शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

...तर राजकारण सोडेन

By admin | Updated: February 9, 2017 05:35 IST

‘मुंबईचे पाटणा झाले,’ असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसह पाटण्याचाही अपमान केला आहे.

मुंबई : ‘मुंबईचे पाटणा झाले,’ असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसह पाटण्याचाही अपमान केला आहे. मुंबई आणि पाटण्याची तुलना करा, तशी ती झालीच तर मी राजकारण सोडेन, पण मुंबईचे पाटणा ठरले नाही तर तुम्ही मुंबई सोडा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलुंड येथील प्रचारसभेत शिवसेना आणि मुंबई महापालिकेच्या कारभार टीका केली होती. केंद्राच्या अहवालात मुंबई क्रमांकावर नसून, तिसऱ्या क्रमांकावर आहे. सल्लागारांनी अर्धवट माहिती दिल्याने, उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडघशी पडण्याची वेळ आल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला उद्धव यांनी कांदिवली येथील सभेत चोख प्रत्युत्तर दिले. मुंबई महापालिका पारदर्शकतेत देशात अव्वलच आहे. तसा अहवाल केंद्र सरकारनेच दिला आहे. केंद्राच्या अहवालावर विश्वास नसेल, तर केंद्रात तुमची गाढवे बसली आहेत का, असा प्रश्न विचारतानाच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचीच अर्धवटराव अशी संभावना केली. या अहवालात मुख्यमंत्र्यांचे नागपूर कुठे आहे, असा सवालही उद्धव यांनी केला. ‘मुख्यमंत्री हे उपरवाल्याच्या मर्जीतले आहेत. मुंबई जिंका अशा सूचना त्यांना वरून देण्यात येतात. योग्यता नसणाऱ्यांशी लढतो आहे, याची लाज वाटते,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘मुख्यमंत्री फडणवीस घसा बसेपर्यंत ओरडतात. घसा बसल्यावर मुंबई महानगरपालिकेचेच पाणी पितात. जे घसा बसल्यानंतर मुंबई महापालिकेचेच पाणी पितात, ते काय आम्हाला पाणी पाजणार, असा सवालदेखील उद्धव ठाकरे यांनी या वेळी उपस्थित केला. आमच्या जाहीरनाम्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र आहे. मात्र, भाजपाला जाहीरनामा स्टॅम्प पेपरवर छापावा लागतो. कारण जाहीरमान्यावर छायाचित्र असलेल्या पंतप्रधान मोदींची जनमानसातील विश्वासार्हता संपलेली आहे. मुख्यमंत्री कल्याण-डोंबिवलीला साडेसहा हजार कोटी रुपये देणार आहेत. त्यातील एक रुपयादेखील मिळालेला नाही. अशी खोटी माणसे २५ वर्षे जपली, याची खंत वाटते,’ असे म्हणत उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांवर टीकेची झोड उठवली.