शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

भुयारी रिंग रोडची योजना कागदावर येणार का?

By admin | Updated: December 17, 2014 03:19 IST

मुंबई-ठाणे शहर भुयारी मार्गाने जोडण्याचा मानस केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच मुंबईत बोलताना केला.

गौरीशंकर घाळे, मुंबईमुंबई-ठाणे शहर भुयारी मार्गाने जोडण्याचा मानस केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच मुंबईत बोलताना केला. ९० हजार कोटींच्या या योजनेच्या माध्यमातून मुंबईची वाहतूक समस्या सोडविण्याचा दावा त्यांनी केला. मात्र केंद्रीय मंत्री बनल्यानंतर घोषणांचा सपाटाच गडकरी यांनी लावल्याने भुयारी रिंग रोडची योजना किमान कागदावर तरी येणार का, अशी शंका निर्माण झाली आहे. हॉलंड भेटीवर असताना ही कल्पना सुचल्याचे सांगतानाच या प्रकल्पामुळे वाहतूक समस्या सोडविण्यासोबत मुंबईचे सौंदर्य अबाधित राहणार असल्याचे गडकरींनी सांगितले. या योजनेचा खर्च ९० हजार कोटींहून ६० हजार कोटींवर आणण्याचाही प्रयत्न आपल्या विभागाच्या वतीने करण्यात येत असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. माहीमच्या खाडीपासून सुरू होणारा हा भुयारी मार्ग वांदे्र-वरळी सागरीसेतू आणि पुढे नरिमन पॉइंटपर्यंत जाईल. तर दुसरा टप्पा शिवडी ते न्हावाशेवा असा असेल.सदर भुयारी मार्गासाठी निधीची अडचण नसल्याचे गडकरींनी सांगितले असले तरी हा निधी कसा उभारणार, याचे उत्तर मात्र त्यांनी दिले नाही. देशभरातील रस्त्यांसाठी दरवर्षी केवळ ३७ हजार कोटींचा निधी असताना मुंबईतील एका प्रकल्पावर ९० हजार कोटी कसा खर्चणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे. (प्रतिनिधी)