शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

अखंड महाराष्ट्राची शपथ घेतील का?

By admin | Updated: February 6, 2017 03:12 IST

मुंबईचे आणि शिवसेनेचे रक्ताचे नाते आहे. रक्त देऊन मुंबई मिळवली आणि रक्तदान करून मुंबई वाचवतो आहोत. होर्डिंग लाऊन मुंबईकर असल्याचे शिवसेनेला सांगावे लागत नाही

मुंबई : मुंबईचे आणि शिवसेनेचे रक्ताचे नाते आहे. रक्त देऊन मुंबई मिळवली आणि रक्तदान करून मुंबई वाचवतो आहोत. होर्डिंग लाऊन मुंबईकर असल्याचे शिवसेनेला सांगावे लागत नाही. हुतात्मा चौकात जाऊन प्रचाराला सुरुवात करणारे भाजपावाले अखंड महाराष्ट्राची शपथ घेतील का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभेदरम्यान केला.संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मारकाला अभिवादन करत भाजपाने मुंबईतील प्रचाराची सुरुवात केली. या वेळी भाजपा उमेदवारांनी पारदर्शक कारभाराची शपथही घेतली. यावर उद्धव ठाकरे यांनी थेट हल्ला चढविला. शिवसेनेने मुंबई महाराष्ट्रात ठेवण्याची शपथ घेतलीच आहे. तशीच अखंड महाराष्ट्राचीही घेतली आहे. पण, जे आज हुतात्मा चौकात गेले ते अखंड महाराष्ट्राची शपथ घेतील का, असा थेट सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. या वेळी भाजपाच्या पारदर्शक कारभाराच्या दाव्यावरही त्यांनी हल्लाबोल केला.तब्बल २५ वर्षे मुंबई महापालिकेत एकत्र नांदलेल्या भाजपाशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने विशेषत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खास ठाकरी शैलीत भाजपाचा समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. गिरगाव येथील शनिवारच्या सभेनंतर रविवारी भांडुप येथे झालेल्या सभेत उद्धव यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधत ‘मुंबई आणि शिवसेनेचे रक्ताचे नाते’ असल्याचे म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘महाराष्ट्राचा एक इंच तुकडादेखील तुटू देणार नाही,’ असा इशारा उद्धव यांनी नाव न घेता भाजपाला दिल्याने आता भाजपा याला काय प्रत्युत्तर देणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.भांडुप येथील जाहीर सभेतील विशाल समुदायाला संबोधताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर तोफ डागली. उद्धव म्हणाले, मुंबईचे आणि शिवसेनेचे जे नाते आहे ते कुठलाही पक्ष स्थापन करू शकलेला नाही. महत्त्वाचे म्हणजे काही जणांना सांगावे लागतं की आम्ही मुंबईकर आहोत, असे म्हणत उद्धव यांनी उपऱ्यांना लक्ष्य केले. मुंबईत पारदर्शक कारभार असून, हे केंद्राला दिसले आहे. परिणामी, मुंबई महापालिकेप्रमाणे राज्य सरकारमध्येही पारदर्शकता हवी आहे. मुंबई आणि शिवसेनेचे रक्ताचे नाते असून, महाराष्ट्राचा एक इंच तुकडादेखील तुटू देणार नाही. संयुक्त महाराष्ट्र अखंड ठेवू, तोडू देणार नाही. शपथ घ्यायची आहे तर अखंड महाराष्ट्राची घ्या, असेही उद्धव यांनी या वेळी ठणकावले.‘धनुष्यबाण’ हाच शिवसेनेचा उमेदवार असून, ज्या ज्या वेळी संकटे येतात, त्या त्या वेळी माझे शिवसैनिक धावून जातात, असे म्हणत उद्धव यांनी तुम्ही मला वज्रमूठ द्या, दात पाडायचे काम मी करतो, असे आवाहनही शिवसैनिकांना केले. साडेतीन वर्षांत मनपाने धरण बांधले. त्याच्या परवानगीसाठी १० वर्षे लागली. गेल्या पावसाळ्यात दिल्ली, अहमदाबाद शहरे तुंबली, पण मुंबईत पाणी तुंबले नाही, असे म्हणत उद्धव यांनी कोस्टल रोडसाठी केंद्राकडून मंजुरी कधी येणार, स्वत:च्या बुडाखाली काय दडवून ठेवलं ते दाखवा, असा सवालही उद्धव यांनी या वेळी केला.