शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी रिंग रोडची योजना कागदावर येणार का?

By admin | Updated: December 17, 2014 03:19 IST

मुंबई-ठाणे शहर भुयारी मार्गाने जोडण्याचा मानस केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच मुंबईत बोलताना केला.

गौरीशंकर घाळे, मुंबईमुंबई-ठाणे शहर भुयारी मार्गाने जोडण्याचा मानस केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच मुंबईत बोलताना केला. ९० हजार कोटींच्या या योजनेच्या माध्यमातून मुंबईची वाहतूक समस्या सोडविण्याचा दावा त्यांनी केला. मात्र केंद्रीय मंत्री बनल्यानंतर घोषणांचा सपाटाच गडकरी यांनी लावल्याने भुयारी रिंग रोडची योजना किमान कागदावर तरी येणार का, अशी शंका निर्माण झाली आहे. हॉलंड भेटीवर असताना ही कल्पना सुचल्याचे सांगतानाच या प्रकल्पामुळे वाहतूक समस्या सोडविण्यासोबत मुंबईचे सौंदर्य अबाधित राहणार असल्याचे गडकरींनी सांगितले. या योजनेचा खर्च ९० हजार कोटींहून ६० हजार कोटींवर आणण्याचाही प्रयत्न आपल्या विभागाच्या वतीने करण्यात येत असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. माहीमच्या खाडीपासून सुरू होणारा हा भुयारी मार्ग वांदे्र-वरळी सागरीसेतू आणि पुढे नरिमन पॉइंटपर्यंत जाईल. तर दुसरा टप्पा शिवडी ते न्हावाशेवा असा असेल.सदर भुयारी मार्गासाठी निधीची अडचण नसल्याचे गडकरींनी सांगितले असले तरी हा निधी कसा उभारणार, याचे उत्तर मात्र त्यांनी दिले नाही. देशभरातील रस्त्यांसाठी दरवर्षी केवळ ३७ हजार कोटींचा निधी असताना मुंबईतील एका प्रकल्पावर ९० हजार कोटी कसा खर्चणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे. (प्रतिनिधी)