शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

निधी कमी पडू देणार नाही- सवरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 02:54 IST

कुपोषण निर्मूलनासाठी एकात्मिक बालविकास विभाग व आरोग्य विभागाला आदिवासी विभागाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही

विक्रमगड : पालघर जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी एकात्मिक बालविकास विभाग व आरोग्य विभागाला आदिवासी विभागाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी वाडा येथील भाजपा कार्यालयात विक्रमगडच्या पत्रकारांशी संवाद साधतांना दिली. तसेच कुपोषण निर्मूलन, सार्वजनिक आरोग्य व रोजगार यासाठी शासनाकडून विशेष योजना राबविण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. औद्योगिक कारखान्यांच्या डी झोनच्या सवलती कमी झाल्याने काही कारखाने स्थलांतर करण्याच्या मार्गावर आहेत. या पाशर््वभूमीवर ही कारखानदारी टिकविण्यासाठी उद्योगांना विदर्भ-मराठवाड्यातील उद्योगांना देण्यात आलेल्या विशेष पॅकेजच्या धर्तीवर पॅकेज देण्यासाठी व डी झोनमधील सवलती वाढविण्यासाठी आपण पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील रस्ते, पुल शासकिय इमारती व इतर योजनांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येत आहे. तसेच पालघर येथील जिल्हा मुख्यालयातील सर्व विभाग एका छताखाली आणण्यासाठी इमारतींचे काम लवकरच सुरू करणार असून पालघर येथे जिल्हा प्रशासनाचे २४ नवीन विभाग सुरू झाले असून उर्विरत विभागही लवकरच सुरू करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. आदिवासी विकास विभागाच्यावतीने आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश देवून दर्जेदार शिक्षण देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र पाचगणी सारख्या लांब अंतराच्या शाळांमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थी राहण्यासाठी नाखूष असल्याचे आढळले आहे. या विद्यार्थ्यांना जिल्ह्यातीलच नामांकित शाळांमध्ये शिक्षण घेता यावे यासाठी जिल्ह्यातील नामांकित शाळांनी आपले प्रस्ताव आदिवासी विभागाकडे द्यावेत, असे आवाहनही यावेळी बोलतांना विष्णू सवरा यांनी केले आहे.चाळीस किमी अंतरावर असलेल्या सर्व आश्रमशाळांकरीता मध्यवर्ती किचन करून ते ऐकाचवेळी सर्व ठिकाणी पुरविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच जातपडताळणीमधील लबाडी रोखण्यासाठी आता आॅनलाइन सेवा सुरु केल्याने खोटी प्रमाणपत्र घेता येणार नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. (वार्ताहर)>विक्रमगड-वाडा-भिवंडी पुलांची लवकरच उभारणीविक्र मगड व वाडा तालुक्यातील अंभई-केव या गावांना जोडणाऱ्या पुलासाठी सहा कोटी ५० लाख तर भिवंडी-वाडा तालुक्यातील उचाट-कुंदे या गावांना जोडणाराऱ्या पुलासाठी तीन कोटी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.