शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
3
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
4
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
5
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
6
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
7
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
8
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
9
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
10
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
11
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
12
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
13
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
14
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
15
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
16
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
17
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
18
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
19
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
20
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन

पंतप्रधान दुष्काळ पाहणी करतील ?

By admin | Updated: September 6, 2015 01:59 IST

बिहारमध्ये निवडणूक आहे म्हणून सव्वा लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करणाऱ्या पंतप्रधानांना महाराष्ट्रावर अतिशय भीषण दुष्काळाचे संकट असतानाही येथे यायला वेळ मिळालेला नाही.

बिहारला निवडणुकीमुळे सव्वा लाख कोटींचे पॅकेज, पण महाराष्ट्राकडे दुर्लक्ष...

मुंबई : बिहारमध्ये निवडणूक आहे म्हणून सव्वा लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करणाऱ्या पंतप्रधानांना महाराष्ट्रावर अतिशय भीषण दुष्काळाचे संकट असतानाही येथे यायला वेळ मिळालेला नाही. भाजपाचे राज्यातील सरकार दुष्काळी उपाययोजनांबाबत संपूर्णत: अपयशी ठरल्याने परिस्थिती स्फोटक झाली आहे. त्यामुळे आतातरी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येऊन केंद्राच्या वतीने भरीव मदत जाहीर करतील का, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी प्रदेश काँग्रेस कार्यालयात शनिवारी दुपारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले, मालदीवसारख्या देशाला विमानाने आणि जहाजाने पाणीपुरवठा होतो.मात्र, महाराष्ट्रातील कोरड्या पडलेल्या गावांकडे बघायला केंद्र सरकारला वेळ मिळालेला नाही. दुष्काळग्रस्त भागाला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याच्या घोषणा केल्या जातात. परंतु, मुख्यमंत्र्यांनी त्यासंदर्भात रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून नियोजन केल्याचे दिसून येत नाही. दुष्काळाने होरपळून निघालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केंद्राने अद्याप भरीव मदत दिलेली नाही, असा आरोपही त्यांनी या वेळी केला. बैठकीला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, माणिकराव ठाकरे, आ. संजय दत्त आदी उपस्थित होते.