शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

राष्ट्रवादीसोबत जाणार नाही

By admin | Updated: September 27, 2014 04:46 IST

आम्ही कधीही राष्ट्रवादीसोबत नव्हतो, आताही नाही व पुढेही जाणार नाही, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले

नागपूर : आम्ही कधीही राष्ट्रवादीसोबत नव्हतो, आताही नाही व पुढेही जाणार नाही, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी युती असल्याच्या काँग्रेस व शिवसेनेकडून होत असलेल्या आरोपांवर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केलेले घोटाळे भाजपानेच बाहेर काढले, असे सांगत टीकाकारांना जनताच उत्तर देईल, असा टोला त्यांनी लगावला.फडणवीस यांच्यासह भाजपा उमेदवारांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी शिवसेनेवर थेट टीका करणे टाळले पण वेगवेगळी उदाहरणे देत युती तोडण्यासाठी शिवसेना कशी जबाबदार हे अप्रत्यक्षपणे सांगण्यासही ते विसरले नाहीत. फडणवीस म्हणाले, सिंचन घोटाळ्यासह राष्ट्रवादीचे इतर घोटाळे भाजपानेच उकरून काढले. विधानसभेत आम्ही संघर्ष केला. सभागृहाच्या कामकाजाचे जुने संदर्भ पाहिले तर मौन कुणी बाळगले होते, हे स्पष्ट होईल. काँग्रेसकडे आता आरोपांशिवाय काहिही राहिलेले नाही. भाजपाची राष्ट्रवादीशी कोणत्याही परिस्थितीत युती होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मनसेचे समर्थन घेण्यासही त्यांनी नकार दिला. केंद्रात ज्या पक्षाचे सरकार असते त्याच पक्षाचे सरकार राज्यात आले तर राज्याचे अधिक भले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून भाजपाला मतदान करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुसऱ्या पक्षातील बरेच नेते भाजपामध्ये येण्यास उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार पक्षाचे संसदीय मंडळ ठरवेल, असे सांगत त्यांनी यासंदर्भातील प्रश्नाला बगल दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राजकीय नसतो असे सांगत परिवर्तन घडले पाहिजे असे जेव्हा स्वयंसेवकांना वाटते तेव्हा ते बाहेर पडतात, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)