शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

मद्यपींचे परवाने होणार रद्द?

By admin | Updated: June 9, 2016 04:16 IST

आपण जर पकडले गेलात तर आपला वाहन परवाना रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पंकज रोडेकर,

ठाणे- सावधान... दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांनो, सावधान... आपण जर पकडले गेलात तर आपला वाहन परवाना रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर आपले नावही ठाणे शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होऊ शकते. त्यामुळे दाऊ पिऊन वाहन चालवायचे की नाही, हे आपणच आपले ठरवायचे आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी मद्यपींना धडा शिकवण्याचा हा अनोखा उपाय ठाणे शहर पोलिसांनी अवलंबल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरवर्षी नव्या वर्षाची सुरूवात अपघातविरहीत व्हावी, यासाठी वाहतुक शाखेने मद्यपी वाहन चालकांविरोधात मोहिम हाती घेत, कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली. मात्र ही मोहीम या वर्षात तितक्याच तीव्रतेने अजूनही सुरूच आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे शहर, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ-बदलापूर, उल्हासनगर या परिसरात मद्यपी चालकांविरोधात वाहतुक शाखेने साडेपाच हजार गुन्हे नोंदवले आहेत. तसेच त्यातील प्रत्येकाकडून दोन हजार रूपयांप्रमाणे दंड आकारला आहे. मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात वाहतूक शाखेने तीन हजार ३०० मद्यपींना पकडले आहे. तसेच ३०१ ते ५०० मिली ग्रॅमपेक्षा अधिक म्हणजे ओव्हर रेंज झालेले मद्यपी कारवाईत सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली.>दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांत दुचाकीस्वार जास्तमद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वारांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यापाठोपाठ चार चाकी आणि तीन चाकी वाहनचालकांचा नंबर लागतो. या पकडलेल्या वाहन चालकांमध्ये २६ ते ३५ या वयोगटातील तरुणांचा सर्वाधिक आहे.त्याचबरोबर ३६ ते ५० तसेच १८ ते २५ अशी या वयोगटातील मद्यपींची संख्या त्यापाठोपाठ आहे. विशेष म्हणजे पकडण्यात आलेल्या चालकांमध्ये सर्वाधिक १०१ ते ३०० मिली ग्रॅमइतके अल्कोहलचे प्रमाण सापडले. त्यापाठोपाठ मद्यपींमध्ये १०० मिली ग्रॅमपर्यंत अल्कोहलचे प्रमाण आढळून आले.