शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

मेहबूबा मुफ्ती ' भारतमाता की जय' म्हणतील का? - उद्धव ठाकरे

By admin | Updated: March 28, 2016 09:12 IST

काश्मीरमधील भाजपा-पीडीपीच्या युतीच्या मुद्यावरून भाष्य करत जम्मू-काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती ‘भारतमाता की जय’ म्हणतील का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - 'भारतमाता की जय’वरून देशात सुरू असलेला वाद अद्याप शमलेला नसतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काश्मीरमधील भाजपा-पीडीपीच्या युतीच्या मुद्यावर भाष्य करत 'सध्या राष्ट्रवादावर चर्चा झडत असताना जम्मू-काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती ‘भारतमाता की जय’ म्हणतील काय'? असा सवाल करत उद्धव यांनी बाजपाच्या राष्ट्रप्रेमाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.  देशविरोधी मुक्ताफळे उधळणा-या, कश्मीरात हिंदुस्थानविरुद्ध घोषणा देणार्‍यांना सहानुभूती दाखवणा-या मेहबूबा मुफ्ती यांची आता संसदेवर हल्ला करणार्‍या अफझल गुरूच्या बाबतीत काय भूमिका आहे? असा थेट सवालही त्यांनी अग्रलेखातून विचारला आहे.
भाजपने मेहबुबा यांच्याबरोबर नवा डाव मांडला, पण लाखो कश्मिरी पंडितांच्या जीवनाचा डाव अतिरेक्यांनी उधळून लावला आहे. आता काश्मीरात पीडीपी-भाजप सरकारचा नवा पाळणा एकदाचा हलला आहे असून निदान आता तरी कश्मीर खोर्‍यात शांतता नांदो व देशावरचे ओझे कमी होवो! अशी अपेक्षा उद्धव यांनी अग्रलेखात व्यक्त केली आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात ?
- तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जम्मू-कश्मीर राज्यात सरकारचा पाळणा पुन्हा एकदा हलला आहे. मेहबुबा मुफ्ती जम्मू-कश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील व भाजपचे वर्‍हाडी या सोहळ्यात त्यांच्यावर अक्षता, फुलांचा वर्षाव करतील. मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मृत्यूनंतर जम्मू-कश्मीरात अधांतरी राजकीय परिस्थिती निर्माण झाली. पीडीपीच्या नेत्या मेहबुबा यांनी भाजपशी नव्याने घरोबा करण्यास नकार दिला व पुढचे तीन महिने कश्मीर खोर्‍यात भाजपला कान धरून उठाबशा काढायलाच काय ते बाकी ठेवले. अत्यंत महत्त्वाचे असे की, मेहबुबा मुफ्ती यांच्याशी भारतीय जनता पक्षाचे कधीच पटले नाही. मेहबुबाबाईंची देशविरोधी मुफ्ताफळे, त्यांचे फुटीरतावाद्यांशी असलेले संबंध हा नेहमीच वादाचा विषय राहिला. कश्मीरात हिंदुस्थानविरुद्ध घोषणा देणार्‍यांना या बाईसाहेबांची सहानुभूती राहिली व हे सर्व उघड उघड होत राहिले. त्यामुळे मेहबुबा मुफ्ती भाजपच्या पाठिंब्याने कश्मीरच्या मुख्यमंत्री होत आहेत याचे कौतुक भाजपला असले तरी देशाला मात्र चिंता आणि चिंताच वाटत आहे. 
- मेहबुबा मुफ्ती या कश्मीरच्या मुख्यमंत्री होणार हे नक्की होताच काही प्रश्‍नांना तोंड फुटले आहे. सध्या देशात राष्ट्रवादावर चर्चा झडत आहेत. त्यामुळे मेहबुबा मुफ्ती ‘भारतमाता की जय’ म्हणतील काय? असा प्रश्‍न विचारला गेला आहे. हा प्रश्‍न आमच्या मनात असला तरी दिल्लीतील ‘आप’चे नेते व ओमर अब्दुल्लासारख्या मंडळींनी हा प्रश्‍न विचारून भाजपला अस्वस्थ केले आहे. हैदराबादचा ओवेसी निर्ढावलेपणाने सांगतोय की, ‘भारतमाता की जय म्हणणार नाही.’ तेव्हा ‘भारतमाता की जय’ म्हणणे ही देशभक्ती व राष्ट्रवाद असल्याची भूमिका भाजप नेत्यांनी मांडली, पण हिंदुस्थानातील एक राज्य असलेल्या ‘जम्मू-कश्मीर’च्या मुख्यमंत्री ‘भारतमाता की जय’ म्हणतील काय? हा प्रश्‍न आहेच. संसदेवर हल्ला करणार्‍या अफझल गुरूच्या बाबतीत मेहबुबाबाईंची आता काय भूमिका आहे? कारण अफझल गुरूस अतिरेकी, दहशतवादी मानण्यास मेहबुबा व त्यांचा पीडीपी पक्ष तयार नाही. अफझल गुरूचे मृत शरीर तिहारातून उकरून कश्मीरात आणावे व एखाद्या वीर योद्ध्यासारखे त्याचे दफन करावे असे मेहबुबा मुफ्ती यांच्या आजही मनात आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच हा भयंकर विचार झटकून टाकून त्या
नव्या राष्ट्रवादी विचारांची कास धरतील काय? 
- कश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे. कश्मीरचा एक तुकडा पाकड्यांनी गिळला आहे व ही सल हिंदुस्थानला छळते आहे. पाकिस्तानने कश्मीर रक्तबंबाळ केला आहे व कश्मीरच्या निमित्ताने संपूर्ण हिंदुस्थानवरच घाव घातले जात आहेत. कश्मीरची फार मोठी किंमत आपण चुकवीत आहोत. कश्मीरात शांतता नांदावी व कश्मीरातील निर्वासित कश्मिरी पंडितांनी पुन्हा स्वगृही परतावे असे आम्हाला वाटते. भाजपने मेहबुबा यांच्याबरोबर नवा डाव मांडला, पण लाखो कश्मिरी पंडितांच्या जीवनाचा डाव अतिरेक्यांनी उधळून लावला आहे. हा डाव नव्या राज्यव्यवस्थेने पुन्हा बसवायला हवा. ‘भारतमाता की जय’ म्हणणार्‍या कश्मिरी पंडितांनी बलिदान दिले. त्यांनी सांडलेल्या रक्ताच्या सड्यावर नवे राजशकट उभे राहत आहे म्हणून नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथविधीआधी ‘भारतमाता की जय’ म्हणावे अशी अपेक्षा देशाने ठेवलीच तर वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. कश्मीरात पीडीपी-भाजप सरकारचा नवा पाळणा एकदाचा हलला आहे. निदान आता तरी कश्मीर खोर्‍यात शांतता नांदो व देशावरचे ओझे कमी होवो!