शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

विकासाची गाडी रुळावर येईल?

By admin | Updated: February 25, 2015 01:49 IST

विदर्भाच्या विकासाला चालना देण्यासाठी रेल्वेची भूमिका भविष्यात महत्त्वाची ठरणार आहे. मात्र आजवरच्या सरकारने विविध प्रकल्पांच्या घोषणा केल्या

नागपूर : विदर्भाच्या विकासाला चालना देण्यासाठी रेल्वेची भूमिका भविष्यात महत्त्वाची ठरणार आहे. मात्र आजवरच्या सरकारने विविध प्रकल्पांच्या घोषणा केल्या असल्या तरी येथील विकासाची गाडी अद्यापही ट्रॅकवर आलेली नाही. सात वर्षांपूर्वी रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा केलेले प्रकल्प अद्यापही कागदावरच असून, किमान या अर्थसंकल्पात तरी या प्रकल्पांना ‘बुस्ट’ मिळेल, अशी अपेक्षा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.२०१०-११मध्ये बडनेरा येथे वॅगन वर्कशॉपचा प्रकल्प जाहीर झाला. हा प्रकल्प झाल्यास त्या भागात सुट्या भागांचे पर्यायी उद्योग उभे राहून स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला असता. परंतु हा प्रकल्पही रखडला. अजनी येथे मेकॅनाईज्ड लाँड्रीची घोषणा २०१२-१३मध्ये झाली. यामुळे प्रवाशांना स्वच्छ बेडरोल मिळणार असून, लाँड्रीमध्ये अनेकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. रेल्वेच्या प्रवाशांना स्वस्त दरात पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने २०१२-१३मध्ये नीर बॉटलिंग प्लान्टची घोषणा झाली. त्यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)च्या वतीने बुटीबोरी येथे जागेची पाहणीही केली. परंतु या प्रकल्पाचे पुढे काहीच होऊ शकले नाही. रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलेल्या मेडिकल कॉलेजची घोषणाही हवेतच विरली. प्रत्यक्षात हा प्रकल्प सुरू करण्यासाठी कुठलीच उपाययोजना करण्यात आली नाही. याशिवाय मुंबईसाठी आणखी रेल्वेगाडी, पुण्याच्या रेल्वेगाड्या ‘डेली’ करण्याची तसेच नागपुरातून दिल्ली दुरांतो सुरू होण्याची अपेक्षा मोदी सरकारच्या रेल्वे अर्थसंकल्पाकडून आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड थंडबस्त्यात तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी २००८-०९मध्ये घोषणा केलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या २७० किलोमीटर प्रकल्पाची किंमत ६९७ कोटी रुपये होती. ती १६०० कोटींवर गेली आहे. प्रकल्पासाठी हवा तसा निधीचा पुरवठा न झाल्यामुळे हा प्रकल्प अद्यापही कागदावरच आहे. ६ वर्षांत ३३ किलोमीटर रेल्वेमार्गासाठी जमीन अधिग्रहण करण्यात आली.