शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अखंड महाराष्ट्राची शपथ घेतील का?

By admin | Updated: February 6, 2017 03:12 IST

मुंबईचे आणि शिवसेनेचे रक्ताचे नाते आहे. रक्त देऊन मुंबई मिळवली आणि रक्तदान करून मुंबई वाचवतो आहोत. होर्डिंग लाऊन मुंबईकर असल्याचे शिवसेनेला सांगावे लागत नाही

मुंबई : मुंबईचे आणि शिवसेनेचे रक्ताचे नाते आहे. रक्त देऊन मुंबई मिळवली आणि रक्तदान करून मुंबई वाचवतो आहोत. होर्डिंग लाऊन मुंबईकर असल्याचे शिवसेनेला सांगावे लागत नाही. हुतात्मा चौकात जाऊन प्रचाराला सुरुवात करणारे भाजपावाले अखंड महाराष्ट्राची शपथ घेतील का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभेदरम्यान केला.संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मारकाला अभिवादन करत भाजपाने मुंबईतील प्रचाराची सुरुवात केली. या वेळी भाजपा उमेदवारांनी पारदर्शक कारभाराची शपथही घेतली. यावर उद्धव ठाकरे यांनी थेट हल्ला चढविला. शिवसेनेने मुंबई महाराष्ट्रात ठेवण्याची शपथ घेतलीच आहे. तशीच अखंड महाराष्ट्राचीही घेतली आहे. पण, जे आज हुतात्मा चौकात गेले ते अखंड महाराष्ट्राची शपथ घेतील का, असा थेट सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. या वेळी भाजपाच्या पारदर्शक कारभाराच्या दाव्यावरही त्यांनी हल्लाबोल केला.तब्बल २५ वर्षे मुंबई महापालिकेत एकत्र नांदलेल्या भाजपाशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने विशेषत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खास ठाकरी शैलीत भाजपाचा समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. गिरगाव येथील शनिवारच्या सभेनंतर रविवारी भांडुप येथे झालेल्या सभेत उद्धव यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधत ‘मुंबई आणि शिवसेनेचे रक्ताचे नाते’ असल्याचे म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘महाराष्ट्राचा एक इंच तुकडादेखील तुटू देणार नाही,’ असा इशारा उद्धव यांनी नाव न घेता भाजपाला दिल्याने आता भाजपा याला काय प्रत्युत्तर देणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.भांडुप येथील जाहीर सभेतील विशाल समुदायाला संबोधताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर तोफ डागली. उद्धव म्हणाले, मुंबईचे आणि शिवसेनेचे जे नाते आहे ते कुठलाही पक्ष स्थापन करू शकलेला नाही. महत्त्वाचे म्हणजे काही जणांना सांगावे लागतं की आम्ही मुंबईकर आहोत, असे म्हणत उद्धव यांनी उपऱ्यांना लक्ष्य केले. मुंबईत पारदर्शक कारभार असून, हे केंद्राला दिसले आहे. परिणामी, मुंबई महापालिकेप्रमाणे राज्य सरकारमध्येही पारदर्शकता हवी आहे. मुंबई आणि शिवसेनेचे रक्ताचे नाते असून, महाराष्ट्राचा एक इंच तुकडादेखील तुटू देणार नाही. संयुक्त महाराष्ट्र अखंड ठेवू, तोडू देणार नाही. शपथ घ्यायची आहे तर अखंड महाराष्ट्राची घ्या, असेही उद्धव यांनी या वेळी ठणकावले.‘धनुष्यबाण’ हाच शिवसेनेचा उमेदवार असून, ज्या ज्या वेळी संकटे येतात, त्या त्या वेळी माझे शिवसैनिक धावून जातात, असे म्हणत उद्धव यांनी तुम्ही मला वज्रमूठ द्या, दात पाडायचे काम मी करतो, असे आवाहनही शिवसैनिकांना केले. साडेतीन वर्षांत मनपाने धरण बांधले. त्याच्या परवानगीसाठी १० वर्षे लागली. गेल्या पावसाळ्यात दिल्ली, अहमदाबाद शहरे तुंबली, पण मुंबईत पाणी तुंबले नाही, असे म्हणत उद्धव यांनी कोस्टल रोडसाठी केंद्राकडून मंजुरी कधी येणार, स्वत:च्या बुडाखाली काय दडवून ठेवलं ते दाखवा, असा सवालही उद्धव यांनी या वेळी केला.