शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मदतीच्या योजना एकत्र होतील का?

By admin | Updated: March 23, 2016 03:53 IST

बलात्कार, अ‍ॅसिड प्रकरणातील पीडितांना नुकसानभरपाई देण्यासाठी राज्य सरकारच्या अस्तित्वात असलेल्या मनोधैर्य योजना व पीडित नुकसानभरपाई योजना, या दोन्ही योजना एकत्र करणे शक्य आहे का?

मुंबई : बलात्कार, अ‍ॅसिड प्रकरणातील पीडितांना नुकसानभरपाई देण्यासाठी राज्य सरकारच्या अस्तित्वात असलेल्या मनोधैर्य योजना व पीडित नुकसानभरपाई योजना, या दोन्ही योजना एकत्र करणे शक्य आहे का? या दोन्ही योजना एकत्र करण्याबाबत विचार करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला दिली, तसेच गंभीर केसेसमधील पीडितांना योजनांच्या पूर्वलक्ष्यी प्रभावाने नुकसानभरपाई देता येणे शक्य आहे का? याचाही विचार करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सरकारला दिला.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बलात्कार व अ‍ॅसिड हल्ला पीडितांना आर्थिक मदत म्हणून सरकारने २१ आॅक्टोबर २०१४ मध्ये ‘मनोधैर्य योजना’ सुरू केली. त्यानंतर फौजदारी दंडसंहितेमध्ये केलेल्या सुधारणेनुसार २०१४ मध्ये ‘पीडित नुकसानभरपाई योजना’ सुरू करण्यात आली. मात्र, या योजना अंमलात येण्यापूर्वीच्या पीडितांना नुकसानभरपाई देण्यास सरकार नकार देत असल्याने, दोन पीडितांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. ए. एम. बदर यांच्या खंडपीठापुढे होती.‘सर्वोच्च न्यायालयाने १९९४ मध्येच अशा प्रकारच्या पीडितांसाठी नुकसानभरपाई देण्याची योजना अस्तित्वात आणण्याचे निर्देश सरकारला दिले होते. त्यानंतर, तब्बल २० वर्षांनी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले. त्यामुळे या दोघींनाही सरकारने नुकसानभरपाई द्यावी. सरकारने निदान केसचे गांभीर्य पाहून पीडितांना नुकसान भरपाई द्यावी,’ अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केली. त्यावर सरकारी वकील मनकुँवर देशमुख यांनी आक्षेप घेतला. ‘संबंधित योजना अस्तित्वात आल्यानंतरच नोंदवलेल्या गुन्ह्यांमधील पीडितेला नुकसानभरपाई देण्यात येईल. राज्य सरकारने या दोन्ही योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू केल्या, तर राज्याच्या तिजोरीला फटका बसेल. तेवढा निधी सरकारकडे उपलब्ध नाही. त्यामुळे या दोन्ही योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करणे अशक्य आहे,’ असा युक्तिवाद अ‍ॅड. मनकुँवर देशमुख यांनी केला. खंडपीठाने गंभीर प्रकरणात या योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करणे शक्य आहे का? याचा अभ्यास करण्याची सूचनाही सरकारला केली. याचिकेवरील सुनावणी १३ जून रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)