शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील काही सामने हलवणार?

By admin | Updated: April 13, 2016 02:16 IST

राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर किंग्स इलेव्हन पंजाबने नागपूरमधून आयपीएलचे तीन सामने मोहाली येथे हलवण्याची तयारी दर्शवल्यानंतर उच्च न्यायालयाने

मुंबई : राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर किंग्स इलेव्हन पंजाबने नागपूरमधून आयपीएलचे तीन सामने मोहाली येथे हलवण्याची तयारी दर्शवल्यानंतर उच्च न्यायालयाने पुण्यातील काही आयपीएल सामने अन्यत्र हलवता येतील का, अशी विचारणा बीसीआयकडे करत उत्तर देण्याचे निर्देश मंगळवारी दिले. बीसीसीआय मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ सहाय्यता निधीमध्ये काही निधी जमा करणार का, लाखो लिटर पाणी खेळपट्टीवर उधळाणारी बीसीसीआय तेवढेच पाणी दुष्काळग्रस्त गावांना पुरवणार का, अशी विचारणाही न्यायालयाने केली.राज्यात भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळ असताना सुमारे ६० लाख लिटर पाणी आयपीएलच्या सामन्यांदरम्यान खेळपट्टीच्या देखभालीसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे आयपीएलचे सामने महाराष्ट्राबाहेर खेळवण्यात यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका ‘लोकसत्ता मुव्हमेंट’ या एनजीओने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती. बीसीसीआयतर्फे ज्येष्ठ वकील रफीक दादा यांनी मुंबई, पुणे येथे होणाऱ्या १७ सामन्यांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरण्यात येईल, अशी माहिती उच्च न्यायालयाला दिली. ‘रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब’ म्हणजेच महालक्ष्मी रेसकोर्स आयपीएल सामान्यांसाठी दररोज सात ते आठ टँकर्स पाणी देईल. पुण्यातही अशाच प्रकारे पाणी देण्यात येईल. महालक्ष्मी रेसकोर्स प्रक्रिया करत असलेले सांडपाणी थेट समुद्रातच सोडते, त्याऐवजी हे पाणी आयपीएलसाठी देण्यात येईल,’ अशी माहिती अ‍ॅड. रफीक दादा यांनी उच्च न्यायालयाला दिली. राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रात महसूल बुडत असल्याचे म्हटले आहे. ‘राज्यात अशी स्थिती असतानाही सरकारला महसूलाचे पडले आहे. लोकांना त्रास होऊ दे,’ अशी चपराक उच्च न्यायालयाने सरकारला हाणली. (प्रतिनिधी)शरद पवारांना टोलामाजी कृषिमंत्री शरद पवार यांनी मध्यस्थी करून महालक्ष्मी रेसकोर्सला मुंबई व पुण्यामधील आयपीएल सामन्यांसाठी पाणी देण्याची सूचना केली. त्याची दखल घेत ‘संबंधित मंत्री माजी कृषिमंत्री होते आणि ते क्रिकेटसाठीही काम करत आहेत. ते जर खेळपट्यांसाठी पाणी मिळवून देऊ शकतात, तर ते काहीही करू शकतात,’ असा टोला खंडपीठाने लगावला.- मुंबई पालिकेच्या हद्दीतील विहिरींचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याची माहिती पालिकेने मंगळवारच्या सुनावणीत उच्च न्यायालयाला दिली.