शहरं
Join us  
Trending Stories
1
निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

राज्यात दोन कोटी झाडे जगविणार - रामदास कदम

By admin | Updated: April 8, 2016 02:44 IST

बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर वातावरणीय बदलांचा वेध घेण्यासाठी राज्यात स्वतंत्र वातावरण बदल कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम

मुंबई : बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर वातावरणीय बदलांचा वेध घेण्यासाठी राज्यात स्वतंत्र वातावरण बदल कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. तसेच आगामी काळात राज्यात दोन कोटी झाडे लावून ती जगविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पर्यावरणीय बदल आणि त्याच्या परिणामांबाबत भाजपाच्या शोभा फडणवीस यांनी अल्पकालीन चर्चेची मागणी केली होती. वातावरणातील बदलामुळे राज्यात पावसाचे प्रमाण कमी होत आहे. गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. हे मुद्दे त्यांनी उपस्थित केले होते. तर, शेकापचे जयंत पाटील म्हणाले की, जागतिक वातावरणात होत असलेल्या बदलाचा थेट परिणाम शेती आणि शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर होतो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे समाजाचा अन्नदाता शेतकरीच आज अन्नापासून वंचित होऊ लागला आहे. सदस्य राहुल नार्वेकर यांनीही याच भावना व्यक्त केल्या. या वेळी मंत्री कदम म्हणाले, वातावरणातील बदलाची समस्या जागतिक आहे. झाडे तोडली जातात. पण झाडे लावण्याचे काहीच नियोजन होत नाही. वृक्षारोपण केले जाते. पण त्यापैकी किती झाडे जगतात याचे आॅडिट होत नाही तसेच महामार्गांसाठी हजारो झाडांची कत्तल होते, अशावेळी नवीन झाडे लावल्यानंतरच जुनी झाडे तोडण्याची परवानगी देण्याची गरज आहे. वातावरण नियंत्रित ठेवण्यासाठी वनांचे आच्छादन ३३ टक्क्यांपर्यंत असायला हवे. सध्या हे प्रमाण खूपच कमी आहे. ३३ टक्क्यांचे उद्धिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)