसाचे प्रमाण कमी होत आहे. गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. हे मुद्दे त्यांनी उपस्थित केले होते. तर, शेकापचे जयंत पाटील म्हणाले की, जागतिक वातावरणात होत असलेल्या बदलाचा थेट परिणाम शेती आणि शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर होतो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे समाजाचा अन्नदाता शेतकरीच आज अन्नापासून वंचित होऊ लागला आहे. सदस्य राहुल नार्वेकर यांनीही याच भावना व्यक्त केल्या. या वेळी मंत्री कदम म्हणाले, वातावरणातील बदलाची समस्या जागतिक आहे. झाडे तोडली जातात. पण झाडे लावण्याचे काहीच नियोजन होत नाही. वृक्षारोपण केले जाते. पण त्यापैकी किती झाडे जगतात याचे आॅडिट होत नाही तसेच महामार्गांसाठी हजारो झाडांची कत्तल होते, अशावेळी नवीन झाडे लावल्यानंतरच जुनी झाडे तोडण्याची परवानगी देण्याची गरज आहे. वातावरण नियंत्रित ठेवण्यासाठी वनांचे आच्छादन ३३ टक्क्यांपर्यंत असायला हवे. सध्या हे प्रमाण खूपच कमी आहे. ३३ टक्क्यांचे उद्धिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)