शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

अखंड महाराष्ट्राची शपथ घेतील का?

By admin | Updated: February 6, 2017 03:12 IST

मुंबईचे आणि शिवसेनेचे रक्ताचे नाते आहे. रक्त देऊन मुंबई मिळवली आणि रक्तदान करून मुंबई वाचवतो आहोत. होर्डिंग लाऊन मुंबईकर असल्याचे शिवसेनेला सांगावे लागत नाही

मुंबई : मुंबईचे आणि शिवसेनेचे रक्ताचे नाते आहे. रक्त देऊन मुंबई मिळवली आणि रक्तदान करून मुंबई वाचवतो आहोत. होर्डिंग लाऊन मुंबईकर असल्याचे शिवसेनेला सांगावे लागत नाही. हुतात्मा चौकात जाऊन प्रचाराला सुरुवात करणारे भाजपावाले अखंड महाराष्ट्राची शपथ घेतील का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभेदरम्यान केला.संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मारकाला अभिवादन करत भाजपाने मुंबईतील प्रचाराची सुरुवात केली. या वेळी भाजपा उमेदवारांनी पारदर्शक कारभाराची शपथही घेतली. यावर उद्धव ठाकरे यांनी थेट हल्ला चढविला. शिवसेनेने मुंबई महाराष्ट्रात ठेवण्याची शपथ घेतलीच आहे. तशीच अखंड महाराष्ट्राचीही घेतली आहे. पण, जे आज हुतात्मा चौकात गेले ते अखंड महाराष्ट्राची शपथ घेतील का, असा थेट सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. या वेळी भाजपाच्या पारदर्शक कारभाराच्या दाव्यावरही त्यांनी हल्लाबोल केला.तब्बल २५ वर्षे मुंबई महापालिकेत एकत्र नांदलेल्या भाजपाशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने विशेषत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खास ठाकरी शैलीत भाजपाचा समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. गिरगाव येथील शनिवारच्या सभेनंतर रविवारी भांडुप येथे झालेल्या सभेत उद्धव यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधत ‘मुंबई आणि शिवसेनेचे रक्ताचे नाते’ असल्याचे म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘महाराष्ट्राचा एक इंच तुकडादेखील तुटू देणार नाही,’ असा इशारा उद्धव यांनी नाव न घेता भाजपाला दिल्याने आता भाजपा याला काय प्रत्युत्तर देणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.भांडुप येथील जाहीर सभेतील विशाल समुदायाला संबोधताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर तोफ डागली. उद्धव म्हणाले, मुंबईचे आणि शिवसेनेचे जे नाते आहे ते कुठलाही पक्ष स्थापन करू शकलेला नाही. महत्त्वाचे म्हणजे काही जणांना सांगावे लागतं की आम्ही मुंबईकर आहोत, असे म्हणत उद्धव यांनी उपऱ्यांना लक्ष्य केले. मुंबईत पारदर्शक कारभार असून, हे केंद्राला दिसले आहे. परिणामी, मुंबई महापालिकेप्रमाणे राज्य सरकारमध्येही पारदर्शकता हवी आहे. मुंबई आणि शिवसेनेचे रक्ताचे नाते असून, महाराष्ट्राचा एक इंच तुकडादेखील तुटू देणार नाही. संयुक्त महाराष्ट्र अखंड ठेवू, तोडू देणार नाही. शपथ घ्यायची आहे तर अखंड महाराष्ट्राची घ्या, असेही उद्धव यांनी या वेळी ठणकावले.‘धनुष्यबाण’ हाच शिवसेनेचा उमेदवार असून, ज्या ज्या वेळी संकटे येतात, त्या त्या वेळी माझे शिवसैनिक धावून जातात, असे म्हणत उद्धव यांनी तुम्ही मला वज्रमूठ द्या, दात पाडायचे काम मी करतो, असे आवाहनही शिवसैनिकांना केले. साडेतीन वर्षांत मनपाने धरण बांधले. त्याच्या परवानगीसाठी १० वर्षे लागली. गेल्या पावसाळ्यात दिल्ली, अहमदाबाद शहरे तुंबली, पण मुंबईत पाणी तुंबले नाही, असे म्हणत उद्धव यांनी कोस्टल रोडसाठी केंद्राकडून मंजुरी कधी येणार, स्वत:च्या बुडाखाली काय दडवून ठेवलं ते दाखवा, असा सवालही उद्धव यांनी या वेळी केला.