शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीसोबत जाणार नाही

By admin | Updated: September 27, 2014 04:46 IST

आम्ही कधीही राष्ट्रवादीसोबत नव्हतो, आताही नाही व पुढेही जाणार नाही, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले

नागपूर : आम्ही कधीही राष्ट्रवादीसोबत नव्हतो, आताही नाही व पुढेही जाणार नाही, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी युती असल्याच्या काँग्रेस व शिवसेनेकडून होत असलेल्या आरोपांवर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केलेले घोटाळे भाजपानेच बाहेर काढले, असे सांगत टीकाकारांना जनताच उत्तर देईल, असा टोला त्यांनी लगावला.फडणवीस यांच्यासह भाजपा उमेदवारांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी शिवसेनेवर थेट टीका करणे टाळले पण वेगवेगळी उदाहरणे देत युती तोडण्यासाठी शिवसेना कशी जबाबदार हे अप्रत्यक्षपणे सांगण्यासही ते विसरले नाहीत. फडणवीस म्हणाले, सिंचन घोटाळ्यासह राष्ट्रवादीचे इतर घोटाळे भाजपानेच उकरून काढले. विधानसभेत आम्ही संघर्ष केला. सभागृहाच्या कामकाजाचे जुने संदर्भ पाहिले तर मौन कुणी बाळगले होते, हे स्पष्ट होईल. काँग्रेसकडे आता आरोपांशिवाय काहिही राहिलेले नाही. भाजपाची राष्ट्रवादीशी कोणत्याही परिस्थितीत युती होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मनसेचे समर्थन घेण्यासही त्यांनी नकार दिला. केंद्रात ज्या पक्षाचे सरकार असते त्याच पक्षाचे सरकार राज्यात आले तर राज्याचे अधिक भले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून भाजपाला मतदान करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुसऱ्या पक्षातील बरेच नेते भाजपामध्ये येण्यास उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार पक्षाचे संसदीय मंडळ ठरवेल, असे सांगत त्यांनी यासंदर्भातील प्रश्नाला बगल दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राजकीय नसतो असे सांगत परिवर्तन घडले पाहिजे असे जेव्हा स्वयंसेवकांना वाटते तेव्हा ते बाहेर पडतात, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)