शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

महासभेतच देणार राजीनामा?

By admin | Updated: October 19, 2016 04:16 IST

सत्ताधारी पक्षातील खदखदही बाहेर पडू लागल्याने एका नगरसेवकाने थेट महासभेतच राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे.

मुरलीधर भवार,

कल्याण- ४२० कोटींच्या रस्ते विकासावरून शिवसेना-भाजपामध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा पुढचा टप्पा गुरूवारच्या महासभेत पार पडणार असतानाच सत्ताधारी पक्षातील खदखदही बाहेर पडू लागल्याने एका नगरसेवकाने थेट महासभेतच राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेना आणि भाजपाची परस्परांवरील नाराजी कायम असल्याने ही सभा वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी राजीनाम्याच्या तयारीत आहेत. गेल्या ११ महिन्यात एकही विकास काम मंजूर झालेले नाही. नागरिक जाब विचारतात. त्याला उत्तर देता येत नाही. नगरसेवक निधीही मिळालेला नाही. रेन वॉटर हार्वेस्ंिटगसाठी १० लाखाचा निधी प्रत्येक नगरसेवकाला देण्यात येणार होता. तोही वितरित झालेला नाही, याकडे शेट्टी यांनी लक्ष वेधले. पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी २२८ विकासकामांच्या नस्तीवर स्वाक्षरी केलेली नाही. सत्तेत असूनही कामे होत नसल्याच्या प्रकाराला आयुक्त व महापौर जबाबदार असल्याने मी महासभेत नगरसेवकपद सोडणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. सत्ताधारी भाजपचे गटनेते राहूल दामले यांनीही महापौरांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले, मे महिन्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. तेव्हा रेन वॉटर हार्वेस्ंिटगच्या कामाचा पाठपुरावा केला. नव्या इमारतींना त्याची सक्ती आहे. मात्र जुन्या इमारतींसाठी दहा लाखाचा निधी देण्यास आयुक्तांनी मान्यता दिली. पण गेल्या तीन महासभेत महापौर हा विषय पटलावर घेत नाहीत. त्याला जाणीवपूर्वक बगल दिली जाते. येत्या महासभेतही हा विषय घेतलेला नाही. त्यामुळे भाजपातर्फे महापौरांचा निषेध केला जाणार आहे. >विषयपत्रिकेवरून वाद४२० कोटीच्या विकासकामांना राज्य सरकारने स्थगिती देत अहवाल मागवला आहे. या स्थगितीमुळे महापौरांनी मलंग रोड ते मानपाडा हा ८९ कोटींचा रस्ता, १५ कोटींचा २७ गावातील २१ रस्त्यांचा विकास आणि १४९ कोटींची २७ गावातील नऊ रस्त्यांची विकासकामे स्थगित ठेवली. या स्थगित विषयांसाठी नव्याने सभा न लावता सचिव सुभाष भुजबळ यांनी नव्या सभेच्या विषयपत्रिकेत स्थगित सभेचे विषय घुसडल्याने सदस्यांनी ओरड केली. आयुक्तांनी भुजबळ यांना जाब विचारला. कारणे दाखवा नोटीस बजावली. भुजबळांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे अमान्य केले. कोणतीही कारवाई झाल्याचा इन्कार केला. मात्र स्वत:ची चूक सुधारत वर्तमानपत्रात दोन महासभांची विषयपत्रिका प्रसिद्ध केली. गुरूवारी सकाळी ११ वाजता स्थगित सभा व दुपारी ३ वाजता नवी सभा लावली आहे.सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी या कृतीला आक्षेप घेत ४२० कोटींचे विषय पुन्हा पत्रिकेत का घेतले नाही, असा जाब विचारला. २७ गावांवर खर्च कशाला?आम्ही २७ गावांच्या विकासाच्या विरोधात नाही. पण ती गावे पालिकेतून वेगळी व्हावीत, यासाठी जर संघर्ष समितीचा लढा सुरू असेल आणि २६ आॅक्टोबरला लाक्षणिक उपोषण होणार असेल, तर त्यांना विकास नको असताना त्यांच्यावर निधी कशाला खर्च केला जातो आहे, असा प्रश्न प्रकाश पेणकर यांनी विचारला. भाजपावर आक्षेपपालिकेच्या ऐपतीचा प्रश्न असेल तर राज्य सरकारच्या शिरावर हजारो कोटींचे कर्ज असताना ते कशाच्या जोरावर पॅकेज जाहीर करते, असा सवाल करून विश्वनाथ राणे यांनी ४२० कोटीच्या प्रस्तावांना ब्रेक लावण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कृतीला व त्यासाठी त्यांना माहिती देणाऱ्या भाजपा नेत्यांच्या प्रयत्नांना आक्षेप घेतला आहे. सरकार आयुक्तांचे हातपाय बांधून विकास करा , असे सांगत असेल तर ते शक्य नसल्याचे म्हणणे त्यांनी मांडले. सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनीही तिच भूमिका उचलून धरली. आधी एलबीटी रद्द झाल्याने पालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. हा आयुक्तांना अडचणीत आणण्याचा प्रकार असल्याचे म्हणणे त्यांनी मांडले. >युतीतील गटबाजीचा फटका : कॉंग्रेस पक्षाचे गटनेने नंदू म्हात्रे यांनी सांगितले, विकासकामांना राज्य सरकारने स्थगिती देणे गैर असले तरी हा शिवसेना-भाजपातील गटबाजीचा फटका आहे. सत्ताधारी शिवसेना व भाजपात एकवाक्यता नाही. त्यांच्या श्रेयाच्या राजकारणाच्या लढाईत आम्हाला उडी घ्यायची नाही.