शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
3
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
4
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
5
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
6
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
7
Gold Silver Price 10 September: मोठ्या तेजीनंतर सोन्या-चांदीचे दर आज घसरले; पाहा १४ ते २४ कॅरेटसाठी आता किती खर्च करावा लागणार
8
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
9
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
10
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
11
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
12
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
13
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
14
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
15
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
16
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
17
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
18
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
19
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
20
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?

मेहबूबा मुफ्ती ' भारतमाता की जय' म्हणतील का? - उद्धव ठाकरे

By admin | Updated: March 28, 2016 09:12 IST

काश्मीरमधील भाजपा-पीडीपीच्या युतीच्या मुद्यावरून भाष्य करत जम्मू-काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती ‘भारतमाता की जय’ म्हणतील का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - 'भारतमाता की जय’वरून देशात सुरू असलेला वाद अद्याप शमलेला नसतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काश्मीरमधील भाजपा-पीडीपीच्या युतीच्या मुद्यावर भाष्य करत 'सध्या राष्ट्रवादावर चर्चा झडत असताना जम्मू-काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती ‘भारतमाता की जय’ म्हणतील काय'? असा सवाल करत उद्धव यांनी बाजपाच्या राष्ट्रप्रेमाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.  देशविरोधी मुक्ताफळे उधळणा-या, कश्मीरात हिंदुस्थानविरुद्ध घोषणा देणार्‍यांना सहानुभूती दाखवणा-या मेहबूबा मुफ्ती यांची आता संसदेवर हल्ला करणार्‍या अफझल गुरूच्या बाबतीत काय भूमिका आहे? असा थेट सवालही त्यांनी अग्रलेखातून विचारला आहे.
भाजपने मेहबुबा यांच्याबरोबर नवा डाव मांडला, पण लाखो कश्मिरी पंडितांच्या जीवनाचा डाव अतिरेक्यांनी उधळून लावला आहे. आता काश्मीरात पीडीपी-भाजप सरकारचा नवा पाळणा एकदाचा हलला आहे असून निदान आता तरी कश्मीर खोर्‍यात शांतता नांदो व देशावरचे ओझे कमी होवो! अशी अपेक्षा उद्धव यांनी अग्रलेखात व्यक्त केली आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात ?
- तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जम्मू-कश्मीर राज्यात सरकारचा पाळणा पुन्हा एकदा हलला आहे. मेहबुबा मुफ्ती जम्मू-कश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील व भाजपचे वर्‍हाडी या सोहळ्यात त्यांच्यावर अक्षता, फुलांचा वर्षाव करतील. मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मृत्यूनंतर जम्मू-कश्मीरात अधांतरी राजकीय परिस्थिती निर्माण झाली. पीडीपीच्या नेत्या मेहबुबा यांनी भाजपशी नव्याने घरोबा करण्यास नकार दिला व पुढचे तीन महिने कश्मीर खोर्‍यात भाजपला कान धरून उठाबशा काढायलाच काय ते बाकी ठेवले. अत्यंत महत्त्वाचे असे की, मेहबुबा मुफ्ती यांच्याशी भारतीय जनता पक्षाचे कधीच पटले नाही. मेहबुबाबाईंची देशविरोधी मुफ्ताफळे, त्यांचे फुटीरतावाद्यांशी असलेले संबंध हा नेहमीच वादाचा विषय राहिला. कश्मीरात हिंदुस्थानविरुद्ध घोषणा देणार्‍यांना या बाईसाहेबांची सहानुभूती राहिली व हे सर्व उघड उघड होत राहिले. त्यामुळे मेहबुबा मुफ्ती भाजपच्या पाठिंब्याने कश्मीरच्या मुख्यमंत्री होत आहेत याचे कौतुक भाजपला असले तरी देशाला मात्र चिंता आणि चिंताच वाटत आहे. 
- मेहबुबा मुफ्ती या कश्मीरच्या मुख्यमंत्री होणार हे नक्की होताच काही प्रश्‍नांना तोंड फुटले आहे. सध्या देशात राष्ट्रवादावर चर्चा झडत आहेत. त्यामुळे मेहबुबा मुफ्ती ‘भारतमाता की जय’ म्हणतील काय? असा प्रश्‍न विचारला गेला आहे. हा प्रश्‍न आमच्या मनात असला तरी दिल्लीतील ‘आप’चे नेते व ओमर अब्दुल्लासारख्या मंडळींनी हा प्रश्‍न विचारून भाजपला अस्वस्थ केले आहे. हैदराबादचा ओवेसी निर्ढावलेपणाने सांगतोय की, ‘भारतमाता की जय म्हणणार नाही.’ तेव्हा ‘भारतमाता की जय’ म्हणणे ही देशभक्ती व राष्ट्रवाद असल्याची भूमिका भाजप नेत्यांनी मांडली, पण हिंदुस्थानातील एक राज्य असलेल्या ‘जम्मू-कश्मीर’च्या मुख्यमंत्री ‘भारतमाता की जय’ म्हणतील काय? हा प्रश्‍न आहेच. संसदेवर हल्ला करणार्‍या अफझल गुरूच्या बाबतीत मेहबुबाबाईंची आता काय भूमिका आहे? कारण अफझल गुरूस अतिरेकी, दहशतवादी मानण्यास मेहबुबा व त्यांचा पीडीपी पक्ष तयार नाही. अफझल गुरूचे मृत शरीर तिहारातून उकरून कश्मीरात आणावे व एखाद्या वीर योद्ध्यासारखे त्याचे दफन करावे असे मेहबुबा मुफ्ती यांच्या आजही मनात आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच हा भयंकर विचार झटकून टाकून त्या
नव्या राष्ट्रवादी विचारांची कास धरतील काय? 
- कश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे. कश्मीरचा एक तुकडा पाकड्यांनी गिळला आहे व ही सल हिंदुस्थानला छळते आहे. पाकिस्तानने कश्मीर रक्तबंबाळ केला आहे व कश्मीरच्या निमित्ताने संपूर्ण हिंदुस्थानवरच घाव घातले जात आहेत. कश्मीरची फार मोठी किंमत आपण चुकवीत आहोत. कश्मीरात शांतता नांदावी व कश्मीरातील निर्वासित कश्मिरी पंडितांनी पुन्हा स्वगृही परतावे असे आम्हाला वाटते. भाजपने मेहबुबा यांच्याबरोबर नवा डाव मांडला, पण लाखो कश्मिरी पंडितांच्या जीवनाचा डाव अतिरेक्यांनी उधळून लावला आहे. हा डाव नव्या राज्यव्यवस्थेने पुन्हा बसवायला हवा. ‘भारतमाता की जय’ म्हणणार्‍या कश्मिरी पंडितांनी बलिदान दिले. त्यांनी सांडलेल्या रक्ताच्या सड्यावर नवे राजशकट उभे राहत आहे म्हणून नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथविधीआधी ‘भारतमाता की जय’ म्हणावे अशी अपेक्षा देशाने ठेवलीच तर वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. कश्मीरात पीडीपी-भाजप सरकारचा नवा पाळणा एकदाचा हलला आहे. निदान आता तरी कश्मीर खोर्‍यात शांतता नांदो व देशावरचे ओझे कमी होवो!