शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

आर्थिक दृर्बल घटकांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार?

By admin | Updated: July 12, 2016 22:07 IST

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत.

ऑनलाइन लोकमतपिंपरी, दि. 12 - पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. महापालिका, केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने गृहप्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या विषयीचे सर्वेक्षणही सुरू करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरकुल योजना आखली असून ,त्या दृष्टीने गृहप्रकल्पाची योजना पिंपरी-चिंचवड शहरातही राबविण्यात येणार आहे. शहरी गरिबांच्या घराचे स्वप्न या योजनेतून पूर्ण केले जाणार आहे. या संदर्भात आज बैठक झाली. या वेळी आयुक्त दिनेश वाघमारे, सभागृहनेत्या मंगला कदम, स्थायी समिती अध्यक्ष डब्बू आसवानी आदींसह पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येणार आहे. याविषयी आयुक्तांसमोर सादरीकरण करण्यात आले. चिखली येथे शहरी गरिबांसाठी घरकुल योजना महापालिकेच्या वतीने राबविण्यात आली. त्यानंतर नवीन योजना राबविण्याबाबत महापालिका विचार करीत आहे.पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल योजना, लाभार्थींचे निकष, त्या संदर्भातील डीपीआर आराखडा तयार करणे, केंद्र, राज्य आणि महापालिका, लाभार्थी यांचा सहभाग याबाबतच्या विषयावर चर्चा झाली. ही योजना पिंपरी-चिंचवडमध्ये राबविण्यासाठी आवश्यक असणारी जागा, त्याचे क्षेत्र यावरही चर्चा झाली. या योजनेसाठीच्या घरांसाठी केंद्र शासन दीड लाख, राज्य शासन एक लाख अनुदान देणार आहे, उवरित रक्कम ही महापालिका आणि लाभार्थ्याकडून घेण्यात येणार आहे. एसआरएच्या माध्यमातून याबाबतचे सर्वेक्षण सुरू झाले असून, हे काम जुलैअखेर पूर्ण होईल. त्यानंतर ही योजना राबविण्यासंदर्भातील आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्यानंतर किती घरे उपलब्ध होतील, याबाबत माहिती देणे शक्य होईल, असे महापालिका सूत्रांकडून सांगण्यात आले.या विषयी लोकप्रतिनिधींनीही काही सूचना केल्या.आयुक्त वाघमारे म्हणाले, आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलाची योजना आहे. ही योजना शहरात राबविण्याच्या दृष्टीने आज बैठक झाली. त्यातून सामान्य माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे. याबाबतचे सर्वेक्षण, आराखडा, अनुदान यावर प्राथमिक चर्चा झाली. सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. त्यानंतर त्यासंदर्भातील डीपीआर तयार करून शासनाकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर योजनेच्या कामास सुरुवात होईल. त्यानंतर घरकुलासाठी असणारी रक्कम, महापालिका आणि लाभार्थीचा शेअर याबाबतचे धोरण ठरविण्यात येईल.